शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

"कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 05:17 IST

महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून कोकणाचा विकास होत आहे.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : महामार्ग रुंदीकरण, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय विकास, पर्यटन, हवाई सेवा या माध्यमातून कोकणाचा विकास होत आहे. त्यामुळे यापुढे कोकणात कोणताही विनाशकारी प्रकल्प येवू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. मात्र, रद्द झालेला नाणार रिफायनरी प्रकल्प रोह्यात होणार की नाही, यावर भाष्य टाळले.चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महादेव जानकर, खासदार नारायण राणे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, चिपीच्या परवानग्या मिळविण्यासाठी अनेक अडचणी होत्या. पण, सुरेश प्रभू यांनी विशेष परिश्रम घेऊन या विमानतळाच्या परवानग्यांचा मार्ग सुकर केला. हे विमानतळ हा पर्यायी विमानतळ म्हणूनही उत्तमप्रकारे काम करु शकेल.>जठारांचा राजीनामा फाडलानाणार प्रकल्प रद्द केल्याने संतप्त झालेले भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या पदाचा राजीनामा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सोपवला; मात्र मुख्यमंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा फाडून टाकला आणि फाडलेल्या कागदाचे तुकडे माजी आमदार राजन तेलींच्या हाती सोपविले. त्यामुळे जठार राजीनामा नाट्य औटघटकेचे ठरले आहे.>राणेंचे स्वप्न केसरकर पूर्ण करत आहेतचिपी विमानतळ व्हावा हे नारायण राणेंचे स्वप्न असून ते पूर्ण करण्याचे काम दीपक केसरकर हे करीत आहेत आणि माझा त्यांना पाठिंबा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच एकच हशां पिकला.>कोकणीपण हरवूदेऊ नका : राणेनारायण राणे म्हणाले, आता येथून लवकरच विमानसेवा सुरू करावी. नाणार रद्द केला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. कोकणात क्रांती करा, पण कोकणीपण हरवू देऊ नका.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे