शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सामान्यांना त्रास पण वन विभागाच्या हद्दीत सिमेंटची जंगले, राजन तेली आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 17:42 IST

सावंतवाडी: आंबोली येथे सामान्य माणसाला वन विभागाकडून त्रास दिला जातो, पण वन विभागाच्या हद्दीत सिमेंट काँक्रीटचे जंगल कशी काय ...

सावंतवाडी: आंबोली येथे सामान्य माणसाला वन विभागाकडून त्रास दिला जातो, पण वन विभागाच्या हद्दीत सिमेंट काँक्रीटचे जंगल कशी काय उभी राहतात हे कळत नाही. वन विभागाने सिमेंट काँक्रीटची जंगले तत्काळ थांबवावीत अन्यथा त्यांच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला. याची जबाबदारी सर्वस्वी वनविभागाची असेल असेही ते म्हणाले. तसेच नगरपालिका निवडणुकीसाठी अद्याप पर्यंत संभाव्य यादी तयार झाली नसल्याचे हे त्यांनी सांगितले.पंचायत समितीमध्ये आज, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा बँक संचालक तथा पंचायत समिती सदस्य रवींद्र मडगावकर उपस्थित होते.तेली पुढे म्हणाले, पाच राज्याचा निवडणुकीत भाजपला मिळालेले घवघवीत यश लक्षात घेता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये हा चमत्कार दिसून येणार आहे. त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता स्थानिक आमदार दीपक केसरकर अजूनही कोट्यवधीच्या वल्गना करत आहेत. आजपर्यंत त्यांनी केलेल्या एकाही घोषणेची पूर्तता झाली नसून ते केवळ दिशाभूल करण्याचे काम करत आहे. चांदा ते बांदा योजनेचे पैसे परत गेल्याचे सांगून एक प्रकारे आपण कितपत अकार्यक्षम पालकमंत्री होतो हे स्वतःच्या तोंडातून ते सांगत आहेत.  येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका भाजपा स्वबळावर लढवणार आहे. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांची कुठलीही संभाव्य यादी तयार करण्यात आलेले नाही. सर्वांना सोबत घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.केसरकर श्रेय लाटत आहेतआंबोली चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्न हा फडणवीस सरकार काळातच मिटला आहे. केवळ औपचारिकताच बाकी आहे. मात्र केवळ श्रेय मिळावे म्हणून आमदार दिपक केसरकर हे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीचे कारण पुढे करत आहेत अशी टीकाही राजन तेली यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRajan Teliराजन तेली