शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नाणार प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 16:28 IST

नाणार रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार आहे. कोणाचेही समर्थन त्या प्रकल्पाला असले तरी कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही होऊ देणार नाही. काही लोकांना त्या प्रकल्पाचे समर्थन कोणीतरी करायला लावत आहे. कदाचित त्यामध्ये त्यांचे हितसंबध गुंतलेले असू शकतील. या प्रकल्पाला एका बाजूला विविध परवानग्या द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला विरोध करायचा हा शिवसेनेचा दुतोंडीपणा आहे. जनता हे सर्व ओळखून असून शिवसेनेला आता तोंड दाखवायला जागा उरलेली नाही.अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केली.

ठळक मुद्देनाणार प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार : राणे शिवसेनेला तोंड दाखवायला जागा नाही : नारायण राणे यांची टीका

कणकवली : नाणार रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार आहे. कोणाचेही समर्थन त्या प्रकल्पाला असले तरी कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही होऊ देणार नाही. काही लोकांना त्या प्रकल्पाचे समर्थन कोणीतरी करायला लावत आहे. कदाचित त्यामध्ये त्यांचे हितसंबध गुंतलेले असू शकतील. या प्रकल्पाला एका बाजूला विविध परवानग्या द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला विरोध करायचा हा शिवसेनेचा दुतोंडीपणा आहे. जनता हे सर्व ओळखून असून शिवसेनेला आता तोंड दाखवायला जागा उरलेली नाही.अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केली.कणकवली येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. यावेळी नारायण राणे पुढे म्हणाले, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पक्ष स्थापनेनंतर ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे.

या निवडणुकीत राज्यातील काही जागा आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधून निलेश राणेंचे नाव यापूर्वीच जाहीर केले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर आमची रणनीती जाहीर केली जाईल. आम्हाला सर्वदृष्टीने पोषक वातावरण आहे. या निवडणुकीत शिवसेना सोडून इतर सर्व पक्षांची मदत घेतली जाईल. इतर पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशी त्याबाबत मी बोलणार आहे.शिवसेना - भाजपची युती त्यांच्या कार्यकर्त्यांना पसंत नाही.जिल्ह्याजिल्ह्यात सेना भाजपमध्ये असंतोष आहे . या सर्व परिस्थितीचा फायदा अन्य उमेदवारांना होणार आहे त्यात आमचाही समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ तसेच अन्य प्रकल्प रेंगाळले आहेत. हे शिवसेनेच्या पालकमंत्र्यांचे अपयश आहे.

शिवसेनेचे खासदार, आमदार असतानाही ते तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलेले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद त्यांच्याकडे असून तेथील विकास म्हणावा तसा झाला नाही. रत्नागिरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्या पेक्षा कमी आहे सर्वच क्षेत्रात तो जिल्हा पिछाडीवर आहे. त्याला शिवसेनाच जबाबदार आहे. त्याचा फटका त्यांना बसेल. असेही नारायण राणे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोअर कमिटी व काही नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांनी यावेळी जाहीर केल्या.स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा वेगळा !महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे इतर उमेदवार आचारसंहिता लागू झाल्यावर जाहीर करण्यात येतील. भाजपच्या जाहीरनामा बनविण्याच्या समितीत त्यांनी मला घेतले आहे. मात्र , माझा पक्ष वेगळा आहे .हे कदाचित त्यांच्या लक्षात आले नसेल. पण, या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा वेगळा असेल ,असे नारायण राणे यांनी यावेळी जाहीर केले.निवडणुकीनंतर भाजपलाच मदत!या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. फक्त शिवसेना म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी नव्हे. त्यामुळे मोदी गटासोबत आम्ही आहोत. निवडणुकीनंतर भाजपला निश्चितच मदत करण्यात येईल, असे नारायण राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान स्पष्ट केले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे