शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
6
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
9
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
10
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
11
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
12
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
13
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
14
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
15
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
16
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
17
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
19
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
20
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश

केवळ दहावीसाठी होणार पुनर्परीक्षा

By admin | Updated: June 13, 2015 00:18 IST

नवा निर्णय : केवळ दहावीसाठी होणार पुनर्परीक्षा

सागर पाटील - टेंभ्ये -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुनर्परीक्षेचा कोकण विभागातील मार्च २०१५ परीक्षेत अनुत्तीर्ण १४०० तसेच ३५२ रिपीटर विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसल्याचे कोकण विभागीय शिक्षण मंडळातून सांगण्यात आले.मार्च २०१५मध्ये कोकण विभागातून दहावीच्या परीक्षेला ३९,७८७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ३८,४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयात १२२४, विज्ञानमध्ये १२२३, इंग्रजी (२/३) मध्ये ७७९, सामान्य गणितमध्ये ७३०, मराठी (प्रथम) मध्ये ७२५, हिंदीमध्ये ६८७, तर समाजशास्त्र विषयात ६२४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे २१ जुलैपासून या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पुरवणी परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना दि. १५ जूनपासून आॅनलाईन आवेदनपत्र सादर करता येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या पूर्वीच्या शाळेतून आवेदनपत्र भरता येणार आहेत. नियमीत शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची अंतिम तारीख २३ जून आहे. २६ जूनपर्यंत विलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहेत.या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात परीक्षा केेंद्र निर्माण करण्यात येणार आहेत.मार्च २०१५च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांबरोबर यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनादेखील या परीक्षेचा फायदा होणार आहे. यावर्षी केवळ दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा मात्र पूर्वीप्रमाणेच आॅक्टोबर २०१५ मध्ये घेण्यात येणार आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या अंमलबजावणीच्या यशापयशाचा विचार करुन मार्च २०१६ नंतर इयत्ता दहावी व बारावी या दोन्ही वर्गाची पुरवणी परीक्षा घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी दहावीची आॅक्टोबरची परीक्षा घेण्यात येणार नाही असे बोर्ड$िातर्पे सांगण्यात येत आहे. शासनाने पुरवणी परीक्षेचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याला नियमीत विद्यार्थ्यांप्रमाणे इयत्ता अकरावीला प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे सर्वच पात्र विद्यार्थ्यानी या संधीचा फायदा घ्यावा. प्रायोगिक तत्त्वावर यावर्षी दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत उपयुक्त आहे.- आर. बी. गिरी,अध्यक्ष, कोकण विभागीय मंडळ.