शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:33 IST

कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. ...

ठळक मुद्देसावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेधमुख्यमंत्र्यांना थंडी वाजत होती की लाज?

कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थंडी लागत होती की, त्यांना लाज वाटत होती? असा खडा सवाल माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा त्यांनी यावेळी जाहीर निषेध केला.लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.खासदार राणे म्हणाले, सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. दोन वेळा जन्मठेपेची शिक्षाही भोगली. अनेक वर्षे तुरुंगवासही भोगला. अशा राष्ट्रपुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत आमच्या भाजपाच्या आमदारांनी मांडला. मात्र, नियमात बसत नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव विधानसभेत येऊ दिला नाही. अशावेळी मुख्यमंत्री ठाकरे काय करीत होते? त्यांना थंडी वाजत होती की, लाज वाटत होती? सभागृहात सावरकरांच्या योगदानाएवढे कोणाचे योगदान आहे का? असे सवाल राणेंनी उपस्थित केले. खरेतर सभागृहात अनेक नियमात नसणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टींवर यापूर्वी अनेकदा चर्चा करण्यात आली. सावरकर यांच्याही अभिवादनाचा ठराव घेतला पाहिजे होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.मात्र शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्हीही पक्ष एकत्र आले ते राज्याच्या भल्यासाठी नाहीतर केवळ सत्तेसाठी व पैसे लाटण्यासाठी आले आहेत. यांना राष्ट्रपुरुषांबद्दल कोणतीही आस्था नाही, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.केवळ मासे कसे खायचे याची माहिती असणाऱ्या मत्स्यमंत्र्यांना मच्छिमारांचे प्रश्न, मासेमारी याबाबतचे प्रश्न माहीत नाहीत आणि ते मत्स्य दुष्काळ नाही असे जाहीर करतात, हे अत्यंत चुकीचे असून येथील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.मागील साडेसोळा कोटी रुपयांची नुकसान भरपाई अजूनही हे सरकार मच्छिमारांना देऊ शकले नाहीत. मच्छिमारांचे प्रश्न या सरकारला माहीत नाहीत. मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे सरकारने केले आहे. आता मत्स्यदुष्काळ जाहीर करत नाही तोपर्यंत विरोधीपक्ष शांत बसणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला.उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची घोषणा फसवीशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे ठणकावून सांगणारे मुख्यमंत्री ठाकरे कर्जमाफीची फक्त घोषणा करून शांत बसले आहेत. तर शेतकरी कर्जमाफी कधी मिळणार याची पाहताहेत वाट पाहत आहेत. पण उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची घोषणा फसवी आहे.राज्याची तिजोरी रिकामी असताना पर्यटन मंत्री निधी देणार असल्याची घोषणा कशाच्या आधारे करतात? घोषणा करण्यापूर्वी त्यांनी अर्थमंत्र्यांना तरी विचारले का? असाही सवाल राणेंनी उपस्थित करीत हे सरकार व ठाकरे काहीच करू शकत नाहीत, असा टोलाही लगावला.आता विमानतळ १ मे रोजी सुरू होतो का ते पाहणार आहे. जिल्ह्यातील प्रकल्प, विकासकामे बंदावस्थेत असून गेल्या पाच वर्षात खासदार विनायक राऊत यांनी एकही विकासकाम केले नाही. उलट ते ठेकेदारांजवळ पैसे मागत आहेत. म्हणूनच ठेकेदार पळवून जात असून राऊत ज्या ठेकेदारांजवळ पैसे मागताहेत त्याची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा राणेंनी राऊत यांना दिला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्गVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर