शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

"नारायण राणे सर्वात निष्क्रिय केंद्रीय मंत्री, लवकरच त्यांचं मंत्रिपद जाणार’’ विनायक राऊतांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 16:59 IST

Vinayak Raut Criticize Narayan Rane: शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून, आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. त्याला आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सिंधुदुर्ग - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. शिवसेनेत उभी फूट पडून ठाकरेंचं मुख्यमंत्रिपद गेल्यापासून ठाकरेंचे कट्टर वैरी असलेल्या नारायण राणे आणि त्यांच्या मुलांकडून शिवसेनेवर बोचरी टीका करण्यात येत आहे. शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून, मुख्यमंत्री असताना त्याना सरकार वाचवता आले नाही.यांच्या सारखे दुर्देव ते काय आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी टीका नारायण राणेंनी केली होती. त्याला आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणे हे मोदी सरकारमधील सर्वात निष्क्रिय केंद्रीय मंत्री आहेत.  लवकरच त्यांचं मंत्रिपद जाईल, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.

विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणेंच्या दुकानाचं शटर पूर्ण बंद झालेलं आहे, त्याचं त्यांनी अवलोकन करावं. कालपरवापर्यंत माझा मुलगा पालकमंत्री होईल, अशा मिटक्या राणे मारत होते. मात्र आता दीपक केसरकरांच्या रूपात नितेश राणेंना त्यांची जागा दाखवली जाईल. तसेच  भाजपासुद्धा नारायण राणेंचं मंत्रिपद काही महिन्यात काढून घेईल. या देशातील सर्वात निष्क्रिय केंद्रीय मंत्री म्हणून नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नारायण राणेंची नोंद झाली आहे, असं मला कळलं आहे. त्यामुळे राणेंनी शिवसेनेला शहाणपणा शिकवू नये, स्वत:चं दुकान चालू राहतंय की बंद होतंय याचा त्यांनी विचार करावा, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेवर ही वेळ आली आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले की, नारायण राणेंना शिवसेनेवर बोलायला तोंड आहे का? गद्दारी, बेईमानी, कृतघ्नपणा ज्यांच्या माध्यमातून निर्माण झाला त्या नारायण राणेंनी शिवसेनेची काळजी करण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांचं उर्वरित राजकीय आयुष्य दोन अहीमही रावणांना घेऊन कसं वाचेल याची चिंता त्यांनी करावी, असा टोलाही राऊत यांनी नारायण राणेंना लगावला.

शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह पक्षाकडेच राहील, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने सर्व निकषांची पूर्तता केल्यावर  दिलेलं आहे. त्या अशा बाटग्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. निवडणूक आयोगाने तशी विचारणा केली तर त्याची संपूर्ण कायदेशीर पूर्तता करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे, असे विनायक राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा