शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात सुमारे ३०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी : गणेश मर्गज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 16:36 IST

environment, shindhudurg, forestdepartment सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी ३०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आढळून येतात. हे पक्षी वैभव सिंधुदुर्गच्या पर्यावरण व पर्यटन विकासासाठी फारच महत्त्वाचे आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी बेसुमार वृक्षतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होत आहे, असे मत प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देपर्यावरण, पर्यटन विकासासाठी पक्ष्यांचे महत्त्ववृक्षतोडीमुळे पक्षी अधिवासाला धोका

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी ३०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आढळून येतात. हे पक्षी वैभव सिंधुदुर्गच्यापर्यावरण व पर्यटन विकासासाठी फारच महत्त्वाचे आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी बेसुमार वृक्षतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होत आहे, असे मत प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी व्यक्त केले आहे.वन्यजीव सप्ताहानिमित्त वाईल्ड कोकण सावंतवाडी आयोजित आॅनलाईन वेबिनारमध्ये सिंधुदुर्गातील पक्षी विविधता विषयावर डॉ. गणेश मर्गज यांनी मांडणी केली. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला समृद्ध पश्चिम घाट व समुद्रकिनारा लाभला आहे. या समृद्ध वारशामुळे सह्याद्रीच्या कडेकपारी, जंगल, खारफुटी, समुद्र किनारा, नद्या, तलाव, पाणथळ, मिठागरे दलदल, पाणवठे अशा विविध भागांमध्ये ३०० पेक्षा जास्त पक्षी आढळून येतात. या पक्षी वैभवामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणाचेही रक्षण होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष्यांच्या अधिवासात वेगळेपणा जाणवतो. पर्यावरणात पक्ष्यांना फारच महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेसुमार वृक्षतोड व मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अन्नसाखळी आणि अधिवासातील वैशिष्ट्यपूर्णता पाहता सिंधुदुर्गात जैवविविधता व पर्यावरणाचे रक्षण व्हायला हवे. जैवविविधता समतोल राखण्यासाठी पक्ष्यांचे महत्त्व असल्याची जाणीव मानवाला झाली तर निश्चितच पर्यावरणाचे रक्षण मानव करेल, असेही डॉ. मर्गज म्हणाले.शेती व बागायतीमधील कीटकांनादेखील पक्षी आपले भक्ष्य बनवतात. त्यामुळे शेती बागायतीचे देखील संरक्षण होते. शेतकऱ्यांना पक्ष्यांचे महत्त्व व माहिती करून देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे डॉ. मर्गज म्हणाले. पक्ष्यांचा रामप्रहरी किलबिलाट, सुमधुर आवाज आणि अन्नासाठी धावपळ पाहण्याचा विलक्षण आनंद पक्षी अभ्यासक किंवा पक्षीमित्रांनाच कळू शकतो. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होणार नाही यासाठी कायमच प्रयत्न करायला हवा. आज गिधाडे दुर्मीळ झाली आहेत. जिल्ह्यात गिधाडे दिसत नाहीत, असेही ते म्हणाले.पर्यटनासाठी इको टुरिझम गरजेचेपक्ष्यांचे निरीक्षण, अभ्यास करताना त्यांचा दिवसभराचा प्रवास एक विलक्षण सुखद आनंद देणारा ठरतो. पण त्यासाठी समुद्रकिनारे, जंगले, तळी, पाणवठे यांचा ºहास थांबवायला हवा. त्यामुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यावरण व पर्यटनाची सांगड घालून पक्षी पर्यटनालादेखील वाव मिळाला तर पक्षीमित्रांची भटकंती पर्यटनाची रेलचेल वाढविणारी ठरणार आहे. त्यासाठी इको टुरिझम गरजेचे आहे, असेही डॉ. गणेश मर्गज म्हणाले.

टॅग्स :environmentपर्यावरणsindhudurgसिंधुदुर्ग