शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आमदार दीपक केसरकरांना निवडणुका आल्या की 'उद्योग' आठवतात, संजू परबांचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 15:59 IST

कोणीही निदा.. कोणीही वदा, टामटूम करणे हा माझा धंदा असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडविली

सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांना निवडणुका आल्या की उद्योग आठवतात. त्यांनी गेली बारा वर्षे काथ्या उद्योग देतो म्हणून फसवणूक केली. आता खाऊ गल्लीच्या नावावर जनतेची दिशाभूल करतात अशी टिका माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली. यावेळी त्यांनी कोणीही निदा कोणीही वदा.. टामटूम करणे हा माझा धंदा असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडविली. 

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावले, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक उपस्थित होते.परब म्हणाले, केसरकरांनी मला आपल्या लिस्ट मधून डिलीट केले, तर निवडणुकीच्या तोंडावर त्यांना दारोदारी फिरण्याची वेळ का आली? विधानसभा निवडणुकीत टोकाचे आरोप करणाऱ्या बबन साळगावकरां बरोबर त्यांनी हातमिळवणी का केली ? असा सवाल ही त्यांनी केला.  

पालिकेत अजूनही शिवसेनेचे काही नगरसेवक जाऊन बसत आहेत. त्यांना त्या ठिकाणी येण्यास मुख्याधिकाऱ्यांनी बंदी घालावी, अन्यथा आमचे नगरसेवक सुद्धा नगरपालिकेत जाऊन ठाण मांडून बसतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मुख्य अधिकारी यांची भूमिका शिवसेनेच्या शाखाप्रमुखा प्रमाणे आहे. ते त्यांच्या बाजूने आपला कारभार हाकत आहेत. शहरातील केशवसुत कट्टा वापरास धोकादायक आहे, असे ऑडिट झाले असताना सुद्धा त्या ठिकाणी तुतरी बसविण्यासाठी शिवसैनिकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी गर्दी झाल्यास आणि तो पूल कोसळून कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असेही परब म्हणाले.निवडणुका आल्या की केसरकरांना फसव्या घोषणा करण्यापलीकडे काही जमलेले नाही. टामटूम आमदार म्हणून ते जनतेत परिचित झाले आहेत. आता ते शहराचे गतवैभव पुन्हा आणू अशी घोषणा करू लागले आहेत आणि अनेक आश्वासने देत फिरत आहेत. त्यात त्यांनी बोटिंग क्लब पुन्हा नव्याने सुरू करण्याची घोषणा केली आहे.मात्र बारा वर्षात त्यांना जुन्या बोटी दुरुस्त करता आल्या नाहीत. त्या आम्ही आमच्या कार्यकाळात नवीन बोटी आणल्या. आणि त्याच बोटीत केसरकरांनी जलसफरीचा आनंद घेत मोती तलावात अनेक नवीन प्रकल्प राबविण्याच्या घोषणा करत आहेत.आम्ही मोती तलावाकाठी भरलेल्या आठवडा बाजाराला केसरकरांसह शिवसैनिकांनी विरोध केला. मात्र खाऊ गल्ली सारखा नवीन प्रकल्प केसरकर याच फुटपाथवर राबवत आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होणार नाही का? असा सवालही परब यांनी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकर