शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सिंधुदुर्गात सुमारे ३०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी : गणेश मर्गज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 16:36 IST

environment, shindhudurg, forestdepartment सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी ३०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आढळून येतात. हे पक्षी वैभव सिंधुदुर्गच्या पर्यावरण व पर्यटन विकासासाठी फारच महत्त्वाचे आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी बेसुमार वृक्षतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होत आहे, असे मत प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देपर्यावरण, पर्यटन विकासासाठी पक्ष्यांचे महत्त्ववृक्षतोडीमुळे पक्षी अधिवासाला धोका

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी ३०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आढळून येतात. हे पक्षी वैभव सिंधुदुर्गच्यापर्यावरण व पर्यटन विकासासाठी फारच महत्त्वाचे आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी बेसुमार वृक्षतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होत आहे, असे मत प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी व्यक्त केले आहे.वन्यजीव सप्ताहानिमित्त वाईल्ड कोकण सावंतवाडी आयोजित आॅनलाईन वेबिनारमध्ये सिंधुदुर्गातील पक्षी विविधता विषयावर डॉ. गणेश मर्गज यांनी मांडणी केली. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला समृद्ध पश्चिम घाट व समुद्रकिनारा लाभला आहे. या समृद्ध वारशामुळे सह्याद्रीच्या कडेकपारी, जंगल, खारफुटी, समुद्र किनारा, नद्या, तलाव, पाणथळ, मिठागरे दलदल, पाणवठे अशा विविध भागांमध्ये ३०० पेक्षा जास्त पक्षी आढळून येतात. या पक्षी वैभवामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणाचेही रक्षण होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष्यांच्या अधिवासात वेगळेपणा जाणवतो. पर्यावरणात पक्ष्यांना फारच महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेसुमार वृक्षतोड व मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अन्नसाखळी आणि अधिवासातील वैशिष्ट्यपूर्णता पाहता सिंधुदुर्गात जैवविविधता व पर्यावरणाचे रक्षण व्हायला हवे. जैवविविधता समतोल राखण्यासाठी पक्ष्यांचे महत्त्व असल्याची जाणीव मानवाला झाली तर निश्चितच पर्यावरणाचे रक्षण मानव करेल, असेही डॉ. मर्गज म्हणाले.शेती व बागायतीमधील कीटकांनादेखील पक्षी आपले भक्ष्य बनवतात. त्यामुळे शेती बागायतीचे देखील संरक्षण होते. शेतकऱ्यांना पक्ष्यांचे महत्त्व व माहिती करून देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे डॉ. मर्गज म्हणाले. पक्ष्यांचा रामप्रहरी किलबिलाट, सुमधुर आवाज आणि अन्नासाठी धावपळ पाहण्याचा विलक्षण आनंद पक्षी अभ्यासक किंवा पक्षीमित्रांनाच कळू शकतो. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होणार नाही यासाठी कायमच प्रयत्न करायला हवा. आज गिधाडे दुर्मीळ झाली आहेत. जिल्ह्यात गिधाडे दिसत नाहीत, असेही ते म्हणाले.पर्यटनासाठी इको टुरिझम गरजेचेपक्ष्यांचे निरीक्षण, अभ्यास करताना त्यांचा दिवसभराचा प्रवास एक विलक्षण सुखद आनंद देणारा ठरतो. पण त्यासाठी समुद्रकिनारे, जंगले, तळी, पाणवठे यांचा ºहास थांबवायला हवा. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण व पर्यटनाची सांगड घालून पक्षी पर्यटनालादेखील वाव मिळाला तर पक्षीमित्रांची भटकंती पर्यटनाची रेलचेल वाढविणारी ठरणार आहे. त्यासाठी इको टुरिझम गरजेचे आहे, असेही डॉ. गणेश मर्गज म्हणाले.

टॅग्स :environmentपर्यावरणsindhudurgसिंधुदुर्ग