शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

माझे सावरकर यांच्याबद्दल गैरसमज संपले, मी आता त्यांचा अनुयायी- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 20:20 IST

कणकवलीत वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

कणकवली:  माझे यापूर्वी वीर सावरकर यांच्याबद्दल काही गैरसमज होते.तसे ट्विटही त्यावेळी मी केले होते. माझे काही राजकीय विरोधक त्याची चर्चा आता करत आहेत. पण मला सावरकर यांच्याबद्दल त्यावेळी चुकीची माहिती काहींनी दिल्यामुळे, गैरसमज निर्माण झाला होता. आता सावरकरांचे कार्य मी जाणून घेतले असून यापुढे विर सावरकर यांचा मी अनुयायी म्हणून काम करणार आहे.त्यांचे कार्य पुढील पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सावरकर गौरव यात्रा समारोप प्रसंगी ते बोलत होते.या गौरव यात्रेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,प्रमोद रावराणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,शहराध्यक्ष अण्णा कोदे,शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश सावंत-पटेल, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर,दामोदर सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे,राजश्री धुमाळे,मनोज रावराणे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,सुरेश सावंत,डॉ.मिलिंद कुलकर्णी , भालचंद्र साठे,युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री,तालुका सरचिटणीस महेश गुरव ,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई,वैभववाडी नगराध्यक्षा स्नेहा माईणकर,तालुकाध्यक्ष नासीर काझी ,राजन चिके,संजना सदडेकर,मेघा गांगण,सुप्रिया नलावडे, हर्षदा वाळके,बाळ खडपे,संदीप साटम ,प्राची तावडे,देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,अमोल तेली ,योगेश चांदोसकर,रवी पाळेकर,प्रणाली माने आदीसह भाजपा व शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार नितेश राणे म्हणाले,स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफी वीर म्हणणे चुकीचे आहे.राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यानंतर सावरकरांचे विचार व कार्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी  भाजपा नेत्यांनी विधानसभा मतदार संघ निहाय सावरकर गौरव यात्रा काढण्याचे निश्चित केले.त्यानुसार काढलेल्या या यात्रेत कणकवलीत मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी सहभागी झाले आहेत. यापूर्वी तत्कालीन सरकार विरोधात आम्ही आंदोलन केल्यामुळे अनेकदा आम्हाला तुरुंगात टाकण्यात आले आहे.आम्हाला ६ तास तुरुंगात राहताना कठीण होत होते.मात्र, वीर सावरकर यांनी आपल्या जीवनात भोगलेला तुरुंगवास आणि त्यांनी निर्माण केलेले आदर्श आम्ही विसरु शकणार नाही. देशासाठी त्यांनी  जे योगदान दिले ते अतुलनीय आहे.  वीर सावरकर यांना राहुल गांधी यांनी माफी वीर म्हणणे चुकीचे आहे.त्यांनी किमान स्वतःच्या आजीने सावरकर यांच्याबाबत काय म्हटले होते ?  ते वाचायला पाहिजे होते.त्यानंतर राहुल गांधी तसे केव्हाच म्हणणार नाहीत. राहुल गांधींनी तुरुंगवारी टाळण्यासाठी यापूर्वी माफी मागितली होती. त्याची आठवणही ठेवावी.असेही ते म्हणाले.

संजय आंग्रे म्हणाले,शिंदे-फडणवीस सरकारने हिंदू काय आहे ? हे आज या यात्रेतून दाखवून दिले आहे.सावरकर यांची ही गौरव यात्रा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले,ब्रिटिशांनी सावरकर यांना कठोर शिक्षा सुनावली. देशप्रेमामुळे ती शिक्षा त्यांनी भोगली. त्यांच्या कर्तुत्वाला ही यात्रा काढत न्याय देण्याचा प्रयत्न आमदार नितेश राणे यांनी केला.हिंदुत्वाचा मुद्दा जिथे जिथे आला तिथे आमदार राणे धावले आहेत.सावरकर हे विज्ञानवादी होते. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी दिलेले सल्ले सर्वच खरे ठरले आहेत.त्यांचे कार्य  समजून घेऊन त्यांचे विचार  आत्मसात केले पाहिजेत.

यावेळी वीर सावरकर लिखित बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील पोवाडा या यात्रेच्या प्रारंभी सादर करण्यात आला.कणकवली पटकी देवी मंदिर येथून 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला' प्रारंभ झाला.  रत्नागिरी येथील शिवरूद्र ढोल पथकाने शानदार सलामी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रातील देखावे या यात्रेत  होते. जय श्रीराम, मी सावरकर अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या जात होत्या.'मी सावरकर' असे लिहलेल्या टोप्या, शाली यात्रेत सहभागी लोकानी परिधान केल्या होत्या.त्यामुळे  शहरात भगवे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Kankavliकणकवली