शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पालकमंत्र्यांकडून निधी आणल्याच्या केवळ घोषणाच, परशुराम उपरकरांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: July 1, 2023 15:56 IST

जिल्ह्याचे सुपूत्र असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री व शिक्षणमंत्री या दोन्ही मंत्र्यांचे जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष

कणकवली : राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मिळाले तरी विकासात फरक पडलेला नाही. राज्यातील सरकारला वर्ष झाले तरी सार्वजनिक बांधकामच्या कार्यपद्धतीत कोणताच फरक पडला नाही. पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नसून निधी आणल्याच्या ते केवळ घोषणाच करत असल्याची टीका मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, ज्या रस्त्यांना वर्षभरात किंवा वॉरटी कालावधीत खड्डे पडतात, त्याबाबत जाब विचारणाऱ्यांना समाजकंटक म्हणून हिनवणे मनसे खपवून घेणार नाही. रस्त्यांच्या कामाच्या दर्जा बाबतच्या माहितीसाठी थेट जनतेचा सहभाग असावा यासाठी तांत्रिक सल्लागारांच्या कार्यशाळा मनसेमार्फत घेणार असल्याचेही उपरकर यांनी सांगितले.

सुपूत्रांचे दुर्लक्षजिल्ह्याचे सुपूत्र असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री व शिक्षणमंत्री या दोन्ही मंत्र्यांचे जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारांनी केलेल्या कामाच्या बिलांसाठीचा निधीही हे मंत्री देऊ शकले नाहीत, हे ठेकेदारांच्या भेटीतून उघड झाले. मात्र, ठेकेदार व अधिकारी हे पैसे यावेत म्हणून गेले होते की 'कट' ठरविण्यासाठी गेले होते? असा सवाल करत जिल्ह्यातील रस्त्यांच्या स्थितीकडे मनसे लक्ष ठेऊन आहे.

पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे सिंधुदुर्गात खड्डेमुक्त रस्त्यांची पोकळ घोषणा सत्ताधारी करतात. मात्र अवघ्या ८ दिवसात नवीन बनवलेल्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडू लागलेले आहेत. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १४ कोटींचा निधी खर्च झाला. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून एकेरी वाहतूक करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यानी दिलेले  होते, त्याचे काय झाले? गणेशोत्सवापूर्वी पुन्हा चार दिवस खड्डेमुक्तीची घोषणा होईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गguardian ministerपालक मंत्रीParshuram Upkarपरशुराम उपरकर