शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:08 IST

संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल्या २५ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगितले आहे.

ठळक मुद्देआंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागेजुलैपासून पावसाला सुरुवात; ८५७५ मिलीमीटर पावसाची नोंद

आंबोली : संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल्या २५ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगितले आहे.आतापर्यंत तब्बल ३४० इंच म्हणजेच ८५७५ मिलीमीटर पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले.आंबोलीतील जाणकारांच्या म्हणण्यानुसार तीस वर्षांपूर्वी असा पाऊस पडत असे, तो पुन्हा यावर्षी बघायला मिळाला. त्याकाळी मे महिन्याच्या १५ तारीखला पाऊस सुरू होत असे, तो आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पडत असे. ४०० किंवा ४५० इंच पाऊस आंबोलीत पडत असे.मधल्या काळात जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड अशा विविध कारणांमुळे आंबोलीतील पाऊस कमी झाला होता. २९० इंच ते ३०० इंच इतका पाऊस आंबोलीत होत असे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता २०१५ साली २९२ इंच, २०१६ साली १९० इंच, २०१७ मध्ये २८३, २०१८ साली २९६ इंच आणि २०१९ साली म्हणजेच यावर्षी हा पाऊस तब्बल त्रिशतक गाठून ३४० इंचापर्यंत पोहोचला आहे.भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो. मात्र, यावर्षी तो ६१०० मिलीमीटर इतकाच झाला आहे. मात्र, आंबोलीत ८५७५ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आंबोलीच्या पावसाने यापूर्वीची सर्व रेकॉर्ड ब्रेक केली आहेत, असेच जाणकारांकडून बोलले जात आहे.आणखी तब्बल एक महिना पावसाचा शिल्लक असून या एक महिन्यात सात इंचापेक्षा जर जास्त पाऊस झाला तर आंबोलीच्या इतिहासातील सर्वात जास्त पाऊस यावर्षी झाला, असे म्हटले जाईल.पर्यटन व्यावसायिकांना बसतोय फटकाआंबोलीत कोसळलेल्या यावर्षीच्या पावसामुळे आंबोलीतील जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे नुकसान झाले. घाटामध्ये ठिकठिकाणी रस्ते खचले, दरडी कोसळल्या. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायिकांनासुद्धा त्याचा फटका बसला. संपूर्ण महाराष्ट्रालाच यंदाच्या वर्षी पावसाने झोडपून काढले.

आंबोलीमध्ये कोसळणाऱ्या पावसाचे पाणी कोल्हापूर जिल्हा, बेळगावातील काही भाग तसेच बांदा आदी भागांमध्ये जात असते. आंबोलीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या भागांमध्येसुद्धा पाणी येण्यास आंबोलीचा पाऊस कारणीभूत ठरला होता.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग