शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

गोव्यात सिंधुदुर्गातील रूग्णांची परवड, मोफत उपचारांची फक्त घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 15:22 IST

सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांबरोबरच गंभीर अवस्थेत बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या मंत्र्यांनी जाहीर करून महिना झाला तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देगोव्यात सिंधुदुर्गातील रूग्णांची परवड, मोफत उपचारांची फक्त घोषणा  महिन्यानंतरही अंमलबजावणी नसल्याने नाराजी

दोडामार्ग : सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांबरोबरच गंभीर अवस्थेत बांबोळी-गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांच्या मंत्र्यांनी जाहीर करून महिना झाला तरी त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.या आंदोलनाचे संयोजक संदेश वरक यांनाच खुद्द या कटू प्रसंगास सामोरे जावे लागले असून जोपर्यंत शुल्क भरणा करीत नाही, तोपर्यंत उपचार केले जाणार नाहीत, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याने तब्बल तीन तास रुग्णाला उपचारासाठी ताटकळत रहावे लागले. त्यामुळे जनआक्रोश आंदोलनासाठी बसलेल्यांची दिशाभूल होतेय की काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.परराज्यातील रुग्णांवर गोव्यातील बांबोळी रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार नाहीत. त्यांना ठरवून दिलेली शुल्क आकारणी भरणा करावी लागेल, असा निर्णय दोन महिन्यांपूर्वी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घेतल्यावर त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गवासीयांना बसत होता. त्यामुळे बांबोळीत सिंधुदुर्गातील रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन उभारण्यात आले. तब्बल दहा दिवस हे आंदोलन चालले.अखेर भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर आदींच्या पुढाकारातून गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यात बैठक झाली.

या बैठकीत सिंधुदुर्गातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक तसेच अती गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले. मात्र, या निर्णयाला महिना उलटला तरी अद्यापही बांबोळीत शुल्क भरून घेतले जात असल्याचा प्रकार सुरू आहे.

बुधवारी जनआक्रोश आंदोलनाचे संयोजक संदेश वरक यांना त्या कटू अनुभवास सामोरे जावे लागले. वरक यांचे वडील आजारी असल्याने त्यांना बांबोळीत उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जोपर्यंत उपचारासाठी आकारण्यात आलेली रक्कम भरणा केली जात नाही तोपर्यंत उपचार केले जाणार नाहीत, असे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे तब्बल तीन तास वरक यांना उपचारासाठी ताटकळत रहावे लागले.

दोन्ही राज्याच्या मंत्र्यांनी मोफत उपचाराची घोषणा केली असताना सुद्धा बांबोळीत सिंधुदुर्गातील रुग्णांबाबत असा प्रकार वारंवार घडत आहे. त्यामुळे जनआक्रोश आंदोलना दरम्यान केलेल्या घोषणेचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आंदोलकांची दिशाभूल तर झाली नाही ना असा संभ्रमही आता निर्माण झाला आहे.सोशल मीडियावरही तीव्र पडसाद उमटले आहे. जनआक्रोश आंदोलनानंतरही बांबोळीत दाखल होणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांकडून शुल्क आकारले जात असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने त्याचे तीव्र पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या कारभाराबाबतही तीव्र नाराजी व्यक्त होत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही राज्य सरकारच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.पैसे भरा नाहीतर रूग्णाला घेऊन जाबांबोळीत संदेश वरक यांनी आपल्या वडिलांना उपचारासाठी दाखल केल्यावर त्यांना रुग्णालय प्रशासनाकडून शुल्क भरण्यास सांगण्यात आले. यावेळी वरक यांनी जनआक्रोश आंदोलनाची आठवण करून देत आपण या आंदोलनाचे संयोजक असल्याचे सांगून रेशनकार्ड उद्या देतो उपचार सुरू करा, असे सांगितले. मात्र, प्रशासनाने त्यांचे काहीच ऐकून न घेता पैसे भरा नाहीतर रूग्णाला घेऊन जा, असे सांगितले.जन आक्रोशच्या संयोजकांची तातडीची बैठकबांबोळीत शुल्क आकारण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने जनआक्रोश आंदोलनाच्या संयोजकांची तातडीची बैठक शुक्रवारी (१८ मे रोजी) बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत पुढील निर्णयासंदर्भात चर्चा केली जाणार आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाhospitalहॉस्पिटल