शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कणकवलीत महावितरणने अचानक सुरू केले भारनियमन, ग्रामस्थ झाले आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 14:22 IST

सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांसोबत ग्रामस्थांची खडाजंगी झाली. जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे, हळवल, कसवण, शिरवल या गावांमध्ये काल, गुरूवार सायंकाळपासून अचानक महावितरणनेवीज पुरवठा खंडीत करत भारनियमन सुरू केले. त्यामुळे तेथील ग्रामस्थ संतप्त झाले. कणकवलीतील वीज वितरणाच्या सबस्टेशनवर धडक देत संबंधित कर्मचार्‍यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. उशिरापर्यंत अधिकारी तेथे न आल्याने ग्रामस्थ संतापले होते.नळयोजनेचे वीज बिल थकीत असल्याने त्याच फिडरवरील गावांमध्ये लोडशेडींग सुरू करण्यात आले आहे. कणकवलीत वीजपुरवठा सुरळीत असताना आमच्या गावांवर अन्याय का? असा सवाल वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी विचारला. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी सबस्टेशनला धडक दिली. सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांसोबत ग्रामस्थांची खडाजंगी झाली. जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.त्यानंतर सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना याबाबतची माहिती दिली. सायंकाळी ७ ते रात्री १२ आणि पहाटे ५ ते दुपारी २ अशा वेळेत भारनियमन केले जाणार असल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर त्या गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र पहाटे पुन्हा वीज पुरवठा खंडीत केला जाणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.यावेळी हळवल सरपंच दीपक गुरव, राजू राणे, संदीप सावंत, शिवा राणे, अरूण राणे, रोहित राणे, प्रभाकर चव्हाण, बंटी राणे, प्रथमेश राणे, राजन धुरी, अविनाश राणे, विराज तावडे, विठ्ठल सावंत, सुभाष राणे, राजन तांबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गelectricityवीजmahavitaranमहावितरण