शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

नाणार प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 16:28 IST

नाणार रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार आहे. कोणाचेही समर्थन त्या प्रकल्पाला असले तरी कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही होऊ देणार नाही. काही लोकांना त्या प्रकल्पाचे समर्थन कोणीतरी करायला लावत आहे. कदाचित त्यामध्ये त्यांचे हितसंबध गुंतलेले असू शकतील. या प्रकल्पाला एका बाजूला विविध परवानग्या द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला विरोध करायचा हा शिवसेनेचा दुतोंडीपणा आहे. जनता हे सर्व ओळखून असून शिवसेनेला आता तोंड दाखवायला जागा उरलेली नाही.अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केली.

ठळक मुद्देनाणार प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार : राणे शिवसेनेला तोंड दाखवायला जागा नाही : नारायण राणे यांची टीका

कणकवली : नाणार रिफायनरी प्रकल्पाला आमचा विरोध कायमच राहणार आहे. कोणाचेही समर्थन त्या प्रकल्पाला असले तरी कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही होऊ देणार नाही. काही लोकांना त्या प्रकल्पाचे समर्थन कोणीतरी करायला लावत आहे. कदाचित त्यामध्ये त्यांचे हितसंबध गुंतलेले असू शकतील. या प्रकल्पाला एका बाजूला विविध परवानग्या द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला विरोध करायचा हा शिवसेनेचा दुतोंडीपणा आहे. जनता हे सर्व ओळखून असून शिवसेनेला आता तोंड दाखवायला जागा उरलेली नाही.अशी टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी येथे केली.कणकवली येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. यावेळी नारायण राणे पुढे म्हणाले, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पक्ष स्थापनेनंतर ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे.

या निवडणुकीत राज्यातील काही जागा आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामधून निलेश राणेंचे नाव यापूर्वीच जाहीर केले आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर आमची रणनीती जाहीर केली जाईल. आम्हाला सर्वदृष्टीने पोषक वातावरण आहे. या निवडणुकीत शिवसेना सोडून इतर सर्व पक्षांची मदत घेतली जाईल. इतर पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशी त्याबाबत मी बोलणार आहे.शिवसेना - भाजपची युती त्यांच्या कार्यकर्त्यांना पसंत नाही.जिल्ह्याजिल्ह्यात सेना भाजपमध्ये असंतोष आहे . या सर्व परिस्थितीचा फायदा अन्य उमेदवारांना होणार आहे त्यात आमचाही समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ तसेच अन्य प्रकल्प रेंगाळले आहेत. हे शिवसेनेच्या पालकमंत्र्यांचे अपयश आहे.

शिवसेनेचे खासदार, आमदार असतानाही ते तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकलेले नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद त्यांच्याकडे असून तेथील विकास म्हणावा तसा झाला नाही. रत्नागिरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सिंधुदुर्ग जिल्ह्या पेक्षा कमी आहे सर्वच क्षेत्रात तो जिल्हा पिछाडीवर आहे. त्याला शिवसेनाच जबाबदार आहे. त्याचा फटका त्यांना बसेल. असेही नारायण राणे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोअर कमिटी व काही नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांनी यावेळी जाहीर केल्या.स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा वेगळा !महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे इतर उमेदवार आचारसंहिता लागू झाल्यावर जाहीर करण्यात येतील. भाजपच्या जाहीरनामा बनविण्याच्या समितीत त्यांनी मला घेतले आहे. मात्र , माझा पक्ष वेगळा आहे .हे कदाचित त्यांच्या लक्षात आले नसेल. पण, या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमान पक्षाचा जाहीरनामा वेगळा असेल ,असे नारायण राणे यांनी यावेळी जाहीर केले.निवडणुकीनंतर भाजपलाच मदत!या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करणार आहोत. फक्त शिवसेना म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी नव्हे. त्यामुळे मोदी गटासोबत आम्ही आहोत. निवडणुकीनंतर भाजपला निश्चितच मदत करण्यात येईल, असे नारायण राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान स्पष्ट केले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे