शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

पर्यटन जिल्हा करण्याची केवळ घोषणाच?

By admin | Published: February 14, 2016 9:54 PM

रत्नागिरी जिल्हा : पुढाऱ्यांच्या घोषणा केवळ हवेतच

रत्नागिरी : गोव्याइतकीच पर्यटनाची क्षमता असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याकडे पर्यटन वृध्दिच्या दृष्टीने दुर्लक्ष झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच रत्नागिरीलाही पर्यटन जिल्हा बनविण्याच्या घोषणा याआधीही अनेक पुढाऱ्यांनी केल्या आहेत. राज्यमंत्री राम शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात रत्नागिरीत या घोषणेचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे घोषणांनी रत्नागिरीकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आतातरी राजकीय नेत्यांनी थांबवावा आणि दिलेल्या वचनाला जागावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री असताना सध्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा, तर रत्नागिरी जिल्ह्यास फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित केले होते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन जिल्हा म्हणून उशिराने का होईना विकास होत आहे. तेथे राजकीय वजन असलेले नेते आहेत. गोवा जवळ असल्याने पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्याचा चांगला फायदा झाला. मात्र, रत्नागिरीकडे राजकीय नेत्यांचे पर्यटनवाढीच्या दृष्टीने प्रयत्न झाले नाहीत. केवळ गणपतीपुळेसह काही ठिकाणेच विकसित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक भागामध्ये पर्यटनाची क्षमता आहे. त्याकडे आजवर राजकीय नेत्यांचा व शासनाचेही दुर्लक्ष झाल्यामुळे रत्नागिरीच्या विकासाची गती मंदावली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या उंचच उंच रांगा आणि पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र असल्याने जिल्ह्याच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. डोंगर दऱ्या, स्वच्छ समुद्र किनारे, सुंदर नागमोडी वळणाच्या नद्या, उन्हवरे, आरवली, तुरळ येथील गरम पाण्याचे झरे, राजापूरमध्ये प्रकट होणाऱ्या गंगेचे ठिकाण, जंगले आणि परशुराम, प्रचितगड, मार्लेश्वर यांसारखे पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारे धबधबे, पन्हाळेकाजी गुंफा, पाटपन्हाळे व बावनदी व्हॅली, गणपतीपुळे, वेळणेश्वर, मार्लेश्वर, हेदवी, हातीस, परशुराम व राजापूर ही धार्मिक ठिकाणे, रत्नागिरीचा ऐतिहासिक थिबा राजवाडा, केळशी, मुरुड, गुहागर, पालशेत, गणपतीपुळे व वेळणेश्वर, मांडवी अर्थात गेटवे आॅफ रत्नागिरी, भाट्ये, गुहागर, आंजर्ला आदी समुद्र किनारे तसेच रत्नदुर्ग, जयगड, हर्णै, पूर्णगड हे सागरी किल्ले, असंख्य किल्ले, मोठे पाटबंधारे प्रकल्प, घाट अशा विपुल निसर्गसौंदर्याने रत्नागिरी जिल्हा नटलेला आहे. राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांना या निसर्ग सौंदर्याचा भरभरून आस्वाद घेता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील विविधतेत पर्यटनाची पुरेपूर क्षमता असतानाही ही क्षमता विकसित करण्याकडे स्थानिक नेतृत्व आणि शासनानेही उदासिनताच दाखवली आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनविषयक प्रबोधन, जाणीवा जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतर ठराविक पर्यटन केंद्रांच्या विकासासाठी निधीची उपलब्धता करणे म्हणजे पर्यटन विकास म्हणता येणार नाही. (प्रतिनिधी)प्रयत्नच नाहीत...लोकप्रतिनिधींनी पर्यटनासाठी निधी आणण्यासाठी किती प्रयत्न केले, किती निधी सर्वसमावेशक पर्यटन विकासासाठी आला, हा संशोधनाचा विषय आहे. आराखडा हवा : पर्यटन क्षमतेचा वापर कधी?जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा विचार करता प्रत्येक तालुक्यात पर्यटन विकासाची मोठी क्षमता आहे, हे लपून राहात नाही. गणपतीपुळे, पावस, हर्णैसारखी काही ठिकाणे पर्यटनदृष्ट्या विकसित झाली, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या स्थळांच्या ठिकाणी आणखीही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतील तर ती त्याहून चांगली बाब आहे. मात्र, एवढ्या पर्यटन स्थळांच्याच विकासाने जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेचा वापर होणार नाही. स्थानिकांना रोजगार मिळणार नाही. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी, या जिल्ह्याच्या खासदारांनीही केवळ जिल्ह्याचा सर्वसमावेशक पर्यटन विकास व्हावा, यासाठी एकत्र येऊन त्याचा आराखडा बनवून त्यासाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवण्याचीही तितकीच गरज आहे.