शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

देवगड नगरपंचायतीची आज अधिसूचना

By admin | Updated: October 20, 2015 23:35 IST

प्रमोद जठार : नीतेश राणेंना प्रत्युत्तर

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीची अंतिम अधिसूचना २१ आॅक्टोबर रोजी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध केली जाणार आहे. एक महिन्यानंतर या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक होईल. त्यामुळे लवकरच देवगड नगरपंचायतीबाबत कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.जठार म्हणाले की, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये नगरपंचायतीची प्रसिद्धी नोटीस देणे महत्त्वाचे असते. ही नोटीस त्यावेळी दिली गेली नसल्याने २०१४ नंतर या नगरपंचायतीला विलंब लागला आहे. जिल्हा परिषदेच्या गलथान कारभारामुळेच देवगड नगरपंचायतीचा गेली तीन वर्ष टाइमपास शो झाला व आता ‘टाइमपास २’चा शो आमदार नीतेश राणे करत आहेत. नगरपंचायतीच्या प्रशासकीय कालावधीत देवगड जामसंडे पाणी प्रश्न नगरोत्थान योजनेमधून घेण्यात यावा, असा ठराव करून देवगडचा पाणीप्रश्नही निकाली निघणार आहे, असे जठार यांनी सांगितले. तारामुंबरी मिठमुंबरी पुलाला नवीन अंतर्गत पर्यायी रस्ता शोधल्याने या पुलाचेही काम येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू होणार असून, स्थानिकांना मोबदलाही योग्य मिळणार आहे. देवगड तालुक्यातील ८ खाडींवरील पूल उभारण्यासाठी शासनाकडे मागणी केली असल्याचेही जठार यांनी सांगितले. मोंड वानिवडे खाडीवरील पुलाचे बांधकाम करणे, जामसंडे पाटकरवाडी ते इळये वरणवाडी जोडणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, फणसे पुरळ कलंबई जोडणाऱ्या खाडीवर पूल उभारणे, गिर्ये तरबंदर ते मोहुळ गाव जोडणाऱ्या खाडीवर पुलाचे बांधकाम करणे, वळीवंडे खराडा जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करणे, टेंबवली वानिवडे जोडणाऱ्या खाडीवर उंच पातळीच्या पुलाचे बांधकाम करणे, कोटकामते कुपलवाडी जोडणाऱ्या खाडीवर उंच पातळीच्या पुलाचे बांधकाम करणे, तालुक्यातील खाडीवरील पूल होणे महत्त्वाचे आहे. मंजुरी मिळण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी केली आहे. तसेच या गावातील होणाऱ्या खाडीवरील पुलासाठी जमीनही पूल होण्याअगोदरच जिल्हा प्रशासनाने संपादन करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे जठार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)--काँग्रेसमुळेच विलंब : जठारदेवगड जामसंडे नगरपंचायतीची प्रारूप स्वरूपाची अधिसूचना १५ मे २०१२ रोजी निघाली होती. मात्र, या नगरपंचायतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव लागतो.हा ठराव २ वर्षांनंतर सन २०१४ रोजी पाठविण्यात आला. यामुळेच देवगड जामसंडे नगरपंचायत होण्यासाठी विलंब लागला आहे. जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता असल्यानेच त्यांच्यामुळेच व माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच ही नगरपंचायत होण्यासाठी विलंब लागला आहे.