शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

..अन्यथा पंतप्रधान मोदी मंत्रीपद काढून घेतील, आमदार केसरकरांचा राणेंना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 18:34 IST

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना समोरच्याची टिंगल करता येते. पण त्यांना आदर्श काम करता येत नाही. सिंधुदुर्ग ...

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना समोरच्याची टिंगल करता येते. पण त्यांना आदर्श काम करता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या पंचवीस वर्षांत त्यांना जेवढा निधी आणता आला नाही तेवढा मी पाच वर्षात आणला. त्यामुळेच त्याच्या नाकावर टिच्चून जनता मला सतत निवडून देत आहे. नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री पद दिले याचा कोकणला अभिमान आहे. मात्र त्यांनी चांगल काम करून दाखवावे अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंत्र्याच्या कामाबाबत फार गंभीर असतात. त्यामुळे दिलेले मंत्रीपद ही काढून घेतील असा टोला माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.केसरकर म्हणाले, माझी तुलना सरपंचा सोबत करता पण मी मंत्री असतानाही तसाच होतो. आणि आमदार असताना ही तसाच आहे. राणेंना मंत्री असताना लोक विचारतात आणि ते मंत्री नसले की ते सैरभैर कसे वागतात हे माहित आहे. त्यामुळे राणेंनी टिका करण्यापेक्षा कोकणचा विकास कसा करता होईल हे बघावे असेही केसरकर म्हणाले.राणेनी गेल्या पंचवीस वर्षांत जेवढा निधी आणला तेवढा मी मागील पाच वर्षांत आणला. त्यामुळे त्यांनी टिका करताना विचार करावा. तसेच विधान सभेत चांगले काम केले नसते तर पाच वर्षे अर्थसंकल्प मांडला नसता. विरोधकांनी मला प्रश्न विचारले त्याची उत्तरे देता आली नसती असे सांगत राणेंनी केलेले आरोप खोडून काढले.'ते' उघड करायला लावू नये

माझ्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत राणेंनी मला पाडण्यासाठी राजन तेली करवी निरोप पाठवला होता. पण तेव्हा त्यांच्या सरपंचानी हा निरोप धुडकावून लावला. हे उघड करायला राणेंनी लावू नये असा इशारा ही केसरकर यांनी दिला.यावेळी या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, अशोक दळवी, सुदन्वा आरेकर, योगेश नाईक उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Dipak Kesarkarदीपक केसरकर