शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

हे पालकमंत्री नव्हे , तर फक्त घोषणामंत्रीच : उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:19 IST

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांची फसवेगिरी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. आम्ही सातत्याने आंदोलने करुन ते खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे काम करतात हे दाखवुन दिले आहे. पालकमंत्री हे केवळ घोषणामंत्री असून त्यांचा वेळोवेळी आम्ही पोलखोल केला आहे. महामार्ग प्रश्नी पुन्हा एकदा पालकमंत्र्यांचे आदेश प्रशासन आणि ठेकेदाराने केराच्या टोपलीत टाकले असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यानी केली आहे.

ठळक मुद्दे हे पालकमंत्री नव्हे , तर फक्त घोषणामंत्रीचकणकवलीत परशुराम उपरकर यांची केसरकरांवर टीका

कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांची फसवेगिरी पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. आम्ही सातत्याने आंदोलने करुन ते खोटी आश्वासने देऊन जनतेला फसविण्याचे काम करतात हे दाखवुन दिले आहे. पालकमंत्री हे केवळ घोषणामंत्री असून त्यांचा वेळोवेळी आम्ही पोलखोल केला आहे. महामार्ग प्रश्नी पुन्हा एकदा पालकमंत्र्यांचे आदेश प्रशासन आणि ठेकेदाराने केराच्या टोपलीत टाकले असल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यानी केली आहे.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत शैलेंद्र नेरकर, संतोष सावंत उपस्थित होते. यावेळी परशुराम उपरकर म्हणाले,महामार्ग चौपदरीकरण संदर्भात पालकमंत्री केसरकर यानी ३० जुन रोजी बैठक घेऊन महामार्गाचे काम होणार असल्याचे सांगत सर्व यंत्रणेला आपण सज्जड दम देऊन ठेकेदारावर कारवाई करणार असे वक्तव्य केले होते. तसेच मुंबई - गोवा महामार्ग पाहणीचा स्टंट करुन कणकवलीवासियांची व महामार्ग लगतच्या सर्वच प्रकल्पग्रस्तांची फसवणुक केली.

या पाहणी दौऱ्याची वृत्ते व छायाचित्रे प्रसिद्ध झाली आणि केसरकरांचे काम संपले. जे काम त्यांनी मार्च महीन्यामध्ये म्हणजेच पावसाळ्यापुर्वी करणे आवश्यक होते , त्याकडे दुर्लक्षच केले. महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींची जाणीव करुन घेणे व कामाला एप्रिल-मे मध्ये सुरुवात करण्याची गरज होती. मात्र पालकमंत्र्यानी जनतेला फसविले असुन करारामध्ये खड्डे भरण्याबाबत नोंद असतानाही हे काम ठेकेदाराने केले नाही. जनतेचा झालेला उद्रेक व सर्वपक्षीयांची एकजुट या दबावामुळे कामाला सुरुवात झाली. मात्र याचेही श्रेय पालकमंत्री हेच घेत असुन जनतेची दिशाभुल आणि फसवणुक करण्याचे काम ते करत असल्याचा टोला उपरकर यानी लगावला.पालकमंत्र्यांच्या घोषणांचे काय झाले ?पालकमंत्री दीपक केसरकर यानी कणकवलीतील १ हजार बीएसएनएलचे दूरध्वनी सुरु करण्याचे आदेश दिले होते. ते सुरु झाले का ? महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सुचना केल्या होत्या. ते भरले का? असा सवाल करताना उपरकर म्हणाले, खारेपाटण ते पत्रादेवी या दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केसरकरांनी दिलेल्या आदेशाला प्रत्यक्षात प्रशासन व ठेकेदार यानी केराची टोपली दाखविली आहे.ते पुढे म्हणाले, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक यानी खारेपाटण ते पत्रादेवी असा प्रवास गुरुवारी केला. त्यामुळे केसरकर यानी त्यांच्याकडुनच खड्ड्यांचा अहवाल घ्यावा असा उपरोधीक टोला लगावताना उपरकर म्हणाले, गेली साडेचार वर्षे जनतेचे प्रश्न सोडवु न शकलेले केसरकर हे केवळ घोषणा देण्यापुरतेच आहेत. ८०० जणांना नोकरीची त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नियुक्ती पत्रे दिला का?, सेट टॉप बॉक्स दिले का? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे.यावेळी पुन्हा ते गणपती विमानातुन आणणार कि प्रवाशांना आणणार असा सवाल करत आता केसरकरांचेच विसर्जन करण्याची वेळ जनतेवर आली असल्याचा टोलाही उपरकर यानी यावेळी लगावला. 

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग