शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

आमदार वैभव नाईक यांची साडेचार तास चौकशी

By अरुण आडिवरेकर | Updated: December 5, 2022 23:39 IST

कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांची पत्नी आणि भावासह रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत सुमारे साडेचार तास चौकशी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क

रहिम दलाल, रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे आमदार वैभव नाईक यांची पत्नी आणि भावासह रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत सुमारे साडेचार तास चौकशी करण्यात आली. त्यांना ९ डिसेंबर रोजी कागदपत्रे सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.

रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडून आमदार वैभव नाईक यांना मालमत्तेच्या चाैकशीसाठी नाेटीस काढण्यात आली आहे. त्यानुसार साेमवारी (५ डिसेंबर) रत्नागिरी कार्यालयात चाैकशीसाठी आले हाेते. यावेळी त्यांच्यासाेबत पत्नी स्नेहल आणि भाऊ सतीश नाईक आणि राजापूरचे आमदार राजन साळवी उपस्थित हाेते. आमदार नाईक यांची चाैकशी सुरु झाल्यानंतर आमदार साळवी घरी परतले.

वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले की, १९९६पासून आपण व्यवसाय करीत असून, त्या वेळेपासून आपल्याकडील कागदपत्रे, कर भरल्याची माहिती आपण लाचलुचपत विभागाला दिली आहे. या विभागाने पत्नी व भावाचीही चौकशी केली. या सर्वांमागे राज्य सरकार विशेषत: भाजप असल्याचा आराेप त्यांनी केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यालये ही प्रत्येक जिल्ह्यात आहेत. परंतु, स्थानिक अधिकाऱ्यांवर सरकारचा विश्वास नसल्याने मला रत्नागिरीत तर आमदार साळवींना अलिबागला चौकशीसाठी बोलावले गेले. हा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न असून, आपण यात दबणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक