शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Nagaran Manjule: ...तर इतिहास तुमची नोंद आग विझवणारा म्हणून घेईल, नागराज अण्णाने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 10:30 IST

सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे : सावंतवाडीत जनवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

सिंधुदुर्ग/सावंतवाडी : माणसा माणसातील संवाद तुटला की गैरसमज निर्माण होत असतात. जर हे गैरसमज थांबवायचे असेल तर बोलत राहा, आग लागली तर घागर घेऊन आगीवर पाणी मारुन ती विझवा. कारण, इतिहास तुमची नोंद आग विझवणारा म्हणून घेईल, पेटवणारे होऊ नका असे मत प्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सध्याच्या राजकीय परस्थीतीवर माडले. मंजुळे यांनी कोणाचेही नाव न घेता आपले विचार मांडले.

सावंतवाडीत रविवार पासून येथील आरपीडी हायस्कूलच्या गुरूवर्य सत्यशोधक कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलन नगरीत जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलनाचे अनोख्या पध्दतीने उद्घाटन सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी संमेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर, काँग्रेस नेते विकास सावंत किशोर जाधव, सुबोध मोरे, चंद्रकांत जाधव, आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना मंजुळे म्हणाले, समाजातील संवाद संपत चालला असताना अशी संमेलन झाल्याने त्यातून एक उर्जा मिळत असते. मी प्रत्येक संमेलनाला मुद्दामहून जात असतो. यातून संवाद वाढत जात असतो आपापसातील संवाद संपला की गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी बोलत राहणे गरजेचे आहे. माणसातील माणूसपण टिकवता आले पाहीजे. केशवसुतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सावंतवाडीत आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आला आहे. या ठिकाणावरुन बर्‍याचदा गेलो, पण साहीत्य संमेलनाच्या निमित्ताने सावंतवाडीसाठी येण्याचे भाग्य लाभले, असेही मंजुळे यांनी यावेळी म्हटले. केशवसूताच्या अनेक कविता वाचल्या पण त्यांनी ज्ञानदान केलेल्या संस्थेत येण्याचे भाग्य लाभले असे म्हणत अनेक रत्नाच्या पदस्पर्शाने सावंतवाडीची भूमी पुनीत झाली आहे. याठिकाणी साहीत्य संमेलनाच्या निमित्ताने आल्यानंतर एक वेगळे अनुभव आले. 

संमेलनाध्यक्षा सध्या नरे-पवार यांनी सध्याच्या राजकीय परस्थीतीवर भाष्य करताना या व्यवस्थेला सर्वसामान्य कंटाळला असून, आपल्या विचारांचे नाही ते नास्तिक असल्याचे ठरवले जात आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अजान विरोधात हनुमान चालिसा म्हणायला सांगितली, वेद मंत्र का नाही असा सवाल करत त्यांना आता सर्वत्र तेढ निर्माण करायचा आहे. त्यांचे स्क्रिप्ट कोठून येते ते सर्वानाच माहित आहे, असे म्हणत प्रसारमाध्यमांनी एक किल्ली न बनता सर्वसमावेशक बनले पाहिजे असेही नरे-पवार यांनी म्हटले.

दरम्यान, या निमित्ताने स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर यांच्यासह लेखक चंद्रकांत जाधव, सुबोध मोरे, किशोर जाधव, विकास सावंत यांनी विचार मांडले संमेलनाचे प्रास्ताविक संपत देसाई यांनी केले तर आभार मधुकर मातोंडकर यांनी माडले आजरा येथील प्रा.नवनाथ शिंदे, सिध्दार्थ देवधेकर, दुर्गादास गावंडे यांचा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Nagraj Manjuleनागराज मंजुळेsindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडी