शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकरी हितापेक्षा अर्थकारणच जास्त

By admin | Updated: February 16, 2017 23:32 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाचा भोंगळ कारभार : ११00 पैकी केवळ ५६ बंधाऱ्यांचे काम पूर्ण

सिंधुदुर्गनगरी : पाणीटंचाईवर मात होण्याबरोबरच शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, रब्बी हंगामाच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली यावे हा उद्देश समोर ठेवून प्रशासनाने राज्यशासनाच्या कृषी विभागाला ११०० कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. मात्र, यापैकी केवळ ५६ बंधारेच या विभागाने घातले आहेत. या विभागावर खुद्द जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या बंधाऱ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. केवळ ५ टक्केच बंधाऱ्यांची पूर्तता होणे ही खेदजनक बाब असून जिल्हाधिकारी उदय चौधरी या वस्तुस्थितीविरोधात कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.सिंधुदुर्गात गेल्या पावसाळी हंगामात जोरदार पाऊस बरसल्याने यावर्षी पाणीटंचाई उद्भवणार नाही अशी समज कित्येकांची झाली. मात्र सद्यस्थिती पाहता जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा कमी-कमी होताना दिसून येत आहे. यावर्षीचा पाऊस हंगाम येण्यासाठी चार महिने बाकी असताना जिल्ह्यातील सद्यस्थितीही समाधानकारक नाही.सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी ७५०० एवढे कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य ठेवले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. तर सामाजिक वनीकरण व जिल्हा अधीक्षक कृषी विभागालाही उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार कणकवली तालुक्यासाठी दिलेल्या १००० बंधाऱ्यांच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ ६१८ बंधारे पूर्ण झाले आहेत. तर कुडाळ तालुक्यात १००० उद्दिष्टापैकी ७४६ बंधारे, दोडामार्ग ४०० पैकी ३१९, वेंगुर्ले ५०० पैकी ३५१, मालवण १००० पैकी ६१२, देवगड ९०० पैकी ६७३, सावंतवाडी १००० पैकी ५६२, वैभववाडी ४०० पैकी ३२५ तर सामाजिक वनीकरण २०० पैकी ३०, अधीक्षक कृषी अधिकारी ११०० पैकी केवळ ५६ बंधारेच पूर्ण करण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ७५०० कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उद्दिष्ट्यापैकी ४२९२ बंधारे बांधून ५७.२३ टक्के उद्दिष्ट्य आतापर्यंत साध्य झाले आहे. तर गतवर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत ७५०० उद्दिष्ट्यापैकी ५५७० एवढे बंधारे पूर्ण करून ७४ टक्के उद्दिष्ट्य साध्य करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, डिसेंबर अखेरपर्यंत या मोहिमेला काही विभाग व तालुक्यातून प्रतिसादच मिळाला नाही. अल्प प्रमाणात बंधारे बांधण्यात आले. यानंतर जानेवारीपासून बहुतेक नदीनाल्यांचे पाणी कमी होते. पाण्याचा प्रवाह बंद होतो. त्यानंतर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा होत नाही. मात्र सिंधुदुर्गात केवळ उद्दिष्ट्य पूर्ततेसाठी जानेवारीनंतर बंधारे बांधण्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण केले जाते. जिल्ह्यातील कृषीक्षेत्रात प्रगती साधने, जास्तीत जास्त पडीक जमीन ओलिताखाली आणणे ही जबाबदारी असलेल्या अधीक्षक कृषी विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष४११०० उद्दिष्टापैकी डिसेंबर अखेर या विभागाने भोपळाही फोडला नव्हता. त्यानंतर केवळ ५६ बंधारे बांधण्याचे सोपस्कार कागदोपत्री दाखविले आहेत. त्यामुळे आर्थिक बजेटच्या कामात लक्ष आणि लोकसहभागाच्या कामात सोईस्कर दुर्लक्ष करणाऱ्या कार्यपद्धतीबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.