शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आमदार दीपक केसरकरांना निवडणुका आल्या की 'उद्योग' आठवतात, संजू परबांचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 15:59 IST

कोणीही निदा.. कोणीही वदा, टामटूम करणे हा माझा धंदा असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडविली

सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर यांना निवडणुका आल्या की उद्योग आठवतात. त्यांनी गेली बारा वर्षे काथ्या उद्योग देतो म्हणून फसवणूक केली. आता खाऊ गल्लीच्या नावावर जनतेची दिशाभूल करतात अशी टिका माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली. यावेळी त्यांनी कोणीही निदा कोणीही वदा.. टामटूम करणे हा माझा धंदा असे म्हणत केसरकर यांची खिल्ली उडविली. 

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावले, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक उपस्थित होते.परब म्हणाले, केसरकरांनी मला आपल्या लिस्ट मधून डिलीट केले, तर निवडणुकीच्या तोंडावर त्यांना दारोदारी फिरण्याची वेळ का आली? विधानसभा निवडणुकीत टोकाचे आरोप करणाऱ्या बबन साळगावकरां बरोबर त्यांनी हातमिळवणी का केली ? असा सवाल ही त्यांनी केला.  

पालिकेत अजूनही शिवसेनेचे काही नगरसेवक जाऊन बसत आहेत. त्यांना त्या ठिकाणी येण्यास मुख्याधिकाऱ्यांनी बंदी घालावी, अन्यथा आमचे नगरसेवक सुद्धा नगरपालिकेत जाऊन ठाण मांडून बसतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मुख्य अधिकारी यांची भूमिका शिवसेनेच्या शाखाप्रमुखा प्रमाणे आहे. ते त्यांच्या बाजूने आपला कारभार हाकत आहेत. शहरातील केशवसुत कट्टा वापरास धोकादायक आहे, असे ऑडिट झाले असताना सुद्धा त्या ठिकाणी तुतरी बसविण्यासाठी शिवसैनिकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे भविष्यात त्या ठिकाणी गर्दी झाल्यास आणि तो पूल कोसळून कोणतीही जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असेही परब म्हणाले.निवडणुका आल्या की केसरकरांना फसव्या घोषणा करण्यापलीकडे काही जमलेले नाही. टामटूम आमदार म्हणून ते जनतेत परिचित झाले आहेत. आता ते शहराचे गतवैभव पुन्हा आणू अशी घोषणा करू लागले आहेत आणि अनेक आश्वासने देत फिरत आहेत. त्यात त्यांनी बोटिंग क्लब पुन्हा नव्याने सुरू करण्याची घोषणा केली आहे.मात्र बारा वर्षात त्यांना जुन्या बोटी दुरुस्त करता आल्या नाहीत. त्या आम्ही आमच्या कार्यकाळात नवीन बोटी आणल्या. आणि त्याच बोटीत केसरकरांनी जलसफरीचा आनंद घेत मोती तलावात अनेक नवीन प्रकल्प राबविण्याच्या घोषणा करत आहेत.आम्ही मोती तलावाकाठी भरलेल्या आठवडा बाजाराला केसरकरांसह शिवसैनिकांनी विरोध केला. मात्र खाऊ गल्ली सारखा नवीन प्रकल्प केसरकर याच फुटपाथवर राबवत आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होणार नाही का? असा सवालही परब यांनी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकर