शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

विमानतळाचे उद्घाटन नाही, फक्त इमारतीचे - नारायण राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 17:48 IST

नारायण राणे म्हणाले, माझ्या कारकिर्दीत विमानतळाचे काम सुरू झाले. मात्र सत्ताधाऱ्यांना ते अजूनही पूर्ण करता आले नाही.  विमानतळाची अजून बरीच कामे बाकी आहेत.

सिंधुदुर्ग : चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन होत नाही, तर फक्त इमारतीचे उद्घाटन होत आहे. चिपी येथे विमान केव्हा उडेल याचा कोणताही थांगपत्ता नाही. तरीही शिवसेना भाजपाची मंडळी विमानतळाचे उद्घाटन करत असल्याचे सांगून जिल्हावासीयांची फसवणूक करीत आहेत, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी सोमवारी केली. येथील ओम गणेश निवासस्थानी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सतीश सावंत, डॉ.मिलिंद कुलकर्णी, सुदन बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, माझ्या कारकिर्दीत विमानतळाचे काम सुरू झाले. मात्र सत्ताधाऱ्यांना ते अजूनही पूर्ण करता आले नाही.  विमानतळाची अजून बरीच कामे बाकी आहेत. उद्या फक्त टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होत आहे. प्रत्यक्ष विमान कुठेपर्यंत अजून कसली कसली उद्घाटने करणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केला याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करीत आहोत. कोकणाला उद्ध्वस्त करणारा नानार प्रकल्प होता. हा प्रकल्प रद्द झाल्यामुळे तरुणांना रोजगार तसेच नोकऱ्या कशा मिळतील असा प्रश्न काही मंडळी उपस्थित करीत आहेत. पण जीवनच सुरक्षित राहणार नसेल तर प्रकल्पात काम कोण करणार असाही प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.

बेरोजगारांना  रोजगार देण्याची सरकारची मानसिकता नाही, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली. आडाळी येथे प्रदूषण विरहित प्रकल्प आणता आले असते. पण तेथे राज्य सरकारला एकही उद्योग आणता आलेला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पालक मंत्री दीपक केसरकर आडाळी येथे उद्योग उभारण्यासाठी गोव्यातील उद्योजकांना आवाहन करत आहेत. वस्तुतः आडाळी येथे एकही कारखाना अगर इमारत उभी राहिलेली नाही,  तर मग तेथे उद्योगपती रोजगार देणार कसे. देसाई आणि केसरकर हे रोजगाराच्या मुद्द्यावर सिंधुदुर्गवासियांची फसवणूक करीत आहेत. निवडणुकीपूर्वी एकालाही ही मंडळी रोजगार देऊ शकत नाहीत असेही नारायण राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे