शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाचे उद्घाटन नाही, फक्त इमारतीचे - नारायण राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 17:48 IST

नारायण राणे म्हणाले, माझ्या कारकिर्दीत विमानतळाचे काम सुरू झाले. मात्र सत्ताधाऱ्यांना ते अजूनही पूर्ण करता आले नाही.  विमानतळाची अजून बरीच कामे बाकी आहेत.

सिंधुदुर्ग : चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन होत नाही, तर फक्त इमारतीचे उद्घाटन होत आहे. चिपी येथे विमान केव्हा उडेल याचा कोणताही थांगपत्ता नाही. तरीही शिवसेना भाजपाची मंडळी विमानतळाचे उद्घाटन करत असल्याचे सांगून जिल्हावासीयांची फसवणूक करीत आहेत, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी सोमवारी केली. येथील ओम गणेश निवासस्थानी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सतीश सावंत, डॉ.मिलिंद कुलकर्णी, सुदन बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, माझ्या कारकिर्दीत विमानतळाचे काम सुरू झाले. मात्र सत्ताधाऱ्यांना ते अजूनही पूर्ण करता आले नाही.  विमानतळाची अजून बरीच कामे बाकी आहेत. उद्या फक्त टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होत आहे. प्रत्यक्ष विमान कुठेपर्यंत अजून कसली कसली उद्घाटने करणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केला याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करीत आहोत. कोकणाला उद्ध्वस्त करणारा नानार प्रकल्प होता. हा प्रकल्प रद्द झाल्यामुळे तरुणांना रोजगार तसेच नोकऱ्या कशा मिळतील असा प्रश्न काही मंडळी उपस्थित करीत आहेत. पण जीवनच सुरक्षित राहणार नसेल तर प्रकल्पात काम कोण करणार असाही प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.

बेरोजगारांना  रोजगार देण्याची सरकारची मानसिकता नाही, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली. आडाळी येथे प्रदूषण विरहित प्रकल्प आणता आले असते. पण तेथे राज्य सरकारला एकही उद्योग आणता आलेला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पालक मंत्री दीपक केसरकर आडाळी येथे उद्योग उभारण्यासाठी गोव्यातील उद्योजकांना आवाहन करत आहेत. वस्तुतः आडाळी येथे एकही कारखाना अगर इमारत उभी राहिलेली नाही,  तर मग तेथे उद्योगपती रोजगार देणार कसे. देसाई आणि केसरकर हे रोजगाराच्या मुद्द्यावर सिंधुदुर्गवासियांची फसवणूक करीत आहेत. निवडणुकीपूर्वी एकालाही ही मंडळी रोजगार देऊ शकत नाहीत असेही नारायण राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे