शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

cyclone : निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात ४ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:05 IST

निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यावर धडकले नाही, तरीही या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला आहे. या चक्रीवादळात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका जिल्ह्यातील वीज वितरण विभागाला बसला आहे. या विभागाचे सुमारे ३ कोटी रुपये एवढे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या वादळामुळे सार्वजनिक व खासगी मिळून तब्बल ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देनिसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यात ४ कोटींचे नुकसानवीज वितरण कंपनीला सर्वाधिक ३ कोटींचा फटका, नुकसानीचे पंचनामे पूर्ण

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळसिंधुदुर्ग जिल्ह्यावर धडकले नाही, तरीही या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला आहे. या चक्रीवादळात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका जिल्ह्यातील वीज वितरण विभागाला बसला आहे. या विभागाचे सुमारे ३ कोटी रुपये एवढे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या वादळामुळे सार्वजनिक व खासगी मिळून तब्बल ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांचे नुकसान झाले आहे.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशाच्या पश्चिम किनाऱ्याला निसर्ग या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला होता. हे वादळ कोकण किनारपट्टीवर आदळेल असा अंदाज होता. त्यामुळे गोव्यासह मुंबई पर्यंतच्या किनारपट्टीवर दक्षतेचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आवश्यक सर्व खबरदारी सर्व जिल्हा प्रशासनानी घेतली होती.या वादळाचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यावरही होईल असा अंदाज होता. मात्र, हे चक्रीवादळ सरकत रायगडच्या दिशेने गेले आणि रायगड समुद्र किनाऱ्यावर आदळल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सिंधुदुर्ग जिल्हा या चक्रीवादळाच्या तडाख्यातून वाचला असला तरीही या वादळाचा बराच परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्याला भोगावा लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही घरांची पडझड, विद्युत खांबांची पडझड, पाटबंधारे विभागाचे नुकसान, काजू कारखान्याचे नुकसान, झाडे उन्मळून पडणे असे प्रकार झाले. या निसर्ग चक्रीवादळाचे परिणाम आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील नुकसानीचे बऱ्यापैकी पंचनामे झाले आहेत.या नुकसानीमधे सर्वात जास्त विद्युत विभागाचे नुकसान झाले आहे. या विभागाचे सुमारे २ कोटी ८९ लाख ५३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर हे वादळ आणि पाऊस यामुळे जिल्ह्यातील बरीच घरे पूर्णत:, अंशत: कोसळली आहेत. यामुळे या सर्वांचे एकूण ३७ लाख १९ हजार ५०५ रुपये एवढे नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे नुकसान झाल्याने यापोटी ४२ हजार ४४० रुपयांचे, प्राथमिक आरोग्य केंद्राची पडझड होऊन ५ हजार, पाटबंधारे विभागाचे ६५ लाख रुपयांचे आणि काजू कारखान्यांचे २३ लाख रुपये एवढे नुकसान झाले आहे.नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यतानिसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आले आहेत. या निसर्ग चक्रीवादळामुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा परिणाम सर्वात जास्त विद्युत विभागावर झाला आहे.

जिल्ह्यात सोमवारपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एकूण ४ कोटी १५ लाख २२ हजार ९४५ रुपयांची नुकसानी झाली असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाच्यावतीने शासनास कळविण्यात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, ही आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता आहे. अजून बºयाच विभागांची माहिती येणे बाकी आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्ग