शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

एकमेव सेलिब्रिटीही मतदारांनी नाकारला-- राजापूर लोकसभा मतदारसंघ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:18 IST

नाट्य-चित्रपटातील सेलिब्रिटी आणि राजकारण यांचे नाते खूप जुने आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असाच एक प्रयोग १९९८ साली करण्यात आला.

ठळक मुद्दे- मुख्य लढत मच्छिंद्र कांबळी - सुरेश प्रभू यांच्यातच रंगली

रत्नागिरी : नाट्य-चित्रपटातील सेलिब्रिटी आणि राजकारण यांचे नाते खूप जुने आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही असाच एक प्रयोग १९९८ साली करण्यात आला. मालवणी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाºया मच्छिंद्र कांबळी यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. मात्र, हा एकमेव सेलिब्रिटीही मतदारांनी नाकारला.

राजकीय पदे, त्यातील मानमरातब, त्यातून मिळणारे अधिकार याचे आकर्षण सेलिब्रिटिंना असते आणि अशा सेलिब्रिटींची लोकप्रियता राजकीय पक्षांना आकर्षित करते. त्यामुळे अभिनेते-अभिनेत्रींना राजकीय रिंगणात उतरवण्याचा खेळ जुनाच आहे. दक्षिणेकडील भागात हे प्रमाण अधिक आहे.

वर्षानुवर्षे बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाºया राजापूर लोकसभा मतदार संघात सेलिब्रिटिला उतरवण्याचा मोह काँग्रेसला झाला आणि त्यातूनच मच्छिंद्र कांबळी यांचे नाव पुढे आले. ‘वस्त्रहरण’च्या माध्यमातून मालवणी भाषेला वलय मिळवून देणारे नाट्य-सिने अभिनेते, निर्माते म्हणून मच्छिंद्र कांबळी यांचे नाव आजही घेतले जाते. काँग्रेसने १९९८ साली त्यांना राजापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. 

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजवर निवडणूक लढवलेला हा एकमेव सेलिब्रिटी. त्यावेळी त्यांच्यासमोर शिवसेनेकडून तत्कालिन खासदार सुरेश प्रभू तर पुष्पसेन सावंत (जनता दल), नलिनी भुवड आणि किरण ठाकूर (दोन्ही अपक्ष) असे तीन उमेदवार रिंगणात होते. मात्र, मुख्य लढत झाली ती कांबळी आणि प्रभू यांच्यामध्येच. त्यात कांबळी यांना १ लाख ५२ हजार ७२४ मते मिळाली. यावेळी २ लाख १७ हजार ७६६ मते मिळालेले सुरेश प्रभू विजयी झाले.

एकदाच झाला प्रयोग

कोकणातील अनेक कलाकार नाट्य-सिने क्षेत्रात प्रसिद्धीच्या झोतात आहेत. मात्र, एकदा झालेला प्रयोग फसल्यानंतर पुन्हा हा प्रयोग कोणीही केला नाही. कोकणातील मतदारांनी आजवर पक्ष पाहूनच मतदान केल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. कांबळी यांच्या निवडणुकीतही तेच अधोरेखित झाले होते.

टॅग्स :Electionनिवडणूकsindhudurgसिंधुदुर्ग