शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Nagaran Manjule: ...तर इतिहास तुमची नोंद आग विझवणारा म्हणून घेईल, नागराज अण्णाने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 10:30 IST

सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे : सावंतवाडीत जनवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग/सावंतवाडी : माणसा माणसातील संवाद तुटला की गैरसमज निर्माण होत असतात. जर हे गैरसमज थांबवायचे असेल तर बोलत राहा, आग लागली तर घागर घेऊन आगीवर पाणी मारुन ती विझवा. कारण, इतिहास तुमची नोंद आग विझवणारा म्हणून घेईल, पेटवणारे होऊ नका असे मत प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सध्याच्या राजकीय परस्थीतीवर माडले. मंजुळे यांनी कोणाचेही नाव न घेता आपले विचार मांडले.

सावंतवाडीत रविवार पासून येथील आरपीडी हायस्कूलच्या गुरूवर्य सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलन नगरीत जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनाचे अनोख्या पध्दतीने उद्घाटन सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर, काँग्रेस नेते विकास सावंत किशोर जाधव, सुबोध मोरे, चंद्रकांत जाधव, आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना मंजुळे म्हणाले, समाजातील संवाद संपत चालला असताना अशी संमेलन झाल्याने त्यातून एक उर्जा मिळत असते. मी प्रत्येक संमेलनाला मुद्दामहून जात असतो. यातून संवाद वाढत जात असतो आपापसातील संवाद संपला की गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी बोलत राहणे गरजेचे आहे. माणसातील माणूसपण टिकवता आले पाहीजे. केशवसुतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सावंतवाडीत आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आला आहे. या ठिकाणावरुन बर्‍याचदा गेलो, पण साहीत्य संमेलनाच्या निमित्ताने सावंतवाडीसाठी येण्याचे भाग्य लाभले, असेही मंजुळे यांनी यावेळी म्हटले. केशवसूताच्या अनेक कविता वाचल्या पण त्यांनी ज्ञानदान केलेल्या संस्थेत येण्याचे भाग्य लाभले असे म्हणत अनेक रत्नाच्या पदस्पर्शाने सावंतवाडीची भूमी पुनीत झाली आहे. याठिकाणी साहीत्य संमेलनाच्या निमित्ताने आल्यानंतर एक वेगळे अनुभव आले. 

संमेलनाध्यक्षा सध्या नरे-पवार यांनी सध्याच्या राजकीय परस्थीतीवर भाष्य करताना या व्यवस्थेला सर्वसामान्य कंटाळला असून, आपल्या विचारांचे नाही ते नास्तिक असल्याचे ठरवले जात आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजान विरोधात हनुमान चालिसा म्हणायला सांगितली, वेद मंत्र का नाही असा सवाल करत त्यांना आता सर्वत्र तेढ निर्माण करायचा आहे. त्यांचे स्क्रिप्ट कोठून येते ते सर्वानाच माहित आहे, असे म्हणत प्रसारमाध्यमांनी एक किल्ली न बनता सर्वसमावेशक बनले पाहिजे असेही नरे-पवार यांनी म्हटले.

दरम्यान, या निमित्ताने स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्यासह लेखक चंद्रकांत जाधव, सुबोध मोरे, किशोर जाधव, विकास सावंत यांनी विचार मांडले संमेलनाचे प्रास्ताविक संपत देसाई यांनी केले तर आभार मधुकर मातोंडकर यांनी माडले आजरा येथील प्रा.नवनाथ शिंदे, सिध्दार्थ देवधेकर, दुर्गादास गावंडे यांचा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी