शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

'मुक्या मुख्यमंत्र्यां'मुळे महाराष्ट्र अधोगतीकडे; नारायण राणेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 10:42 IST

ज्या माणसाकडे देवाला द्यायला वेळ नाही तो जनतेला काय देणार ? स्थगिती सरकारने तीन महिन्यांत कोणती विकासकामे केली हे सांगावे,असे राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग ( मालवण ): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणच्या विकासावर भाष्य न करता कोकणी जनतेची घोर निराशा केली आहे. 'मुक्या मुख्यमंत्र्यां'मुळे महाराष्ट्र राज्य अधोगतीकडे चालले आहे. ठाकरेंनी जनतेला दिलेली आश्वासने न पाळता सर्व कामांना स्थगिती देऊन मंत्रालयात भ्रष्टाचाराची दुकाने सरु केली आहेत. ठेकेदाराला बोलावून तोडपाणीची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या कोणत्याही अपेक्षा नाहीत. हे सरकार गेल्याशिवाय राज्यात चांगले दिवस येणार नाहीत, असा घणाघात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केला.

आंगणेवाडी यात्रोत्सवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाविकांशी संवाद साधला नाही. याबाबत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रहार केले. उद्धव ठाकरेंचे कोकणच्या विकासाला काय योगदान आहे? असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांमध्ये पैसे काढून देण्याची क्षमता नाही. त्यामुळे भराडी देवीने राज्यात लोककल्याणकारी राज्य निर्माण होण्यासाठी आशीर्वाद द्यावेत, असा टोला राणेंनी लगावला.

मुख्यमंत्री ज्या दौऱ्यावर जातात त्याठिकाणी विकासासाठी भरघोस निधी देऊन जातात, असा अलिखित नियम आहे. मात्र, राज्याचा मुका मुख्यमंत्री आंगणेवाडीत पाहुण्यासारखा आला आणि दर्शन घेऊन निघून गेला. ज्या माणसाकडे देवाला द्यायला वेळ नाही तो जनतेला काय देणार ? स्थगिती सरकारने तीन महिन्यांत कोणती विकासकामे केली हे सांगावे,असे राणे म्हणाले.

मी मुख्यमंत्री असताना जे दिले ते या मुख्यमंत्र्याला लिहून काढता येणार नाही. मी कॅबिनेट मंत्री असताना सिंधुदुर्गात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्गसाठी ५ हजार २२५ कोटी रुपये दिले. आता पुन्हा सिंधुदुर्गात होणाऱ्या मिनी कॅबिनेटमध्ये दोन मंत्र्यांची बैठक आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला किती निधी मिळणार हे पाहू, असेही राणे म्हणाले.

विकासकामांवरच्या स्थगिती उठवा

शब्दाला न जागणारा माणूस, दिशाभूल करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या कोणत्याच अपेक्षा नाहीत. त्यांनी केवळ विकासकामांना दिलेल्या स्थगिती उठवाव्यात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा नियोजनमधून २२५ कोटींची केलेली कपात रद्द करुन भरघोस निधी द्यावा, असे राणेंनी सांगताना नाणार प्रकल्प करणार नाही, असे सांगणारे ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या मुखपत्रात जाहिरात देऊन नाणार येथेच प्रकल्प होत असल्याचे दाखवून दिले आहे. अशीही टीका केली.