शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

सिंधुदुर्ग : वैभववाडी बाजारपेठेत वाढणाऱ्या टपऱ्यांवरुन विरोधक आक्रमक, नगराध्यक्षांना विचारला जाब; शाब्दिक खटके; कारवाईचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 19:16 IST

वैभववाडी बाजारपेठेतील सार्वजनिक जागांवर टपऱ्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे. वाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे बाजारपेठेला बकालपणा येऊ लागल्याबद्दल सोमवारी विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. त्यावेळी लवकरच विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष चव्हाण यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.

ठळक मुद्देवाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे वैभववाडी बाजारपेठेला बकालपणा नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब पथदिव्यांचे काम अर्धवट का?, तुमच्यामुळे आमची बदनामी होतेय नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये उडाले जोरदार शाब्दिक खटके

वैभववाडी : बाजारपेठेतील सार्वजनिक जागांवर टपऱ्यांचे अतिक्रमण वाढीस लागले आहे. वाढत्या टपऱ्यांच्या संख्येमुळे बाजारपेठेला बकालपणा येऊ लागल्याबद्दल सोमवारी विरोधी पक्षांचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. त्यावेळी लवकरच विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष चव्हाण यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.वैभववाडी बाजारपेठेतील दत्तमंदिर परिसर आणि दुर्गामाता उत्सव साजरा होणाऱ्या शासकीय भूखंडावर गेल्या तीन महिन्यांत टपऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाजारपेठेत वाढणारी टपऱ्यांची संख्या हा शहरातील चर्चेचा विषय बनला. 

सोमवारी शिवसेनेचे नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे, भाजपचे शहराध्यक्ष रणजित तावडे, नगरसेवक संतोष माईणकर, रत्नाकर कदम यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना जाब विचारला. यावेळी शिवाजी राणे, अमित भागवत, बारक्या निकम, अजय मोहिते उपस्थित होते.समोरच टपऱ्यांची संख्या वाढत असताना नगरपंचायतीचे त्याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित करीत कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक भूखंडावरुन उचलून नगरपंचायतीच्या आवारात आणलेला स्टॉल दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी लागतो कसा? अशी विचारणा तावडे, रावराणे व पवार यांनी केली.

अशा पद्धतीने सार्वजनिक जागा टपऱ्यांनी अडविल्या जाणार असतील तर भविष्यात बाजारपेठेचे चित्र कसे असेल असा प्रश्नही नगराध्यक्षांना केला. त्यावेळी नगराध्यक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खटके उडाले.तुमची तक्रार असेल तर लेखी द्या; बाजारपेठेतील सगळ्याच टपऱ्या काढून टाकू, असे नगराध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. त्यावेळी ग्रामपंचायत काळातील टपऱ्या न हटवता त्यांचे योग्य पुनर्वसन करा; मात्र नव्याने लागलेल्या टपऱ्या काही लोक भाड्याने चालवत आहेत. त्यामुळे दत्तमंदिर परिसर आणि शासकीय भूखंडातील टपऱ्या तातडीने काढून टाकण्याची मागणी विरोधकांनी केली.

त्यावेळी नगराध्यक्ष चव्हाण यांनी प्रभारी मुख्याधिकारी देवानंद डेकळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लवकरच नगरपंचायतीची विशेष सभा घेऊन टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

पथदिव्यांचे काम अर्धवट का?वैभववाडी शहरातील तावडेवाडी येथील पथदिव्यांचे काम मी रोखले अशी सर्वत्र बोंब मारली गेली. परंतु, ते कोणी आणि का थांबविले? याची तुम्ही चौकशी केलीत का? अशी विचारणा नगराध्यक्षांना करीत पथदिव्यांचे काम अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप रणजित तावडे यांनी केला.

तावडेवाडीतील पथदिव्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानासुद्धा ठेकेदाराला नगरपंचायतीने पूर्णत्वाचा दाखला दिला याचा अर्थ जनतेने काय काढायचा? असा प्रश्नही तावडे यांनी नगराध्यक्ष चव्हाण यांना विचारला.तुमच्यामुळे आमची बदनामी होतेयबाजारपेठेत टपऱ्या लागतात. त्या टपऱ्यावर कारवाई न करण्यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक हजारो रुपये घेतात, अशी शहरात बोंब ऐकायला मिळते, असा आरोप करीत टपऱ्यांबाबतच्या तुमच्या कचखाऊ धोरणामुळे आमची जनतेत नाहक बदनामी होत आहे. आम्ही ती का सहन करायची? असा रोखठोक सवाल नगरसेवक संतोष पवार, रोहन रावराणे व संतोष माईणकर यांनी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांना केला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMuncipal Corporationनगर पालिका