शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच मतदारांना धमकी, वैभव नाईकांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: December 13, 2022 16:38 IST

सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती

कणकवली : सिंधुदुर्गात ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती करण्यात येत आहे. असे सांगतानाच जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे पॅनेल उभे राहिल्यामुळे भाजपाची अडचण झाली आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते प्रचार सभांमध्ये मतदारांना दमदाटी करीत असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.कणकवली येथील विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाची आज, मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, रुपेश आमडोसकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, महिला आघाडी प्रमुख उर्वी साटम, तालुका अध्यक्ष संजय जाधव, अक्षय कदम, युवा आघाडी प्रमुख रोहन कदम, सुरेंद्र कदम आदींसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आघाडी जिल्ह्यात झाली आहे. भाजपला रोखण्यासाठी तसेच दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी करण्याठी एकत्रित मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा विरोधात २९० ठिकाणी थेट लढत होत आहे. आमच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. राज्यातील सद्याचे सरकार किती काळ टिकणार हे केवळ न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकेल. नारायण राणेंनी जिल्ह्यात किती उद्योग आणलेनारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात किती उद्योग आणले? ग्रामपंचायत मध्ये सत्ता असलेल्या त्यांच्या लोकांनी आतापर्यंत काय विकास केला? हे जनतेने विचारण्याची गरज आहे. भाजपच्या माध्यमातून निधी नाही. भाजपाकडून काही ठिकाणी दडपशाहीच्या मार्गतून अर्ज बाद करण्याचा प्रयत्न झाला आहे. नितेश राणे धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, लोक धमक्यांना भीक घालणार नाहीत.महेश परुळेकर म्हणाले, जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक  चुकीची वक्तव्ये करीत आहेत. सिंधुदुर्ग हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. त्याचे नाव बदनाम केले जात आहे. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे १२ सरपंच पदाचे उमेदवार आणि १०० पेक्षा जास्त सदस्य ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आहेत.ते निश्चितच विजयी होतील. असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVaibhav Naikवैभव नाईक Nitesh Raneनीतेश राणे