शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

पुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 11:14 IST

Narayan Surve Award Culture Sindhudurg- समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला .

ठळक मुद्देपुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कारसोशल मिडियाच्या आक्रमणापासून कवींनी दूर रहायला हवे -अजय कांडर

कणकवली : मराठीत खूप चांगली कविता लिहिली जात आहे. परंतु गुणवत्तेने लिहिणारे कवी आजच्या बाजारू व्यवस्थेपासून दूर राहून लिहित आहेत . त्यांना नव्या कवींनी जोडून घ्यायला हवे . सोशल मीडियाच्या काळात प्रसिद्धीपासून दूर राहू शकतो , तोच चांगली कविता लिहू शकतो . त्यामुळे सोशल मिडियाच्या आक्रमणापासून कवींनी दूर रहायला हवे, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले .समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला .

कलमठ आदर्श रेसिडेन्सी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कांडर बोलत होते. ते म्हणाले, मराठी साहित्यात आज चांगली कविता लिहिली जात आहे . बहिणाबाई ते आजच्या शरयू आसोलकर यांच्यापर्यंत कवयित्रींनी कविता समृद्ध केली . हाच गुणवत्तेचा धागा पकडून कवयित्री कविता शिर्के कविता लेखन करत आहेत . त्यामुळे त्यांना समाज साहित्य संघटना , सिंधुदुर्गतर्फे कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरवण्यात आले . समाज साहित्य संघटना यापुढील काळात अशा कवींची दखल घेऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करेल .कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कदम यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमाला समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संघटनेचे पदाधिकारी सूर्यकांत चव्हाण, मनिषा पाटील , किशोर वालावलकर , नीलम यादव , प्रमिता तांबे , मुल्ला , ॲड . मेघना सावंत आदी उपस्थित होत्या .कविता शिर्के म्हणाल्या, आपण माणूस आधुनिक झाला म्हणतो. पण , आपले विचार मात्र आधुनिक झाले नाहीत . त्यामुळे अनेक स्त्रियांची बरीच ऊर्जा पारंपरिक मानसिकतेत व्यर्थ होत जाते . एक सजग कवयित्री म्हणून मला नेहमी वाटत राहते की , स्त्रियांची अशी ऊर्जा वाया जाता नये. कोकणच्या मातीला साहित्याचा दर्प आहे . इथली माणसे , इथला निसर्ग माणसांना आपल्या प्रेमात पाडतो.

इथल्या भाषेतील गोडवा माणसाला माणूसपणावर विश्वास ठेवायला भाग पाडतो . आयुष्यात आपण कोणाच्या संगतीत राहतो व आपण काय वाचतो या दोनच गोष्टी आपले भविष्य ठरवत असतात . कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार देऊन तुम्ही मला कोकणच्या मातीशी जोडून घेतले . तुमच्या प्रत्येकाच्या मनातील आत्मियता पाहून मला वाटते हा पुरस्कार म्हणजे जणू माझ्या माहेरी माझी खणा नारळानेच तुम्ही ओटी भरलात .मातोंडकर म्हणाले , सिंधुदुर्गात आज अनेक साहित्य सांस्कृतिक चळवळी कार्यरत आहेत . अशावेळी अजूनही एक समाज साहित्य संघटना कशाला ? असा प्रश्न सहज पडेल . परंतु आताच्या काळात माणसाला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिक चळवळी निर्माण होणे गरजेचे आहे . या चळवळी समाजाला जोडल्या गेल्या पाहिजेत . त्यामुळे समाज साहित्य संघटना स्थापन करण्यात आली आहे .

या पहिल्याच कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला कविता शिर्के यांच्यासारख्या निष्ठेने कविता लिहिणाऱ्या कवयित्रीला नारायण सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात आला. याचे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून समाधान वाटत आहे. प्रास्ताविक नीलम यादव यांनी केले . सूत्रसंचालन प्रमिता तांबे यांनी तर आभार मनिषा पाटील यांनी मानले . 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग