शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

'रत्नागिरीतील महामार्गाचा रखडलेला प्रश्न तेवढा सोडवा'

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 8, 2024 12:57 IST

दहा वर्षांतील उद्योगविरोधी भूमिकेतही बदल व्हायला हवा

सिंधुदुर्ग : अनेक वर्षे संथगतीने सुरू असलेला मुंबई गोवा महामार्ग आणि सतत नाकारले जाणारे उद्योग या दोन प्रश्नांकडे नवे खासदार नारायण राणे यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा केली जात आहे. जरी महामागर्गाचा प्रश्न सिंधुदुर्गात नसला तरी तो रत्नागिरीत आहे. गेल्या दहा वर्षात मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नाकडे जितक्या गांभीर्याने पाहिले जाणे अवाश्यक होते, तितक्या गांभीर्याने पाहिले गेले नाही. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केल्यामुळे काही प्रश्न तरी मार्गी लागले. मात्र दिल्लीकडून जेवढा जोर लावणे अपेक्षित होते, तेवढे झाले नाही. आता नव्या खासदारांनी तरी रत्नागिरी जिल्ह्याचे हे दुखणे दूर करावे, अशी अपेक्षा रत्नागिरीकर करत आहेत.

नवीन खासदारांकडून पाच अपेक्षामहामार्ग अर्धवटच : मुंबई-गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील काम गेली आठ दहा वर्षे रखडले आहे. अनेक पूलही अपूर्ण आहेत.रिफायनरीचा गुंता कायम : प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा गुंता कायम आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रकल्प गरजेचा आहे.योजना होते, जलस्रोत तेच : जिल्ह्यात पाण्याच्या असंख्य योजना राबवूनही टंचाई खूप आहे. त्यासाठी जलस्रोत बळकट करणे आवश्यक आहे.आंबा, काजूचे प्रश्न बाकी : अर्थकारणासाठी आंब्यावरील रोग आणि परदेशी काजू बी या दोन समस्यांवरही उपाय शोधायला हवे आहेत.कोल्हापूर रेल्वेमार्ग : व्यापारी दृष्टीने गरजेचा असलेला रत्नागिरी -कोल्हापूर रेल्वेमार्गही फक्त चर्चेत आहे. कोणताही तोडगा निघालेला नाही.

अपेक्षांबाबत नागरिक म्हणतात..आधी झालेल्या विरोधामुळे रिफायनरी प्रकल्पाचा विषय अर्धवटच राहिला आहे. मूळ प्रस्तावित जागी हा प्रकल्प झाला तर राजापूर तालुका किंवा जिल्हा नाही, तर राज्याच्या अर्थकारणात मोठे बदल होतील.  - अविनाश महाजन, बागायतदार, राजापूरमुंबई - गोवा महामार्गाची सध्याची स्थिती अशी आहे की यापेक्षा आधीचा रस्ता चांगला होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नव्या खासदारांनी केंद्रातून दबाव आणून हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यायला हवे. - देवदत्त मुकादम, व्यावसायिक

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे