शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

देवगड नगरपंचायतीची आज अधिसूचना

By admin | Updated: October 20, 2015 23:35 IST

प्रमोद जठार : नीतेश राणेंना प्रत्युत्तर

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना २१ आॅक्टोबर रोजी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केली जाणार आहे. एक महिन्यानंतर या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक होईल. त्यामुळे लवकरच देवगड नगरपंचायतीबाबत कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.जठार म्हणाले की, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नगरपंचायतीची प्रसिद्धी नोटीस देणे महत्त्वाचे असते. ही नोटीस त्यावेळी दिली गेली नसल्याने २०१४ नंतर या नगरपंचायतीला विलंब लागला आहे. जिल्हा परिषदेच्या गलथान कारभारामुळेच देवगड नगरपंचायतीचा गेली तीन वर्ष टाइमपास शो झाला व आता ‘टाइमपास २’चा शो आमदार नीतेश राणे करत आहेत. नगरपंचायतीच्या प्रशासकीय कालावधीत देवगड जामसंडे पाणी प्रश्न नगरोत्थान योजनेमधून घेण्यात यावा, असा ठराव करून देवगडचा पाणीप्रश्नही निकाली निघणार आहे, असे जठार यांनी सांगितले. तारामुंबरी मिठमुंबरी पुलाला नवीन अंतर्गत पर्यायी रस्ता शोधल्याने या पुलाचेही काम येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू होणार असून, स्थानिकांना मोबदलाही योग्य मिळणार आहे. देवगड तालुक्यातील ८ खाडींवरील पूल उभारण्यासाठी शासनाकडे मागणी केली असल्याचेही जठार यांनी सांगितले. मोंड वानिवडे खाडीवरील पुलाचे बांधकाम करणे, जामसंडे पाटकरवाडी ते इळये वरणवाडी जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, फणसे पुरळ कलंबई जोडणाऱ्या खाडीवर पूल उभारणे, गिर्ये तरबंदर ते मोहुळ गाव जोडणाऱ्या खाडीवर पुलाचे बांधकाम करणे, वळीवंडे खराडा जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करणे, टेंबवली वानिवडे जोडणाऱ्या खाडीवर उंच पातळीच्या पुलाचे बांधकाम करणे, कोटकामते कुपलवाडी जोडणाऱ्या खाडीवर उंच पातळीच्या पुलाचे बांधकाम करणे, तालुक्यातील खाडीवरील पूल होणे महत्त्वाचे आहे. मंजुरी मिळण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे. तसेच या गावातील होणाऱ्या खाडीवरील पुलासाठी जमीनही पूल होण्याअगोदरच जिल्हा प्रशासनाने संपादन करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे जठार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)--काँग्रेसमुळेच विलंब : जठारदेवगड जामसंडे नगरपंचायतीची प्रारूप स्वरूपाची अधिसूचना १५ मे २०१२ रोजी निघाली होती. मात्र, या नगरपंचायतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव लागतो.हा ठराव २ वर्षांनंतर सन २०१४ रोजी पाठविण्यात आला. यामुळेच देवगड जामसंडे नगरपंचायत होण्यासाठी विलंब लागला आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असल्यानेच त्यांच्यामुळेच व माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच ही नगरपंचायत होण्यासाठी विलंब लागला आहे.