शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

सिंधुदुर्ग : वैभववाडी बाजारपेठेत वाढणाऱ्या टपऱ्यांवरुन विरोधक आक्रमक, नगराध्यक्षांना विचारला जाब; शाब्दिक खटके; कारवाईचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 19:16 IST

वैभववाडी बाजारपेठेतील सार्वजनिक जागांवर टपऱ्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे. वाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे बाजारपेठेला बकालपणा येऊ लागल्याबद्दल सोमवारी विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. त्यावेळी लवकरच विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष चव्हाण यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.

ठळक मुद्देवाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे वैभववाडी बाजारपेठेला बकालपणा नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब पथदिव्यांचे काम अर्धवट का?, तुमच्यामुळे आमची बदनामी होतेय नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये उडाले जोरदार शाब्दिक खटके

वैभववाडी : बाजारपेठेतील सार्वजनिक जागांवर टपऱ्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे. वाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे बाजारपेठेला बकालपणा येऊ लागल्याबद्दल सोमवारी विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. त्यावेळी लवकरच विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष चव्हाण यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.वैभववाडी बाजारपेठेतील दत्तमंदिर परिसर आणि दुर्गामाता उत्सव साजरा होणाऱ्या शासकीय भूखंडावर गेल्या तीन महिन्यांत टपऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत वाढणारी टपऱ्यांची संख्या हा शहरातील चर्चेचा विषय बनला. 

सोमवारी शिवसेनेचे नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, भाजपचे शहराध्यक्ष रणजित तावडे, नगरसेवक संतोष माईणकर, रत्नाकर कदम यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. यावेळी शिवाजी राणे, अमित भागवत, बारक्या निकम, अजय मोहिते उपस्थित होते.समोरच टपऱ्यांची संख्या वाढत असताना नगरपंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित करीत कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक भूखंडावरुन उचलून नगरपंचायतीच्या आवारात आणलेला स्टॉल दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी लागतो कसा? अशी विचारणा तावडे, रावराणे व पवार यांनी केली.

अशा पद्धतीने सार्वजनिक जागा टपऱ्यांनी अडविल्या जाणार असतील तर भविष्यात बाजारपेठेचे चित्र कसे असेल असा प्रश्नही नगराध्यक्षांना केला. त्यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.तुमची तक्रार असेल तर लेखी द्या; बाजारपेठेतील सगळ्याच टपऱ्या काढून टाकू, असे नगराध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. त्यावेळी ग्रामपंचायत काळातील टपऱ्या न हटवता त्यांचे योग्य पुनर्वसन करा; मात्र नव्याने लागलेल्या टपऱ्या काही लोक भाड्याने चालवत आहेत. त्यामुळे दत्तमंदिर परिसर आणि शासकीय भूखंडातील टपऱ्या तातडीने काढून टाकण्याची मागणी विरोधकांनी केली.

त्यावेळी नगराध्यक्ष चव्हाण यांनी प्रभारी मुख्याधिकारी देवानंद डेकळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लवकरच नगरपंचायतीची विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

पथदिव्यांचे काम अर्धवट का?वैभववाडी शहरातील तावडेवाडी येथील पथदिव्यांचे काम मी रोखले अशी सर्वत्र बोंब मारली गेली. परंतु, ते कोणी आणि का थांबविले? याची तुम्ही चौकशी केलीत का? अशी विचारणा नगराध्यक्षांना करीत पथदिव्यांचे काम अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप रणजित तावडे यांनी केला.

तावडेवाडीतील पथदिव्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानासुद्धा ठेकेदाराला नगरपंचायतीने पूर्णत्वाचा दाखला दिला याचा अर्थ जनतेने काय काढायचा? असा प्रश्नही तावडे यांनी नगराध्यक्ष चव्हाण यांना विचारला.तुमच्यामुळे आमची बदनामी होतेयबाजारपेठेत टपऱ्या लागतात. त्या टपऱ्यावर कारवाई न करण्यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक हजारो रुपये घेतात, अशी शहरात बोंब ऐकायला मिळते, असा आरोप करीत टपऱ्यांबाबतच्या तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आमची जनतेत नाहक बदनामी होत आहे. आम्ही ती का सहन करायची? असा रोखठोक सवाल नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे व संतोष माईणकर यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका