शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
2
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
5
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
6
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
7
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
9
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
10
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
11
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
12
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
13
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
14
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
15
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
16
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
17
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
18
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
19
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
20
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव

लोकसभेला संधी देण्यासाठीच राणेंना राज्यसभेवर घेतले नसावे - दीपक केसरकर

By अनंत खं.जाधव | Published: March 26, 2024 12:29 PM

राणेंच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेवर घेतले नाही.याचा अर्थ त्यांना लोकसभेवर संधी द्याची असेल जर त्यांना संधी दिली तर राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने केंद्रातून मोठ्याप्रमाणात निधी मिळेल असे म्हणत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून राणेंच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी केसरकर यांनी किरण सामंत यांचा लोकसंपर्क दाडगा आहे.त्यामुळे कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आपण प्रत्येक गावात जाऊन प्रचार करणार असेही स्पष्ट केले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,रूपेश पावसकर उपस्थित होते.केसरकर म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षासाठी उमेदवारी मागणं हा त्यांचा हक्क आहे. आम्हीही जागा शिवसेनेसाठी मिळावी यासाठी आग्रही आहोत. पराभव डोळ्यासमोर असल्याने ठाकरे गटाकडे न मागता उमेदवारी जाहीर होते. मात्र निवडून येणाऱ्या जागेसाठी अनेकजण इच्छुक असतात. आमच्याकडेही महायुतीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी जाहीर करण्यात उशीर होत आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार राऊत यांनी गेल्या  १० वर्षात कोणतेही विकास काम केले नाही. त्यामुळे येथील जनतेत त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. त्यावेळी आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळेच व आमच्या मदतीमुळेच ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यांना उपकाराची जाण नसल्यानेच व पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने ते आता आमच्याविरोधात बेताल बडबड करीत आहेत. भाषणं करून काहीही बोलून टाळ्या घेणं सोपं असतं. लवकरच त्यांच्याकडे एवढा वेळ असेल की त्यांना केवळ भाषण करीतच फिरावं लागेल, असा टोला ही केसरकर यांनी लगावला तसेच राऊत यांचा पराभव निश्चित असल्याचे सांगितले. पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने विनायक राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळेच ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंडळींना एकत्र करून गोळा बेरीज करण्याचा  प्रयत्न करीत आहेत. सध्या शिमगोत्सव सुरू आहे. आरोपांचा हा धुरळा केवळ काही दिवसांपुरता आहे. शिमगोत्सव आठ ते पंधरा दिवस चालतो. धुरळा एकदाचा खाली बसल्यावर राऊत खरे काय आहेत हे येथील जनतेला समजेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

महिलांवर होणारा अन्याय दूर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेते असून त्यांची आज देशाला गरज आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचा निर्णयामुळे तेथे लोकशाही प्रस्थापित झाली. तीन तलाख विरोधातील कायदा करून मुस्लिम महिलांवर होणारा अन्याय त्यांनी दूर केला. 

जनतेला मोफत धान्यआज देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य वितरित केले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा होत आहे.  त्यांच्या अशा निर्णयांमुळेच पाकव्याप्त काश्मीर मधील लोक भारतात येण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. लोकशाही नेत्यावर जनतेचा विश्वास असावा लागतो. लोकांची मन जिंकता आली तरच तुम्ही जिंकू शकता. त्यामुळे देशातील जनता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भरभरून मतदान करेल असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे lok sabhaलोकसभाDipak Kesarkarदीपक केसरकर