शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

cyclone : निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात ४ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:05 IST

निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यावर धडकले नाही, तरीही या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला आहे. या चक्रीवादळात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका जिल्ह्यातील वीज वितरण विभागाला बसला आहे. या विभागाचे सुमारे ३ कोटी रुपये एवढे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या वादळामुळे सार्वजनिक व खासगी मिळून तब्बल ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात ४ कोटींचे नुकसानवीज वितरण कंपनीला सर्वाधिक ३ कोटींचा फटका, नुकसानीचे पंचनामे पूर्ण

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळसिंधुदुर्ग जिल्ह्यावर धडकले नाही, तरीही या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला आहे. या चक्रीवादळात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका जिल्ह्यातील वीज वितरण विभागाला बसला आहे. या विभागाचे सुमारे ३ कोटी रुपये एवढे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या वादळामुळे सार्वजनिक व खासगी मिळून तब्बल ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशाच्या पश्चिम किनाऱ्याला निसर्ग या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला होता. हे वादळ कोकण किनारपट्टीवर आदळेल असा अंदाज होता. त्यामुळे गोव्यासह मुंबई पर्यंतच्या किनारपट्टीवर दक्षतेचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आवश्यक सर्व खबरदारी सर्व जिल्हा प्रशासनानी घेतली होती.या वादळाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यावरही होईल असा अंदाज होता. मात्र, हे चक्रीवादळ सरकत रायगडच्या दिशेने गेले आणि रायगड समुद्र किनाऱ्यावर आदळल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सिंधुदुर्ग जिल्हा या चक्रीवादळाच्या तडाख्यातून वाचला असला तरीही या वादळाचा बराच परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याला भोगावा लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही घरांची पडझड, विद्युत खांबांची पडझड, पाटबंधारे विभागाचे नुकसान, काजू कारखान्याचे नुकसान, झाडे उन्मळून पडणे असे प्रकार झाले. या निसर्ग चक्रीवादळाचे परिणाम आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील नुकसानीचे बऱ्यापैकी पंचनामे झाले आहेत.या नुकसानीमधे सर्वात जास्त विद्युत विभागाचे नुकसान झाले आहे. या विभागाचे सुमारे २ कोटी ८९ लाख ५३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर हे वादळ आणि पाऊस यामुळे जिल्ह्यातील बरीच घरे पूर्णत:, अंशत: कोसळली आहेत. यामुळे या सर्वांचे एकूण ३७ लाख १९ हजार ५०५ रुपये एवढे नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे नुकसान झाल्याने यापोटी ४२ हजार ४४० रुपयांचे, प्राथमिक आरोग्य केंद्राची पडझड होऊन ५ हजार, पाटबंधारे विभागाचे ६५ लाख रुपयांचे आणि काजू कारखान्यांचे २३ लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे.नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यतानिसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आले आहेत. या निसर्ग चक्रीवादळामुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम सर्वात जास्त विद्युत विभागावर झाला आहे.

जिल्ह्यात सोमवारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकूण ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांची नुकसानी झाली असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्यावतीने शासनास कळविण्यात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, ही आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता आहे. अजून बºयाच विभागांची माहिती येणे बाकी आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्ग