शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

हे पालकमंत्री नव्हे , तर फक्त घोषणामंत्रीच : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:19 IST

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांची फसवेगिरी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. आम्ही सातत्याने आंदोलने करुन ते खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे काम करतात हे दाखवुन दिले आहे. पालकमंत्री हे केवळ घोषणामंत्री असून त्यांचा वेळोवेळी आम्ही पोलखोल केला आहे. महामार्ग प्रश्नी पुन्हा एकदा पालकमंत्र्यांचे आदेश प्रशासन आणि ठेकेदाराने केराच्या टोपलीत टाकले असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यानी केली आहे.

ठळक मुद्दे हे पालकमंत्री नव्हे , तर फक्त घोषणामंत्रीचकणकवलीत परशुराम उपरकर यांची केसरकरांवर टीका

कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांची फसवेगिरी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. आम्ही सातत्याने आंदोलने करुन ते खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे काम करतात हे दाखवुन दिले आहे. पालकमंत्री हे केवळ घोषणामंत्री असून त्यांचा वेळोवेळी आम्ही पोलखोल केला आहे. महामार्ग प्रश्नी पुन्हा एकदा पालकमंत्र्यांचे आदेश प्रशासन आणि ठेकेदाराने केराच्या टोपलीत टाकले असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यानी केली आहे.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शैलेंद्र नेरकर, संतोष सावंत उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले,महामार्ग चौपदरीकरण संदर्भात पालकमंत्री केसरकर यानी ३० जुन रोजी बैठक घेऊन महामार्गाचे काम होणार असल्याचे सांगत सर्व यंत्रणेला आपण सज्जड दम देऊन ठेकेदारावर कारवाई करणार असे वक्तव्य केले होते. तसेच मुंबई - गोवा महामार्ग पाहणीचा स्टंट करुन कणकवलीवासियांची व महामार्ग लगतच्या सर्वच प्रकल्पग्रस्तांची फसवणुक केली.

या पाहणी दौऱ्याची वृत्ते व छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि केसरकरांचे काम संपले. जे काम त्यांनी मार्च महीन्यामध्ये म्हणजेच पावसाळ्यापुर्वी करणे आवश्यक होते , त्याकडे दुर्लक्षच केले. महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींची जाणीव करुन घेणे व कामाला एप्रिल-मे मध्ये सुरुवात करण्याची गरज होती. मात्र पालकमंत्र्यानी जनतेला फसविले असुन करारामध्ये खड्डे भरण्याबाबत नोंद असतानाही हे काम ठेकेदाराने केले नाही. जनतेचा झालेला उद्रेक व सर्वपक्षीयांची एकजुट या दबावामुळे कामाला सुरुवात झाली. मात्र याचेही श्रेय पालकमंत्री हेच घेत असुन जनतेची दिशाभुल आणि फसवणुक करण्याचे काम ते करत असल्याचा टोला उपरकर यानी लगावला.पालकमंत्र्यांच्या घोषणांचे काय झाले ?पालकमंत्री दीपक केसरकर यानी कणकवलीतील १ हजार बीएसएनएलचे दूरध्वनी सुरु करण्याचे आदेश दिले होते. ते सुरु झाले का ? महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सुचना केल्या होत्या. ते भरले का? असा सवाल करताना उपरकर म्हणाले, खारेपाटण ते पत्रादेवी या दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केसरकरांनी दिलेल्या आदेशाला प्रत्यक्षात प्रशासन व ठेकेदार यानी केराची टोपली दाखविली आहे.ते पुढे म्हणाले, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक यानी खारेपाटण ते पत्रादेवी असा प्रवास गुरुवारी केला. त्यामुळे केसरकर यानी त्यांच्याकडुनच खड्ड्यांचा अहवाल घ्यावा असा उपरोधीक टोला लगावताना उपरकर म्हणाले, गेली साडेचार वर्षे जनतेचे प्रश्न सोडवु न शकलेले केसरकर हे केवळ घोषणा देण्यापुरतेच आहेत. ८०० जणांना नोकरीची त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नियुक्ती पत्रे दिला का?, सेट टॉप बॉक्स दिले का? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे.यावेळी पुन्हा ते गणपती विमानातुन आणणार कि प्रवाशांना आणणार असा सवाल करत आता केसरकरांचेच विसर्जन करण्याची वेळ जनतेवर आली असल्याचा टोलाही उपरकर यानी यावेळी लगावला. 

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग