शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाड्यांसमोर सफारीचा पर्याय

By admin | Updated: November 10, 2015 00:01 IST

सकारात्मकता महत्त्वाची : गतवैभव प्राप्त करण्याची नामी संधी

प्रथमेश गुरव- वेंगुर्ले -सुमारे ४० वर्षांपूर्वी दळणवळणाची साधने नसलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बैलगाडीला अनन्यसाधारण महत्त्व होते. श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या लग्नसोहळ्यासाठी खास फुलांनी व रंगीबेरंगी कपड्यांनी सजविलेल्या व आॅईल पेंट कलरनी रंगविलेल्या बैलगाड्या आज जरी नामशेष होत आल्या असे वाटत असले, तरी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतीसाठी आजही त्या जपल्या आहेत. पर्यटनदृष्ट्या अशा बैलगाड्या बैलांंसह सजवून पर्यटकांसाठी सफर आयोजित केल्यास त्यास पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू शकतो.पूर्वीच्याकाळी लग्नसमारंभ, शेतातील माल ने-आण करण्यापासून ते आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यापर्यंत बैलगाडीचा वापर होत असे. बैलगाडी असणाऱ्या व्यक्तीलाही समाजात मानाचे स्थान होते. एका गावातून दुसऱ्या लांबच्या गावात जाण्यासाठी अशा बैलगाड्या एकत्र येऊन प्रवास करीत. रात्रीच्या मुक्कामी एकत्र जेवण, थंडीचे दिवस असतील, तर शेकोटी पेटवून गाणी वगैरे म्हणण्याचा कार्यक्रम होत असे. पहाटेच्यावेळी काहीसे झुंजूमुंजू होत आलेलं असायचं. बैलगाडीचा मालक आपल्याच तोऱ्यात गाणी म्हणत त्यांचा पुढील प्रवास होत असे.मात्र, नंतर हे चित्र बदलत गेलं. विज्ञान युगातील क्रांतीमुळे दळणवळणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला. पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आल्या. या गाड्यांमुळे माणूस जलदगतीने नियोजितस्थळी पोहोचू लागला. अशा गाड्यांच्या किमतीही परवडणाऱ्या असल्याने लोकांनी या गाड्या घेणे पसंत केले आणि प्रवासासाठी बैलगाडीचे महत्त्व कमी होऊ लागले. असाच बदल शेती क्षेत्रातही झाला. शेती करण्यासाठी प्रामुख्याने बैलांचा वापर व्हायचा. मात्र, ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेत नांगरणी सोईची होऊ लागली. वर्षभर बैलांची निगा राखण्यात वेळ घालविण्यापेक्षा ट्रॅक्टरद्वारे केलेली शेती शेतकऱ्यांना सुलभ वाटू लागली. शेतातील माल ने-आण करण्यासाठीही चारचाकी गाड्यांचा वापर होऊ लागला. त्यामुळे शेतीतून काही प्रमाणात बैलांचे दिसणे बंद झाले; परंतु काही ठिकाणी आजही शेतकरी शेतीमध्ये बैल व बैलगाड्यांचा वापर करताना दिसतात. सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित झाला. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही पर्यटनाचे लोण पसरले. पर्यटकांना इथले निसर्गरम्य समुद्रकिनारे, जुन्या चालीरीती, खाद्यसंस्कृती यांचे आकर्षण वाटू लागले. हे सारं प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गात भेटी देत आहेत. उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून पर्यटकांना ग्रामीण भागात आकर्षित करणे आता गावातील लोकांना सहजरीत्या जमू लागले आहे. पर्यटकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. हे वायंगणी येथील होणाऱ्या कासव जत्रेला दरवर्षी वाढणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमुळे दिसून येते. वेंगुर्ले शहरातही जागृती बचत गटाच्या सायली मालवणकर यांनी पर्यटकांना केळीच्या पानात भोजनाचा आस्वाद देणे, त्यांना पारंपरिक खाद्यपदार्थ बनवायला शिकविले आहे. तसेच येथील सांस्कृतिक कार्यक्रमांची त्यांना ओळख करून त्यांनाही यात सहभागी केले जाते. यामुळे पर्यटक याठिकाणी आकर्षिला जात आहे.बैलगाडी नामशेष होण्यापासून वाचविणे हे सद्य:स्थितीत बैलगाडी वापरत असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती आहे. गतवैभव प्राप्त करण्यासाठी त्यांच्यापुढे सफारीचा पर्याय आहे.जुनं तेच सोनं..!मग याच पर्यटकांना नामशेष होत चाललेल्या बैलगाडीतून सफर घडविल्यास ते येथील प्रवासाचा आनंद घेतील. बैलगाडीतून अनोखी प्रवास सफर त्यांना निश्चित आवडेल व ते उत्साहाने यात सहभागी होतील. त्यामुळे बैलगाडी मालकांनाही याचा अल्प का होईना, पण मोबदला जरूर मिळेल आणि बैलगाड्याही नामशेष होण्यापासून वाचतील. पर्यटनाच्या माध्यमातून बैलगाड्यांना नवी दिशा मिळेल. जे दुर्मीळ आहे, ते जुनं असलं तरी सोनं ठरणारं आहे. बैलगाडीही याला अपवाद नाही.