शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

भात पिक खरेदीसाठी शासनाकडून आॅगस्टमध्ये अध्यादेश : रवींद्र चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:03 IST

कुडाळ : ठेकेदारांनी योग्य वेळेत चांगले व त्यांच्या कामाची यशोगाथा वर्षानवर्षे टिकून राहील, असे काम केल्यास विकासकामांना दिलेला निधी ...

ठळक मुद्देभात पिक खरेदीसाठी शासनाकडून आॅगस्टमध्ये अध्यादेश : रवींद्र चव्हाणवर्षानुवर्षे प्रतिक्षेत असलेल्या तेंडोली-भोम पुलाचे उद्घाटन

कुडाळ : ठेकेदारांनी योग्य वेळेत चांगले व त्यांच्या कामाची यशोगाथा वर्षानवर्षे टिकून राहील, असे काम केल्यास विकासकामांना दिलेला निधी कधीच वाया जाणार नाही, असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तेंडोली-भोम पुलाच्या शुभारंभी प्रसंगी केले. शेतकऱ्यांच्या भात पिकाची खरेदी योग्य वेळेत होण्यासाठी या संदर्भातील अध्यादेश शासनाकडून आॅगस्ट महिन्यातच काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.कुडाळ तालुक्यातील गेले अनेक वर्षे मागणी असलेल्या तेंडोली-भोम पुलाचा शुभारंभ राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती राजन जाधव, जिल्हा परिषद सदस्या वर्षा कुडाळकर, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, पंचायत समिती सदस्या अनघा तेंडोलकर, तेंडोली सरपंच मंगेश प्रभू, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता अनामिका जाधव, भाजपाचे भाई सावंत, महेश सारंग, राजू राऊळ, नीलेश तेंडुलकर, अतुल बंगे, विजय प्रभू, संजय वेंगुर्लेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.तेंडोलीचा पाणी प्रश्न सोडविणार : वैभव नाईकयुती सरकारच्याच काळात मोठ्या प्रमाणात विकासकामे मंजूर झाली आहेत. राज्याचे बांधकाममंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक वर्षांपासून रखडलेले रस्ते, पूल व साकवांच्या कामांना गती मिळाली असून, लवकरच ही कामे पूर्ण होतील, असे आमदार वैभव नाईक म्हणाले. तेंडोली येथील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात येणार आहे. येथील शेती व बागायतींना योग्य प्रकारे पाणीपुरवठा होण्याकरिता विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.भात पिकाबाबत जनजागृती कराआॅगस्टमध्येच भातपीक खरेदीचा शासन निर्णय निघेल. मात्र, तोपर्यंत शेतकऱ्यांनी भातपीक खरेदी केंद्र्रावर नेण्याकरिता तसेच भात पिकाला सरकारकडून मिळणाऱ्या चांगल्या दराबाबत व जास्तीत जास्त भात पीक पिकविण्याबाबत सर्वांनी गावोगावी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी केले. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग