शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भाजपकडून निवडणूक लढविण्यास सिंधुदुर्गातील नऊ जण इच्छूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 15:41 IST

भाजप हा घरणेशाहिवर चालणारा पक्ष नाही. सिंधुदुर्गातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या नऊ जणांचा मान ठेवण्यासाठी जिल्हा कोअर समितीसमोर आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येईल, त्यानंतर उमेदवारी बाबत निर्णय घेतला जाईल.

ठळक मुद्देप्रमोद जठार यांची माहिती स्वाभिमान पक्ष विलीनीकरणाचा निर्णय वरिष्ठ स्तरावरूनच

कणकवली : भाजप हा घरणेशाहिवर चालणारा पक्ष नाही. सिंधुदुर्गातूनविधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या नऊ जणांचा मान ठेवण्यासाठी जिल्हा कोअर समितीसमोर आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येईल. त्यानंतर उमेदवारी बाबत निर्णय घेतला जाईल.

नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणाबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतला जाईल. पक्षाच्या त्या निर्णयाला आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बांधील असू ,अशी भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे जाहीर केली.कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप वाहतुक शाखा आघाडी जिल्हाध्यक्ष शिशिर परुळेकर, बबलू सावंत, समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी प्रमोद जठार म्हणाले, कुडाळ येथे ३० ऑगस्ट रोजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील इच्छूक उमेदवारांची विविधांगी माहिती घेण्यात आली.

यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर, अतुल रावराणे, प्रमोद रावराणे , कुडाळ मतदारसंघातून अतुल काळसेकर, बाबा मोंडकर तर सावंतवाडी मतदार संघातून राजेंद्र म्हापसेकर, राजन तेली, स्मिता आठलेकर, स्नेहा कुबल यांनी उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे सांगितले. त्याबाबतचा अहवाल आमदार हळवणकर हे प्रदेशाध्यक्ष तसेच वरिष्ठांकडे देतील . त्यानंतर उमेदवारीचा निर्णय होईल .

या बैठकीच्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षातून भाजप मध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्याबाबत आपली मते मांडली. त्यातील काही सकारात्मक तर काही नकारात्मक होती. पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून घेण्यात आल्या असून त्याही वरिष्ठ स्तरावर मांडल्या जाणार आहेत.

आवश्यकता भासल्यास रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे. पक्षहीताच्या दृष्टीने तसेच पक्ष वाढीसाठी वरिष्ठांकडून जो निर्णय घेतला जाईल त्याच्याशी माझ्यासह सर्व पदाधिकारी बांधील राहणार आहेत.मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडी बघता नारायण राणे यांचा भाजप प्रवेश हा शिवसेनेच्या भूमिकेशी संबधित आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप युती कायम राहिली तर त्यांचा प्रवेश कठीण आहे.

विधानसभा निवडणूक जागा वाटपाच्या मुद्यावरून युती तुटली तर पक्षप्रवेशाचा विचार होऊ शकतो. असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला ज्या पदाधिकाऱ्यांचा विरोध असेल त्यांनी वैयक्तिकरित्या तो पक्ष श्रेष्ठींकडे मांडावा. भाजप मध्ये लोकशाही आहे. त्यामुळे त्यांचे मत ऐकून घेतले जाईल. मी जिल्हाध्यक्ष असल्याने माझी मते पक्षाशी बांधील असणार आहेत. असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.मी इच्छूक नाही !सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदार संघातून स्वबळावर निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे. जिल्ह्यातून तिन्ही भाजपचे आमदार निवडून आले तर जिल्हाध्यक्ष म्हणून माझेच श्रेय असणार आहे. पण , कणकवली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास मी इच्छूक नाही. अशी भूमिकाही प्रमोद जठार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.कोकणातील घरे कायमस्वरूपी उघडी रहावी !कोकणातील अनेक व्यक्ती कामधंद्या निमित्त मुंबई तसेच बाहेर गावी राहतात. त्यामुळे त्यांची घरे बंद असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ते गावी आल्याने ही घरे उघडली आहेत. त्यामुळे कोकणात मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होऊन येथील व्यक्तीना येथेच रोजगार उपलब्ध व्हावा. तसेच बंद असलेली येथील घरे कायमस्वरूपी उघडी राहावीत अशी प्रार्थना आपण गणराया जवळ करतो. असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाsindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठार