शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कृषी अधीक्षक कार्यालय अद्याप पिछाडीवर

By admin | Updated: February 26, 2015 00:09 IST

बंधाऱ्यांची उद्दिष्ट्यपूर्ती : दोडामार्ग, मालवण, वैभववाडी अग्रेसर

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी यासाठी जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ७०० बंधाऱ्यांपैकी ४ हजार ७८५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आलेले उद्दिष्ट्य दोडामार्ग, मालवण व वैभववाडी या तालुक्यांनी १०० टक्क्यांहून अधिक पूर्ण केले आहे तर जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालय पिछाडीवर राहिला आहे.साधारणत: मे अखेरीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भासण्यास सुरुवात होते. त्यातच यावर्षी कमी पडलेला पाऊस त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्याने यावर्षीही मे महिन्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षी कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ हजार ७०० बंधाऱ्यांचेही उद्दीष्ट्य प्रत्येक तालुक्यात विभागून दिले. आठ तालुक्यांना ५ हजारांचे तर राज्य शासनाच्या कृषी विभाग १५०० व सामाजिक वनीकरण विभागाला २०० असे बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट्य दिले होते. आजअखेर ६७०० बंधाऱ्यांपैकी १८९७ कच्चे व २८८८ वनराई असे ४७८५ बंधारे बांधण्यात आले आहेत.काही तालुके १00 टक्केवरपाणीटंचाईवर मात करण्यासाठी देण्यात आलेले बंधाऱ्यांचे उद्दिष्ट्य दोडामार्ग, मालवण व वैभववाडी तालुक्यांनी १०० टक्क्यांच्यावर पूर्ण केले आहे. त्याबद्दल प्रशासनाच्यावतीने तालुक्यांनी अभिनंदन केले जात आहे.कणकवली तालुका जैसे थेकणकवली तालुक्याला जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने ८५० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्यापैकी या तालुक्याने नोव्हेंबर २०१४ अखेर कच्चे बंधारे ३२१ व वनराई बंधारे १९९ असे मिळून ५२० बंधारे बांधले होते. मात्र डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या अडीच महिन्यांच्या कालावधीत या तालुक्याने एकही बंधारा बांधला नसल्याचे प्रशासनाच्या अहवालानुसार उघड झाले आहे. (प्रतिनिधी)