शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सिंधुदुर्गातील रूग्णांची परवड, मोफत उपचारांची फक्त घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 15:22 IST

सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांबरोबरच गंभीर अवस्थेत बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या मंत्र्यांनी जाहीर करून महिना झाला तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देगोव्यात सिंधुदुर्गातील रूग्णांची परवड, मोफत उपचारांची फक्त घोषणा  महिन्यानंतरही अंमलबजावणी नसल्याने नाराजी

दोडामार्ग : सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांबरोबरच गंभीर अवस्थेत बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या मंत्र्यांनी जाहीर करून महिना झाला तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.या आंदोलनाचे संयोजक संदेश वरक यांनाच खुद्द या कटू प्रसंगास सामोरे जावे लागले असून जोपर्यंत शुल्क भरणा करीत नाही, तोपर्यंत उपचार केले जाणार नाहीत, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याने तब्बल तीन तास रुग्णाला उपचारासाठी ताटकळत रहावे लागले. त्यामुळे जनआक्रोश आंदोलनासाठी बसलेल्यांची दिशाभूल होतेय की काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.परराज्यातील रुग्णांवर गोव्यातील बांबोळी रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार नाहीत. त्यांना ठरवून दिलेली शुल्क आकारणी भरणा करावी लागेल, असा निर्णय दोन महिन्यांपूर्वी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घेतल्यावर त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गवासीयांना बसत होता. त्यामुळे बांबोळीत सिंधुदुर्गातील रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन उभारण्यात आले. तब्बल दहा दिवस हे आंदोलन चालले.अखेर भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर आदींच्या पुढाकारातून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यात बैठक झाली.

या बैठकीत सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक तसेच अती गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले. मात्र, या निर्णयाला महिना उलटला तरी अद्यापही बांबोळीत शुल्क भरून घेतले जात असल्याचा प्रकार सुरू आहे.

बुधवारी जनआक्रोश आंदोलनाचे संयोजक संदेश वरक यांना त्या कटू अनुभवास सामोरे जावे लागले. वरक यांचे वडील आजारी असल्याने त्यांना बांबोळीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जोपर्यंत उपचारासाठी आकारण्यात आलेली रक्कम भरणा केली जात नाही तोपर्यंत उपचार केले जाणार नाहीत, असे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे तब्बल तीन तास वरक यांना उपचारासाठी ताटकळत रहावे लागले.

दोन्ही राज्याच्या मंत्र्यांनी मोफत उपचाराची घोषणा केली असताना सुद्धा बांबोळीत सिंधुदुर्गातील रुग्णांबाबत असा प्रकार वारंवार घडत आहे. त्यामुळे जनआक्रोश आंदोलना दरम्यान केलेल्या घोषणेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आंदोलकांची दिशाभूल तर झाली नाही ना असा संभ्रमही आता निर्माण झाला आहे.सोशल मीडियावरही तीव्र पडसाद उमटले आहे. जनआक्रोश आंदोलनानंतरही बांबोळीत दाखल होणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांकडून शुल्क आकारले जात असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने त्याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कारभाराबाबतही तीव्र नाराजी व्यक्त होत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही राज्य सरकारच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.पैसे भरा नाहीतर रूग्णाला घेऊन जाबांबोळीत संदेश वरक यांनी आपल्या वडिलांना उपचारासाठी दाखल केल्यावर त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून शुल्क भरण्यास सांगण्यात आले. यावेळी वरक यांनी जनआक्रोश आंदोलनाची आठवण करून देत आपण या आंदोलनाचे संयोजक असल्याचे सांगून रेशनकार्ड उद्या देतो उपचार सुरू करा, असे सांगितले. मात्र, प्रशासनाने त्यांचे काहीच ऐकून न घेता पैसे भरा नाहीतर रूग्णाला घेऊन जा, असे सांगितले.जन आक्रोशच्या संयोजकांची तातडीची बैठकबांबोळीत शुल्क आकारण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने जनआक्रोश आंदोलनाच्या संयोजकांची तातडीची बैठक शुक्रवारी (१८ मे रोजी) बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत पुढील निर्णयासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाhospitalहॉस्पिटल