शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

आंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 16:08 IST

संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल्या २५ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगितले आहे.

ठळक मुद्देआंबोलीत सर्वाधिक पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागेजुलैपासून पावसाला सुरुवात; ८५७५ मिलीमीटर पावसाची नोंद

आंबोली : संपूर्ण जून महिनाभर दडी मारलेल्या आंबोलीतील पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून हजेरी लावली. परंतु हा पाऊस जो सुरू झाला तो सप्टेंबरची ९ तारीख उजाडली तरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आंबोलीमध्ये पर्जन्यमापन करणारे भाऊ ओगले यांनी आंबोलीत आतापर्यंत गेल्या २५ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगितले आहे.आतापर्यंत तब्बल ३४० इंच म्हणजेच ८५७५ मिलीमीटर पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले.आंबोलीतील जाणकारांच्या म्हणण्यानुसार तीस वर्षांपूर्वी असा पाऊस पडत असे, तो पुन्हा यावर्षी बघायला मिळाला. त्याकाळी मे महिन्याच्या १५ तारीखला पाऊस सुरू होत असे, तो आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पडत असे. ४०० किंवा ४५० इंच पाऊस आंबोलीत पडत असे.मधल्या काळात जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड अशा विविध कारणांमुळे आंबोलीतील पाऊस कमी झाला होता. २९० इंच ते ३०० इंच इतका पाऊस आंबोलीत होत असे. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहता २०१५ साली २९२ इंच, २०१६ साली १९० इंच, २०१७ मध्ये २८३, २०१८ साली २९६ इंच आणि २०१९ साली म्हणजेच यावर्षी हा पाऊस तब्बल त्रिशतक गाठून ३४० इंचापर्यंत पोहोचला आहे.भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो. मात्र, यावर्षी तो ६१०० मिलीमीटर इतकाच झाला आहे. मात्र, आंबोलीत ८५७५ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी आंबोलीच्या पावसाने यापूर्वीची सर्व रेकॉर्ड ब्रेक केली आहेत, असेच जाणकारांकडून बोलले जात आहे.आणखी तब्बल एक महिना पावसाचा शिल्लक असून या एक महिन्यात सात इंचापेक्षा जर जास्त पाऊस झाला तर आंबोलीच्या इतिहासातील सर्वात जास्त पाऊस यावर्षी झाला, असे म्हटले जाईल.पर्यटन व्यावसायिकांना बसतोय फटकाआंबोलीत कोसळलेल्या यावर्षीच्या पावसामुळे आंबोलीतील जनजीवन विस्कळीत झाले. शेतीचे नुकसान झाले. घाटामध्ये ठिकठिकाणी रस्ते खचले, दरडी कोसळल्या. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायिकांनासुद्धा त्याचा फटका बसला. संपूर्ण महाराष्ट्रालाच यंदाच्या वर्षी पावसाने झोडपून काढले.

आंबोलीमध्ये कोसळणाऱ्या पावसाचे पाणी कोल्हापूर जिल्हा, बेळगावातील काही भाग तसेच बांदा आदी भागांमध्ये जात असते. आंबोलीत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे या भागांमध्येसुद्धा पाणी येण्यास आंबोलीचा पाऊस कारणीभूत ठरला होता.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग