शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

 नीतेश राणे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक; पक्षश्रेष्ठींनी मागणी धुडकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 11:20 IST

लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जोमाने काम करेल. राष्ट्रवादीशी युती झाली तरी तिन्ही मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार असेल, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग प्रभारी राजन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार नीतेश राणे हे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांची मागणी धुडकावून लावली असल्याचा गौप्यस्फोटही भोसले यांनी केला.

ठळक मुद्दे नीतेश राणे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक; पक्षश्रेष्ठींनी मागणी धुडकावलीविधानसभेच्या तिन्ही जागा काँग्रेस लढणार : राजन भोसले

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जोमाने काम करेल. राष्ट्रवादीशी युती झाली तरी तिन्ही मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार असेल, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग प्रभारी राजन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार नीतेश राणे हे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांची मागणी धुडकावून लावली असल्याचा गौप्यस्फोटही भोसले यांनी केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसची नियोजन बैठक ओरोस येथे पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी आमदार तथा जिल्हा प्रभारी सुभाष चव्हाण, जिल्हाध्यक्ष विकास सावंत, नवीनचंद्र बांदिवडेकर, काका कुडाळकर, सोमनाथ टोमके, सर्फराज नाईक आदी उपस्थित होते.राजन भोसले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले नाही. त्याने खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आला तरी येथील तिन्ही जागांवर आमचाच उमेदवार असेल. तसे उपस्थित कार्यकर्त्यांच्या मागणीवरून ठरविले जाईल. तिन्ही जागांवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी संख्या फार मोठी आहे. केंद्रीय समिती यावर निर्णय घेणार आहे.

काँग्रेसने पुढील दोन महिन्यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्षांनी निरीक्षक नियुक्त केले आहेत. हे निरीक्षक प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जाऊन प्रचार यंत्रणा राबविणार आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांना पुन्हा आमच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे यावेळी भोसले यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीनंतर आमदार नीतेश राणे यांनी ह्यहातह्ण निशाणी मिळविण्याचा खूप प्रयत्न केला होता, असा आरोपही राजन भोसले यांनी केला आहे. नीतेश राणे हे काँग्रेसचे आमदार आहेत? असे विचारले असता भोसले यांनी त्यांनी काँग्रेस कधीच सोडली, असे सांगितले. तसेच पक्षांतर्गत कारवाई करून त्यांना मोठे का करावे ? तसेच त्यांना आम्ही पक्षाच्या कोणत्याही बैठकीला बोलवित नाही, असे भोसले यांनी सांगितले.

स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष भाजपचे खासदार आहेत. तरी भाजपचे ते ऐकत नाहीत. आमदार राणे काँग्रेसचे आमदार असताना काँग्रेसचे ऐकत नाहीत. त्यांचे नेमके धोरणच स्पष्ट होत नाही, असा टोलाही यावेळी भोसले यांनी लगावला.२८८ जागांवर आघाडी होणारयावेळी भोसले म्हणाले, शिवसेना-भाजपसह स्वाभिमानला मत म्हणजे मोदी-फडणवीस यांना मत असे आम्ही मतदारांना समजावून सांगणार आहोत. महाराष्ट्रातील २८८ जागांवर आघाडी होईल. त्यात राष्ट्रवादीला अन्य जिल्ह्यात जागा जास्त मिळतील. सिंधुदुर्गातच जागा मिळाली पाहिजे, असा नियम नाही, असेही भोसले यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. यावेळी सावंतवाडीमध्ये काँग्रेसला २७ हजार तर राष्ट्रवादीला ९ हजार मते मिळाली होती याकडेही भोसले यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग