शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

केवळ दहावीसाठी होणार पुनर्परीक्षा

By admin | Updated: June 13, 2015 00:18 IST

नवा निर्णय : केवळ दहावीसाठी होणार पुनर्परीक्षा

सागर पाटील - टेंभ्ये -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुनर्परीक्षेचा कोकण विभागातील मार्च २०१५ परीक्षेत अनुत्तीर्ण १४०० तसेच ३५२ रिपीटर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसल्याचे कोकण विभागीय शिक्षण मंडळातून सांगण्यात आले.मार्च २०१५मध्ये कोकण विभागातून दहावीच्या परीक्षेला ३९,७८७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३८,४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयात १२२४, विज्ञानमध्ये १२२३, इंग्रजी (२/३) मध्ये ७७९, सामान्य गणितमध्ये ७३०, मराठी (प्रथम) मध्ये ७२५, हिंदीमध्ये ६८७, तर समाजशास्त्र विषयात ६२४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे २१ जुलैपासून या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पुरवणी परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. १५ जूनपासून आॅनलाईन आवेदनपत्र सादर करता येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या पूर्वीच्या शाळेतून आवेदनपत्र भरता येणार आहेत. नियमीत शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख २३ जून आहे. २६ जूनपर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहेत.या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात परीक्षा केेंद्र निर्माण करण्यात येणार आहेत.मार्च २०१५च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनादेखील या परीक्षेचा फायदा होणार आहे. यावर्षी केवळ दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा मात्र पूर्वीप्रमाणेच आॅक्टोबर २०१५ मध्ये घेण्यात येणार आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या अंमलबजावणीच्या यशापयशाचा विचार करुन मार्च २०१६ नंतर इयत्ता दहावी व बारावी या दोन्ही वर्गाची पुरवणी परीक्षा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी दहावीची आॅक्टोबरची परीक्षा घेण्यात येणार नाही असे बोर्ड$िातर्पे सांगण्यात येत आहे. शासनाने पुरवणी परीक्षेचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याला नियमीत विद्यार्थ्यांप्रमाणे इयत्ता अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे सर्वच पात्र विद्यार्थ्यानी या संधीचा फायदा घ्यावा. प्रायोगिक तत्त्वावर यावर्षी दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत उपयुक्त आहे.- आर. बी. गिरी,अध्यक्ष, कोकण विभागीय मंडळ.