शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 11:14 IST

Narayan Surve Award Culture Sindhudurg- समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला .

ठळक मुद्देपुण्याच्या कवयित्री कविता शिर्के यांना नारायण सुर्वे पुरस्कारसोशल मिडियाच्या आक्रमणापासून कवींनी दूर रहायला हवे -अजय कांडर

कणकवली : मराठीत खूप चांगली कविता लिहिली जात आहे. परंतु गुणवत्तेने लिहिणारे कवी आजच्या बाजारू व्यवस्थेपासून दूर राहून लिहित आहेत . त्यांना नव्या कवींनी जोडून घ्यायला हवे . सोशल मीडियाच्या काळात प्रसिद्धीपासून दूर राहू शकतो , तोच चांगली कविता लिहू शकतो . त्यामुळे सोशल मिडियाच्या आक्रमणापासून कवींनी दूर रहायला हवे, असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले .समाज साहित्य संघटना आणि कवी लेखक संघटना सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणारा कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार अजय कांडर यांच्या हस्ते पुणे शिरुर येथील कवयित्री कविता शिर्के यांना शनिवारी प्रदान करण्यात आला .

कलमठ आदर्श रेसिडेन्सी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात कांडर बोलत होते. ते म्हणाले, मराठी साहित्यात आज चांगली कविता लिहिली जात आहे . बहिणाबाई ते आजच्या शरयू आसोलकर यांच्यापर्यंत कवयित्रींनी कविता समृद्ध केली . हाच गुणवत्तेचा धागा पकडून कवयित्री कविता शिर्के कविता लेखन करत आहेत . त्यामुळे त्यांना समाज साहित्य संघटना , सिंधुदुर्गतर्फे कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरवण्यात आले . समाज साहित्य संघटना यापुढील काळात अशा कवींची दखल घेऊन त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करेल .कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कदम यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कार्यक्रमाला समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संघटनेचे पदाधिकारी सूर्यकांत चव्हाण, मनिषा पाटील , किशोर वालावलकर , नीलम यादव , प्रमिता तांबे , मुल्ला , ॲड . मेघना सावंत आदी उपस्थित होत्या .कविता शिर्के म्हणाल्या, आपण माणूस आधुनिक झाला म्हणतो. पण , आपले विचार मात्र आधुनिक झाले नाहीत . त्यामुळे अनेक स्त्रियांची बरीच ऊर्जा पारंपरिक मानसिकतेत व्यर्थ होत जाते . एक सजग कवयित्री म्हणून मला नेहमी वाटत राहते की , स्त्रियांची अशी ऊर्जा वाया जाता नये. कोकणच्या मातीला साहित्याचा दर्प आहे . इथली माणसे , इथला निसर्ग माणसांना आपल्या प्रेमात पाडतो.

इथल्या भाषेतील गोडवा माणसाला माणूसपणावर विश्वास ठेवायला भाग पाडतो . आयुष्यात आपण कोणाच्या संगतीत राहतो व आपण काय वाचतो या दोनच गोष्टी आपले भविष्य ठरवत असतात . कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार देऊन तुम्ही मला कोकणच्या मातीशी जोडून घेतले . तुमच्या प्रत्येकाच्या मनातील आत्मियता पाहून मला वाटते हा पुरस्कार म्हणजे जणू माझ्या माहेरी माझी खणा नारळानेच तुम्ही ओटी भरलात .मातोंडकर म्हणाले , सिंधुदुर्गात आज अनेक साहित्य सांस्कृतिक चळवळी कार्यरत आहेत . अशावेळी अजूनही एक समाज साहित्य संघटना कशाला ? असा प्रश्न सहज पडेल . परंतु आताच्या काळात माणसाला समृद्ध करण्यासाठी अनेक साहित्यिक चळवळी निर्माण होणे गरजेचे आहे . या चळवळी समाजाला जोडल्या गेल्या पाहिजेत . त्यामुळे समाज साहित्य संघटना स्थापन करण्यात आली आहे .

या पहिल्याच कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला कविता शिर्के यांच्यासारख्या निष्ठेने कविता लिहिणाऱ्या कवयित्रीला नारायण सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात आला. याचे या संस्थेचा अध्यक्ष म्हणून समाधान वाटत आहे. प्रास्ताविक नीलम यादव यांनी केले . सूत्रसंचालन प्रमिता तांबे यांनी तर आभार मनिषा पाटील यांनी मानले . 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग