शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

नीतेश राणेंनी अज्ञान प्रकट करु नये

By admin | Updated: December 28, 2015 00:42 IST

वैभव नाईक : नियोजन निधीबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे

कणकवली : जनतेने आमच्यावर टाकलेल्या विश्वासाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्या जबाबदारीनेच विधीमंडळात विविध १८ प्रश्न पटलावर आणले. त्यातील ५ प्रश्नांवर चर्चाही झाली. राज्यात सर्वांत जास्त मी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली असे सांगून आमदार नीतेश राणेंनी टीका करताना आपले अज्ञान प्रकट करू नये, असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले.आमदार नीतेश राणे यांनी आमदार नाईक यांच्यावर अधिवेशनातील कामकाजावरून टीका केली होती. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार नाईक यावर म्हणाले की, मोंड-वानिवडे पुलाबाबत एकदा तारांकित प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पुन्हा त्यावर अर्धा तास चर्चा मागून घेतली. जिल्हा नियोजनमधील अपुरा निधी मोंड पुलासाठी वापरण्यापेक्षा नाबार्डमधून घेणे संयुक्तिक आहे. हे आमदार नीतेश राणे यांना कळत नाही. त्यांनी जिल्हा नियोजनच्या निधीबाबत सतीश सावंत यांच्यासारख्या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्यावे. हक्कभंगाबाबत आमदार राणे यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. सभागृहाबाहेर केलेल्या वक्तव्यांबाबत हक्कभंग आणता येत नाही. नारायण राणे यांनी कित्येक वर्षे विधीमंडळात कामकाज अनुभवले असल्याने आमदार राणे यांच्याकडून असे विधान अपेक्षित नाही. पारंपरिक मच्छिमारांचा प्रश्न कोकणातील सर्व आमदारांच्या सहकार्याने मी सभागृहात मांडला आणि सविस्तर चर्चा घडवून आणली. त्याबद्दल मच्छिमारांनी माझा सत्कार केला. त्याबद्दल आमदार राणे यांना दु:ख का वाटावे? हे समजू शकत नाही. महामार्ग चौपदरीकरणाविरोधात नीतेश राणे यांनी वर्षभरापूर्वी आंदोलनाची भूमिका घेतली होती. आता सात-बारावर नोंदही झाली. तोपर्यंत आमदार राणे झोपले होते काय? असा प्रश्न करून प्रकल्पग्रस्तांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळावी यासाठी आपण सर्व लोकप्रतिनिधींंनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आमदार नाईक म्हणाले. देवगडमधील रिक्षाचालक संदीप कावले याचा मृत्यू दुर्दैवी आहे. आम्ही कावले कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. परंतु आंदोलनादरम्यान मतदारसंघाचे आमदार गोव्यात मौजमजा करत असताना देवगडमधील स्थानिक कार्यकर्त्यांना उगाचच भडकावत होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाविरोधात कारवाई होणे योग्य आहे. परंतु अनुचित प्रकार टाळणे आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक ठरते, असे आमदार नाईक म्हणाले. (प्रतिनिधी)मत्स्य विभागासाठी अडीच कोटीमच्छिमारांमधील वादामध्ये गस्तीनौकांचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. आतापर्यंत त्यासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात येत होती. आता पुरवणी मागण्यांमध्ये अडीच कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील रस्ते, साकव दुरूस्तीसाठी ३.६३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देवगड ग्रामीण रूग्णालयासाठी १६ लाख आणि कुडाळ ग्रामीण रूग्णालयासाठी ४५ लाखांची तरतूद झाली आहे. तर कुडाळ येथील महिला रूग्णालयासाठी ९० लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती आमदार नाईक यांनी दिली.