शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्र्यांच्या सूचना अधिकारी पाळत नाही, दीपक केसरकरांकडून घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:08 IST

हत्ती हटाव मोहीम फक्त अधिकाऱ्यांमुळेच रखडली

सावंतवाडी : वनमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतरही अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी माझा आग्रह असून लवकरच ही बाब वनमंत्र्यांच्या निर्देशानुसार आणून दिले जाईल. हत्ती हटाव मोहीम फक्त अधिकाऱ्यांमुळेच रखडली आहे. असा घरचा आहेर राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी शिंदेसेना जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, विद्याधर परब, परीक्षित मांजरेकर, विनोद सावंत, बंटी पुरोहित, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते. केसरकर म्हणाले, दोडामार्ग, मांगेली येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. जीवितहानीचे प्रकार रोखण्यासाठी महावितरणने दक्षता घेणे आवश्यक आहे. गवस कुटुंबाची मी लवकरच भेट घेणार आहे. हा अपघात कसा घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचे ही केसरकर यांनी स्पष्ट केले.मांगेली-कुसगेवाडी विजेचा जोरदार धक्का लागून घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. गवस कुटुंबाची मी भेट घेणार आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. महावितरण दक्षता घेणे आवश्यक असून हा अपघात कसा झाला याची चौकशी केली जाणार असल्याचे केसरकर म्हणाले. तसेच विजेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ही केसरकर यांनी स्पष्ट केले.सावंतवाडी बसस्थानकाचा पीपीटी तत्वावर विकास होणार आहे. हायवे लगत असल्याने पूर्णपणे अत्याधुनिक असे हे स्थानक होईल. दरम्यानच्या काळात येथे पडलेले खड्डे व डागडुजी करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे हे स्थानक सावंतवाडीत उभे राहील, असा विश्वास  केसरकर यांनी व्यक्त केला. तसेच सावंतवाडीकरांनी मला अनेक वर्षे प्रेम दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीची सत्ता नगरपालिकेत दिसेल, असेही म्हणाले.वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दक्षता आंबोलीत वन विभागाकडून पर्यटकांना धबधब्यांच्या ठिकाणी सोडण्यासाठी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. पर्यटकांना ये-जा करण्यासाठी याचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पोलिस आणि वन विभागाशी चर्चा करून होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दक्षता घेतली जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.