शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच मतदारांना धमकी, वैभव नाईकांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: December 13, 2022 16:38 IST

सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती

कणकवली : सिंधुदुर्गात ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती करण्यात येत आहे. असे सांगतानाच जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे पॅनेल उभे राहिल्यामुळे भाजपाची अडचण झाली आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते प्रचार सभांमध्ये मतदारांना दमदाटी करीत असल्याची टीका शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.कणकवली येथील विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाची आज, मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, रुपेश आमडोसकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, महिला आघाडी प्रमुख उर्वी साटम, तालुका अध्यक्ष संजय जाधव, अक्षय कदम, युवा आघाडी प्रमुख रोहन कदम, सुरेंद्र कदम आदींसह दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.वैभव नाईक म्हणाले, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आघाडी जिल्ह्यात झाली आहे. भाजपला रोखण्यासाठी तसेच दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी करण्याठी एकत्रित मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा विरोधात २९० ठिकाणी थेट लढत होत आहे. आमच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. राज्यातील सद्याचे सरकार किती काळ टिकणार हे केवळ न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. त्यामुळे हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकेल. नारायण राणेंनी जिल्ह्यात किती उद्योग आणलेनारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात किती उद्योग आणले? ग्रामपंचायत मध्ये सत्ता असलेल्या त्यांच्या लोकांनी आतापर्यंत काय विकास केला? हे जनतेने विचारण्याची गरज आहे. भाजपच्या माध्यमातून निधी नाही. भाजपाकडून काही ठिकाणी दडपशाहीच्या मार्गतून अर्ज बाद करण्याचा प्रयत्न झाला आहे. नितेश राणे धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, लोक धमक्यांना भीक घालणार नाहीत.महेश परुळेकर म्हणाले, जातीयवादी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. काही लोक  चुकीची वक्तव्ये करीत आहेत. सिंधुदुर्ग हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. त्याचे नाव बदनाम केले जात आहे. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे १२ सरपंच पदाचे उमेदवार आणि १०० पेक्षा जास्त सदस्य ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आहेत.ते निश्चितच विजयी होतील. असेही ते म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVaibhav Naikवैभव नाईक Nitesh Raneनीतेश राणे