शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 11:14 IST

Narayan Surve Award Culture Sindhudurg- समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला .

ठळक मुद्देपुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कारसोशल मिडियाच्या आक्रमणापासून कवींनी दूर रहायला हवे -अजय कांडर

कणकवली : मराठीत खूप चांगली कविता लिहिली जात आहे. परंतु गुणवत्तेने लिहिणारे कवी आजच्या बाजारू व्यवस्थेपासून दूर राहून लिहित आहेत . त्यांना नव्या कवींनी जोडून घ्यायला हवे . सोशल मीडियाच्या काळात प्रसिद्धीपासून दूर राहू शकतो , तोच चांगली कविता लिहू शकतो . त्यामुळे सोशल मिडियाच्या आक्रमणापासून कवींनी दूर रहायला हवे, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले .समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला .

कलमठ आदर्श रेसिडेन्सी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कांडर बोलत होते. ते म्हणाले, मराठी साहित्यात आज चांगली कविता लिहिली जात आहे . बहिणाबाई ते आजच्या शरयू आसोलकर यांच्यापर्यंत कवयित्रींनी कविता समृद्ध केली . हाच गुणवत्तेचा धागा पकडून कवयित्री कविता शिर्के कविता लेखन करत आहेत . त्यामुळे त्यांना समाज साहित्य संघटना , सिंधुदुर्गतर्फे कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरवण्यात आले . समाज साहित्य संघटना यापुढील काळात अशा कवींची दखल घेऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करेल .कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कदम यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमाला समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संघटनेचे पदाधिकारी सूर्यकांत चव्हाण, मनिषा पाटील , किशोर वालावलकर , नीलम यादव , प्रमिता तांबे , मुल्ला , ॲड . मेघना सावंत आदी उपस्थित होत्या .कविता शिर्के म्हणाल्या, आपण माणूस आधुनिक झाला म्हणतो. पण , आपले विचार मात्र आधुनिक झाले नाहीत . त्यामुळे अनेक स्त्रियांची बरीच ऊर्जा पारंपरिक मानसिकतेत व्यर्थ होत जाते . एक सजग कवयित्री म्हणून मला नेहमी वाटत राहते की , स्त्रियांची अशी ऊर्जा वाया जाता नये. कोकणच्या मातीला साहित्याचा दर्प आहे . इथली माणसे , इथला निसर्ग माणसांना आपल्या प्रेमात पाडतो.

इथल्या भाषेतील गोडवा माणसाला माणूसपणावर विश्वास ठेवायला भाग पाडतो . आयुष्यात आपण कोणाच्या संगतीत राहतो व आपण काय वाचतो या दोनच गोष्टी आपले भविष्य ठरवत असतात . कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार देऊन तुम्ही मला कोकणच्या मातीशी जोडून घेतले . तुमच्या प्रत्येकाच्या मनातील आत्मियता पाहून मला वाटते हा पुरस्कार म्हणजे जणू माझ्या माहेरी माझी खणा नारळानेच तुम्ही ओटी भरलात .मातोंडकर म्हणाले , सिंधुदुर्गात आज अनेक साहित्य सांस्कृतिक चळवळी कार्यरत आहेत . अशावेळी अजूनही एक समाज साहित्य संघटना कशाला ? असा प्रश्न सहज पडेल . परंतु आताच्या काळात माणसाला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिक चळवळी निर्माण होणे गरजेचे आहे . या चळवळी समाजाला जोडल्या गेल्या पाहिजेत . त्यामुळे समाज साहित्य संघटना स्थापन करण्यात आली आहे .

या पहिल्याच कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला कविता शिर्के यांच्यासारख्या निष्ठेने कविता लिहिणाऱ्या कवयित्रीला नारायण सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात आला. याचे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून समाधान वाटत आहे. प्रास्ताविक नीलम यादव यांनी केले . सूत्रसंचालन प्रमिता तांबे यांनी तर आभार मनिषा पाटील यांनी मानले . 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग