शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

विमानतळाचे उद्घाटन नाही, फक्त इमारतीचे - नारायण राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 17:48 IST

नारायण राणे म्हणाले, माझ्या कारकिर्दीत विमानतळाचे काम सुरू झाले. मात्र सत्ताधाऱ्यांना ते अजूनही पूर्ण करता आले नाही.  विमानतळाची अजून बरीच कामे बाकी आहेत.

सिंधुदुर्ग : चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन होत नाही, तर फक्त इमारतीचे उद्घाटन होत आहे. चिपी येथे विमान केव्हा उडेल याचा कोणताही थांगपत्ता नाही. तरीही शिवसेना भाजपाची मंडळी विमानतळाचे उद्घाटन करत असल्याचे सांगून जिल्हावासीयांची फसवणूक करीत आहेत, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी सोमवारी केली. येथील ओम गणेश निवासस्थानी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सतीश सावंत, डॉ.मिलिंद कुलकर्णी, सुदन बांदिवडेकर आदी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, माझ्या कारकिर्दीत विमानतळाचे काम सुरू झाले. मात्र सत्ताधाऱ्यांना ते अजूनही पूर्ण करता आले नाही.  विमानतळाची अजून बरीच कामे बाकी आहेत. उद्या फक्त टर्मिनल इमारतीचे उद्घाटन होत आहे. प्रत्यक्ष विमान कुठेपर्यंत अजून कसली कसली उद्घाटने करणार असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केला याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करीत आहोत. कोकणाला उद्ध्वस्त करणारा नानार प्रकल्प होता. हा प्रकल्प रद्द झाल्यामुळे तरुणांना रोजगार तसेच नोकऱ्या कशा मिळतील असा प्रश्न काही मंडळी उपस्थित करीत आहेत. पण जीवनच सुरक्षित राहणार नसेल तर प्रकल्पात काम कोण करणार असाही प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.

बेरोजगारांना  रोजगार देण्याची सरकारची मानसिकता नाही, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली. आडाळी येथे प्रदूषण विरहित प्रकल्प आणता आले असते. पण तेथे राज्य सरकारला एकही उद्योग आणता आलेला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पालक मंत्री दीपक केसरकर आडाळी येथे उद्योग उभारण्यासाठी गोव्यातील उद्योजकांना आवाहन करत आहेत. वस्तुतः आडाळी येथे एकही कारखाना अगर इमारत उभी राहिलेली नाही,  तर मग तेथे उद्योगपती रोजगार देणार कसे. देसाई आणि केसरकर हे रोजगाराच्या मुद्द्यावर सिंधुदुर्गवासियांची फसवणूक करीत आहेत. निवडणुकीपूर्वी एकालाही ही मंडळी रोजगार देऊ शकत नाहीत असेही नारायण राणे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे