शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

देवगड नगरपंचायतीची आज अधिसूचना

By admin | Updated: October 20, 2015 23:35 IST

प्रमोद जठार : नीतेश राणेंना प्रत्युत्तर

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना २१ आॅक्टोबर रोजी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केली जाणार आहे. एक महिन्यानंतर या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक होईल. त्यामुळे लवकरच देवगड नगरपंचायतीबाबत कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.जठार म्हणाले की, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नगरपंचायतीची प्रसिद्धी नोटीस देणे महत्त्वाचे असते. ही नोटीस त्यावेळी दिली गेली नसल्याने २०१४ नंतर या नगरपंचायतीला विलंब लागला आहे. जिल्हा परिषदेच्या गलथान कारभारामुळेच देवगड नगरपंचायतीचा गेली तीन वर्ष टाइमपास शो झाला व आता ‘टाइमपास २’चा शो आमदार नीतेश राणे करत आहेत. नगरपंचायतीच्या प्रशासकीय कालावधीत देवगड जामसंडे पाणी प्रश्न नगरोत्थान योजनेमधून घेण्यात यावा, असा ठराव करून देवगडचा पाणीप्रश्नही निकाली निघणार आहे, असे जठार यांनी सांगितले. तारामुंबरी मिठमुंबरी पुलाला नवीन अंतर्गत पर्यायी रस्ता शोधल्याने या पुलाचेही काम येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू होणार असून, स्थानिकांना मोबदलाही योग्य मिळणार आहे. देवगड तालुक्यातील ८ खाडींवरील पूल उभारण्यासाठी शासनाकडे मागणी केली असल्याचेही जठार यांनी सांगितले. मोंड वानिवडे खाडीवरील पुलाचे बांधकाम करणे, जामसंडे पाटकरवाडी ते इळये वरणवाडी जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, फणसे पुरळ कलंबई जोडणाऱ्या खाडीवर पूल उभारणे, गिर्ये तरबंदर ते मोहुळ गाव जोडणाऱ्या खाडीवर पुलाचे बांधकाम करणे, वळीवंडे खराडा जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करणे, टेंबवली वानिवडे जोडणाऱ्या खाडीवर उंच पातळीच्या पुलाचे बांधकाम करणे, कोटकामते कुपलवाडी जोडणाऱ्या खाडीवर उंच पातळीच्या पुलाचे बांधकाम करणे, तालुक्यातील खाडीवरील पूल होणे महत्त्वाचे आहे. मंजुरी मिळण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे. तसेच या गावातील होणाऱ्या खाडीवरील पुलासाठी जमीनही पूल होण्याअगोदरच जिल्हा प्रशासनाने संपादन करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे जठार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)--काँग्रेसमुळेच विलंब : जठारदेवगड जामसंडे नगरपंचायतीची प्रारूप स्वरूपाची अधिसूचना १५ मे २०१२ रोजी निघाली होती. मात्र, या नगरपंचायतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव लागतो.हा ठराव २ वर्षांनंतर सन २०१४ रोजी पाठविण्यात आला. यामुळेच देवगड जामसंडे नगरपंचायत होण्यासाठी विलंब लागला आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असल्यानेच त्यांच्यामुळेच व माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच ही नगरपंचायत होण्यासाठी विलंब लागला आहे.