शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

नाणार प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 16:28 IST

नाणार रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार आहे. कोणाचेही समर्थन त्या प्रकल्पाला असले तरी कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही होऊ देणार नाही. काही लोकांना त्या प्रकल्पाचे समर्थन कोणीतरी करायला लावत आहे. कदाचित त्यामध्ये त्यांचे हितसंबध गुंतलेले असू शकतील. या प्रकल्पाला एका बाजूला विविध परवानग्या द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला विरोध करायचा हा शिवसेनेचा दुतोंडीपणा आहे. जनता हे सर्व ओळखून असून शिवसेनेला आता तोंड दाखवायला जागा उरलेली नाही.अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केली.

ठळक मुद्देनाणार प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार : राणे शिवसेनेला तोंड दाखवायला जागा नाही : नारायण राणे यांची टीका

कणकवली : नाणार रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार आहे. कोणाचेही समर्थन त्या प्रकल्पाला असले तरी कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही होऊ देणार नाही. काही लोकांना त्या प्रकल्पाचे समर्थन कोणीतरी करायला लावत आहे. कदाचित त्यामध्ये त्यांचे हितसंबध गुंतलेले असू शकतील. या प्रकल्पाला एका बाजूला विविध परवानग्या द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला विरोध करायचा हा शिवसेनेचा दुतोंडीपणा आहे. जनता हे सर्व ओळखून असून शिवसेनेला आता तोंड दाखवायला जागा उरलेली नाही.अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केली.कणकवली येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. यावेळी नारायण राणे पुढे म्हणाले, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पक्ष स्थापनेनंतर ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे.

या निवडणुकीत राज्यातील काही जागा आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधून निलेश राणेंचे नाव यापूर्वीच जाहीर केले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर आमची रणनीती जाहीर केली जाईल. आम्हाला सर्वदृष्टीने पोषक वातावरण आहे. या निवडणुकीत शिवसेना सोडून इतर सर्व पक्षांची मदत घेतली जाईल. इतर पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशी त्याबाबत मी बोलणार आहे.शिवसेना - भाजपची युती त्यांच्या कार्यकर्त्यांना पसंत नाही.जिल्ह्याजिल्ह्यात सेना भाजपमध्ये असंतोष आहे . या सर्व परिस्थितीचा फायदा अन्य उमेदवारांना होणार आहे त्यात आमचाही समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ तसेच अन्य प्रकल्प रेंगाळले आहेत. हे शिवसेनेच्या पालकमंत्र्यांचे अपयश आहे.

शिवसेनेचे खासदार, आमदार असतानाही ते तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलेले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद त्यांच्याकडे असून तेथील विकास म्हणावा तसा झाला नाही. रत्नागिरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्या पेक्षा कमी आहे सर्वच क्षेत्रात तो जिल्हा पिछाडीवर आहे. त्याला शिवसेनाच जबाबदार आहे. त्याचा फटका त्यांना बसेल. असेही नारायण राणे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोअर कमिटी व काही नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांनी यावेळी जाहीर केल्या.स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा वेगळा !महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे इतर उमेदवार आचारसंहिता लागू झाल्यावर जाहीर करण्यात येतील. भाजपच्या जाहीरनामा बनविण्याच्या समितीत त्यांनी मला घेतले आहे. मात्र , माझा पक्ष वेगळा आहे .हे कदाचित त्यांच्या लक्षात आले नसेल. पण, या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा वेगळा असेल ,असे नारायण राणे यांनी यावेळी जाहीर केले.निवडणुकीनंतर भाजपलाच मदत!या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. फक्त शिवसेना म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी नव्हे. त्यामुळे मोदी गटासोबत आम्ही आहोत. निवडणुकीनंतर भाजपला निश्चितच मदत करण्यात येईल, असे नारायण राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान स्पष्ट केले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे