शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दिवाळी रेशन! 'नेत्यांच्या छायाचित्राचे 'बॉक्स की पिशव्या' छापाव्यात हे ठरत नसल्यानेच घोळ'

By सुधीर राणे | Updated: October 21, 2022 16:25 IST

सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष

कणकवली : वाढत्या महागाईला आणि खूप वाईट मार्गाने चाललेल्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपल्या आमदाराची चौकशीपासून सुटका व्हावी यासाठी कुडाळ येथे मोर्चा काढला. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांकडून जनतेच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारने १०० रुपयांत रेशनवर चार जिन्नस देण्याची केलेली घोषणा अजून पूर्ण झालेली नाही. नेत्यांची छायाचित्रे असलेले बॉक्स की पिशव्या छापाव्यात हे ठरत नसल्यानेच हा घोळ झाला, अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, जनतेला कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. अवैध धंदे वाढत चालले आहेत. घोटाळे करून जनतेचा पैसा राजकारणी आणि अधिकारी आपल्या घरात नेत आहेत. लोकप्रतिनिधींचा प्रशासकीय यंत्रणेवर वचक राहिलेला नाही. आर्थिक घोटाळे करून अधिकारी श्रीमंत होत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री दोनदा जिल्ह्यात आले. मात्र, गणेशोत्सवाला दिलेले आश्वासन दिवाळी आली तरी पूर्ण झालेले नसून रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाहीत. जनता न्यायासाठी रस्त्यावर उतरत आहे. तरीही तिला न्याय मिळत नाही.आमदाराला चौकशीपासून मुक्त करा, अशी मागणी करीत मोर्चा काढण्यापेक्षा जनतेचा थोडा तरी विचार करावा. सर्वच पक्षांनी जनतेची निराशा केलेली आहे. ज्याप्रमाणे राज ठाकरे राज्यात आज समंजसपणाचे राजकारण करत आहेत. त्या समांजसपणाला काहीजण स्क्रिप्ट म्हणतात. मात्र, राज ठाकरे हे काम अगदी प्रामाणिकपणे आणि समंजसपणे करत आहेत. त्यांच्यासारखी भूमिका सर्वांनीच घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर