शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

माझे सावरकर यांच्याबद्दल गैरसमज संपले, मी आता त्यांचा अनुयायी- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 20:20 IST

कणकवलीत वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

कणकवली:  माझे यापूर्वी वीर सावरकर यांच्याबद्दल काही गैरसमज होते.तसे ट्विटही त्यावेळी मी केले होते. माझे काही राजकीय विरोधक त्याची चर्चा आता करत आहेत. पण मला सावरकर यांच्याबद्दल त्यावेळी चुकीची माहिती काहींनी दिल्यामुळे, गैरसमज निर्माण झाला होता. आता सावरकरांचे कार्य मी जाणून घेतले असून यापुढे विर सावरकर यांचा मी अनुयायी म्हणून काम करणार आहे.त्यांचे कार्य पुढील पिढी पर्यंत पोहचविण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सावरकर गौरव यात्रा समारोप प्रसंगी ते बोलत होते.या गौरव यात्रेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, भाजपा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत,प्रमोद रावराणे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,शहराध्यक्ष अण्णा कोदे,शिवसेना विधानसभा प्रमुख संदेश सावंत-पटेल, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर,दामोदर सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संतोष कानडे,राजश्री धुमाळे,मनोज रावराणे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,सुरेश सावंत,डॉ.मिलिंद कुलकर्णी , भालचंद्र साठे,युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री,तालुका सरचिटणीस महेश गुरव ,जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई,वैभववाडी नगराध्यक्षा स्नेहा माईणकर,तालुकाध्यक्ष नासीर काझी ,राजन चिके,संजना सदडेकर,मेघा गांगण,सुप्रिया नलावडे, हर्षदा वाळके,बाळ खडपे,संदीप साटम ,प्राची तावडे,देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,अमोल तेली ,योगेश चांदोसकर,रवी पाळेकर,प्रणाली माने आदीसह भाजपा व शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार नितेश राणे म्हणाले,स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफी वीर म्हणणे चुकीचे आहे.राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यानंतर सावरकरांचे विचार व कार्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी  भाजपा नेत्यांनी विधानसभा मतदार संघ निहाय सावरकर गौरव यात्रा काढण्याचे निश्चित केले.त्यानुसार काढलेल्या या यात्रेत कणकवलीत मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी सहभागी झाले आहेत. यापूर्वी तत्कालीन सरकार विरोधात आम्ही आंदोलन केल्यामुळे अनेकदा आम्हाला तुरुंगात टाकण्यात आले आहे.आम्हाला ६ तास तुरुंगात राहताना कठीण होत होते.मात्र, वीर सावरकर यांनी आपल्या जीवनात भोगलेला तुरुंगवास आणि त्यांनी निर्माण केलेले आदर्श आम्ही विसरु शकणार नाही. देशासाठी त्यांनी  जे योगदान दिले ते अतुलनीय आहे.  वीर सावरकर यांना राहुल गांधी यांनी माफी वीर म्हणणे चुकीचे आहे.त्यांनी किमान स्वतःच्या आजीने सावरकर यांच्याबाबत काय म्हटले होते ?  ते वाचायला पाहिजे होते.त्यानंतर राहुल गांधी तसे केव्हाच म्हणणार नाहीत. राहुल गांधींनी तुरुंगवारी टाळण्यासाठी यापूर्वी माफी मागितली होती. त्याची आठवणही ठेवावी.असेही ते म्हणाले.

संजय आंग्रे म्हणाले,शिंदे-फडणवीस सरकारने हिंदू काय आहे ? हे आज या यात्रेतून दाखवून दिले आहे.सावरकर यांची ही गौरव यात्रा आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले,ब्रिटिशांनी सावरकर यांना कठोर शिक्षा सुनावली. देशप्रेमामुळे ती शिक्षा त्यांनी भोगली. त्यांच्या कर्तुत्वाला ही यात्रा काढत न्याय देण्याचा प्रयत्न आमदार नितेश राणे यांनी केला.हिंदुत्वाचा मुद्दा जिथे जिथे आला तिथे आमदार राणे धावले आहेत.सावरकर हे विज्ञानवादी होते. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी दिलेले सल्ले सर्वच खरे ठरले आहेत.त्यांचे कार्य  समजून घेऊन त्यांचे विचार  आत्मसात केले पाहिजेत.

यावेळी वीर सावरकर लिखित बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरील पोवाडा या यात्रेच्या प्रारंभी सादर करण्यात आला.कणकवली पटकी देवी मंदिर येथून 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला' प्रारंभ झाला.  रत्नागिरी येथील शिवरूद्र ढोल पथकाने शानदार सलामी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रातील देखावे या यात्रेत  होते. जय श्रीराम, मी सावरकर अशा जोरदार घोषणा यावेळी दिल्या जात होत्या.'मी सावरकर' असे लिहलेल्या टोप्या, शाली यात्रेत सहभागी लोकानी परिधान केल्या होत्या.त्यामुळे  शहरात भगवे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Kankavliकणकवली