शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ'

By सुधीर राणे | Updated: October 21, 2022 16:25 IST

सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष

कणकवली : वाढत्या महागाईला आणि खूप वाईट मार्गाने चाललेल्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपल्या आमदाराची चौकशीपासून सुटका व्हावी यासाठी कुडाळ येथे मोर्चा काढला. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारने १०० रुपयांत रेशनवर चार जिन्नस देण्याची केलेली घोषणा अजून पूर्ण झालेली नाही. नेत्यांची छायाचित्रे असलेले बॉक्स की पिशव्या छापाव्यात हे ठरत नसल्यानेच हा घोळ झाला, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, जनतेला कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. अवैध धंदे वाढत चालले आहेत. घोटाळे करून जनतेचा पैसा राजकारणी आणि अधिकारी आपल्या घरात नेत आहेत. लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय यंत्रणेवर वचक राहिलेला नाही. आर्थिक घोटाळे करून अधिकारी श्रीमंत होत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री दोनदा जिल्ह्यात आले. मात्र, गणेशोत्सवाला दिलेले आश्वासन दिवाळी आली तरी पूर्ण झालेले नसून रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाहीत. जनता न्यायासाठी रस्त्यावर उतरत आहे. तरीही तिला न्याय मिळत नाही.आमदाराला चौकशीपासून मुक्त करा, अशी मागणी करीत मोर्चा काढण्यापेक्षा जनतेचा थोडा तरी विचार करावा. सर्वच पक्षांनी जनतेची निराशा केलेली आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरे राज्यात आज समंजसपणाचे राजकारण करत आहेत. त्या समांजसपणाला काहीजण स्क्रिप्ट म्हणतात. मात्र, राज ठाकरे हे काम अगदी प्रामाणिकपणे आणि समंजसपणे करत आहेत. त्यांच्यासारखी भूमिका सर्वांनीच घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर