शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

nisrga syclon- चक्रीवादळाने ३७ लाखांचे नुकसान, ५७ घरे, ७ गोठ्यांसह इतर मालमत्तांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:52 IST

निसर्ग चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरे, गोठे तसेच इतर खासगी व सार्वजनिक मालमत्तांना बसला आहे.

ठळक मुद्देचक्रीवादळाने ३७ लाखांचे नुकसान, ५७ घरे, ७ गोठ्यांसह इतर मालमत्तांची पडझडसार्वजनिक, खासगी मालमत्तांची मोठी हानी

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरे, गोठे तसेच इतर खासगी व सार्वजनिक मालमत्तांना बसला आहे.

सुदैवाने कोणतीही मनुष्य व पशुहानी झाली नसली तरी या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील तब्बल ५७ घरे, ७ गोठे व इतर मालमत्तांची पडझड होऊन तब्बल ३७ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अहवालात समोर आली आहे. सार्वजनिक व खासगी मालमत्तांची जास्त हानी झाली असून त्याची नुकसानी २४ लाख ५१ हजार एवढी आहे. चक्रीवादळामुळे नुकसानीचा आकडा एकदच वाढला आहे.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बुधवार ३ जून रोजी सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यात निसर्ग चक्रीवादळ धडकेल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार संपूर्ण दिवसभर या चक्रीवादळाने सिंधुदुर्गात धुमाकूळ घातला. विशेषत: किनारपट्टीच्या भागात मोठे तांडव उभे राहिले. समुद्र खवळलेला पहावयास मिळाला. समुद्रातील लाटांची उंचीही कमालीची वाढली होती. बुधवारी सायंकाळी उशिरा या चक्रीवादळाचा जोर ओसरला होता. मात्र, तत्पूर्वी जिल्ह्यात या चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून घरांवर कोसळणे, घरांची पडझड होणे यासारख्या घटना घडल्या होत्या.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती. कोणतेही जनावर या आपत्तीत दगावले नव्हते. जिल्हा प्रशासनाने त्वरित नुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले होते. त्यानुसार गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आला आहे.सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार पूर्णत: पडझड झालेल्या पक्क्या घरांची व कच्च्या घरांची संख्या दोन आहे. त्यांचे नुकसान ४ लाख २६ हजार ७०० एवढे आहे. अंशत: पडझड झालेल्या पक्क्या घरांची संख्या ३७ एवढी असून त्यांचे नुकसान पाच लाख ५६ हजार एवढे आहे. अंशत: पडलेल्या कच्च्या घरांची संख्या अठरा असून त्यांच्या नुकसानीची आकडेवारी २ लाख २६ हजार १०४ एवढी आहे. या वादळामुळे ७ गोठ्यांची पडझड झाली आहे. त्यांचे नुकसान ४२ हजार ४८० एवढे आहे.एका दुकानाची पडझड होऊन ५ हजारांचे नुकसान झाले आहे. मत्स्य व बंद विभागांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. अंगणवाडी इमारतीवर झाड पडल्यामुळे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचेही नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत जानवली कार्यालयाचे तसेच बोर्डवे येथील अंगणवाडी शाळेसमोरील प्रवेशद्वाराचे नुकसान झाले असून अशा ७ घटनांमधून २४ लाख ५१ हजार ४४० रुपयांचे नुकसान झाले आहे.लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांची गरजसिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात पंचनामे पूर्ण करून शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार पंचनामे पूर्ण झालेले आहेत. नुकसानीची आकडेवारीही ३७ लाखांपेक्षा जास्त आहे. तसा अहवालही शासनास पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पालकमंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.भात किंवा अन्य शेतीला फटका नाहीनिसर्ग चक्रीवादळाचा फटका हा भात अथवा अन्य शेतीला बसला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने एका अहवालाच्या माध्यमातून जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे बोटी, जाळी, प्रवासी वाहतूक नौकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. गेले दोन-तीन दिवस मान्सूनपूर्व पडलेल्या पावसाच्या जोरावर येथील शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे हाती घेतली आहेत. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्ग