शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

 नीतेश राणे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक; पक्षश्रेष्ठींनी मागणी धुडकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 11:20 IST

लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जोमाने काम करेल. राष्ट्रवादीशी युती झाली तरी तिन्ही मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार असेल, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग प्रभारी राजन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार नीतेश राणे हे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांची मागणी धुडकावून लावली असल्याचा गौप्यस्फोटही भोसले यांनी केला.

ठळक मुद्दे नीतेश राणे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक; पक्षश्रेष्ठींनी मागणी धुडकावलीविधानसभेच्या तिन्ही जागा काँग्रेस लढणार : राजन भोसले

सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पराभवाने खचून न जाता आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जोमाने काम करेल. राष्ट्रवादीशी युती झाली तरी तिन्ही मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार असेल, अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग प्रभारी राजन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार नीतेश राणे हे काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत, मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांची मागणी धुडकावून लावली असल्याचा गौप्यस्फोटही भोसले यांनी केला.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसची नियोजन बैठक ओरोस येथे पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी आमदार तथा जिल्हा प्रभारी सुभाष चव्हाण, जिल्हाध्यक्ष विकास सावंत, नवीनचंद्र बांदिवडेकर, काका कुडाळकर, सोमनाथ टोमके, सर्फराज नाईक आदी उपस्थित होते.राजन भोसले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले नाही. त्याने खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आला तरी येथील तिन्ही जागांवर आमचाच उमेदवार असेल. तसे उपस्थित कार्यकर्त्यांच्या मागणीवरून ठरविले जाईल. तिन्ही जागांवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांनी संख्या फार मोठी आहे. केंद्रीय समिती यावर निर्णय घेणार आहे.

काँग्रेसने पुढील दोन महिन्यांचे नियोजन केले आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्षांनी निरीक्षक नियुक्त केले आहेत. हे निरीक्षक प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जाऊन प्रचार यंत्रणा राबविणार आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांना पुन्हा आमच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे यावेळी भोसले यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीनंतर आमदार नीतेश राणे यांनी ह्यहातह्ण निशाणी मिळविण्याचा खूप प्रयत्न केला होता, असा आरोपही राजन भोसले यांनी केला आहे. नीतेश राणे हे काँग्रेसचे आमदार आहेत? असे विचारले असता भोसले यांनी त्यांनी काँग्रेस कधीच सोडली, असे सांगितले. तसेच पक्षांतर्गत कारवाई करून त्यांना मोठे का करावे ? तसेच त्यांना आम्ही पक्षाच्या कोणत्याही बैठकीला बोलवित नाही, असे भोसले यांनी सांगितले.

स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष भाजपचे खासदार आहेत. तरी भाजपचे ते ऐकत नाहीत. आमदार राणे काँग्रेसचे आमदार असताना काँग्रेसचे ऐकत नाहीत. त्यांचे नेमके धोरणच स्पष्ट होत नाही, असा टोलाही यावेळी भोसले यांनी लगावला.२८८ जागांवर आघाडी होणारयावेळी भोसले म्हणाले, शिवसेना-भाजपसह स्वाभिमानला मत म्हणजे मोदी-फडणवीस यांना मत असे आम्ही मतदारांना समजावून सांगणार आहोत. महाराष्ट्रातील २८८ जागांवर आघाडी होईल. त्यात राष्ट्रवादीला अन्य जिल्ह्यात जागा जास्त मिळतील. सिंधुदुर्गातच जागा मिळाली पाहिजे, असा नियम नाही, असेही भोसले यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. यावेळी सावंतवाडीमध्ये काँग्रेसला २७ हजार तर राष्ट्रवादीला ९ हजार मते मिळाली होती याकडेही भोसले यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग