शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

पालकमंत्र्यांकडून निधी आणल्याच्या केवळ घोषणाच, परशुराम उपरकरांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: July 1, 2023 15:56 IST

जिल्ह्याचे सुपूत्र असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री व शिक्षणमंत्री या दोन्ही मंत्र्यांचे जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष

कणकवली : राज्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मिळाले तरी विकासात फरक पडलेला नाही. राज्यातील सरकारला वर्ष झाले तरी सार्वजनिक बांधकामच्या कार्यपद्धतीत कोणताच फरक पडला नाही. पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. पालकमंत्र्यांचे जिल्ह्याकडे लक्ष नसून निधी आणल्याच्या ते केवळ घोषणाच करत असल्याची टीका मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, ज्या रस्त्यांना वर्षभरात किंवा वॉरटी कालावधीत खड्डे पडतात, त्याबाबत जाब विचारणाऱ्यांना समाजकंटक म्हणून हिनवणे मनसे खपवून घेणार नाही. रस्त्यांच्या कामाच्या दर्जा बाबतच्या माहितीसाठी थेट जनतेचा सहभाग असावा यासाठी तांत्रिक सल्लागारांच्या कार्यशाळा मनसेमार्फत घेणार असल्याचेही उपरकर यांनी सांगितले.

सुपूत्रांचे दुर्लक्षजिल्ह्याचे सुपूत्र असलेले सार्वजनिक बांधकाममंत्री व शिक्षणमंत्री या दोन्ही मंत्र्यांचे जिल्ह्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदारांनी केलेल्या कामाच्या बिलांसाठीचा निधीही हे मंत्री देऊ शकले नाहीत, हे ठेकेदारांच्या भेटीतून उघड झाले. मात्र, ठेकेदार व अधिकारी हे पैसे यावेत म्हणून गेले होते की 'कट' ठरविण्यासाठी गेले होते? असा सवाल करत जिल्ह्यातील रस्त्यांच्या स्थितीकडे मनसे लक्ष ठेऊन आहे.

पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे सिंधुदुर्गात खड्डेमुक्त रस्त्यांची पोकळ घोषणा सत्ताधारी करतात. मात्र अवघ्या ८ दिवसात नवीन बनवलेल्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडू लागलेले आहेत. आंगणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर १४ कोटींचा निधी खर्च झाला. मात्र पहिल्याच पावसात या रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून एकेरी वाहतूक करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यानी दिलेले  होते, त्याचे काय झाले? गणेशोत्सवापूर्वी पुन्हा चार दिवस खड्डेमुक्तीची घोषणा होईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गguardian ministerपालक मंत्रीParshuram Upkarपरशुराम उपरकर