शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्याचे आदेश, मंत्री केसरकरांचा विद्युत निर्मिती प्रकल्पाला शॉक

By अनंत खं.जाधव | Updated: March 29, 2023 18:29 IST

सर्व वीज बाहेरच्या जिल्ह्यांना पुरविण्यात येते. त्यामुळे याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना

अनंत जाधव सावंतवाडी: दोडामार्ग तालुक्यातील विजघर येथील महालक्ष्मी विद्युत निर्मिती प्रकल्पाला तिलारी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाटबंधारे विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही विद्युत निर्मिती कंपनी गेल्या बारा वर्षांपासून वीजनिर्मितीचे काम करत असून पहिल्यांदाच या कंपनीला मंत्री केसरकर यांनी शॉक दिला आहे.तिलारी या आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्यावर विजघर येथे महालक्ष्मी विद्युत निर्मिती प्रकल्प 2010 मध्ये आघाडी सरकारच्या काळात उभारण्यात आला आहे. या विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी तिलारी धरणातून किती पाणी घ्यायचे यांची कोणती ही नोंद पाटबंधारे विभागाकडे नाही. कंपनीशी झालेल्या करारात ही नमूद करण्यात आले नाही. विशेष म्हणजे तिलारी धरणाचे गेट हे या विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या तोंडावर असल्याने प्रकल्पाला धरणातून किती पाणी जाते याचा अंदाज येत नाही. तसेच या विज निर्मिती प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या विजेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोणताही फायदा नाही. ही सर्व वीज बाहेरच्या जिल्ह्यांना पुरविण्यात येते. त्यामुळे याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसतो.तिलारी पाटबंधारे प्रकल्प हा 16 टीएमसीचा आहे. मात्र सध्या या धरण क्षेत्रात 54 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. पावसाळ्यात हे धरण क्षेत्र पूर्ण पणे भरलेले असते. उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने याच्या झळा या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना बसतात. परिणामी धरण लाभ क्षेत्रातील शेतीला तसेच बागायतीला पाणी मिळत नाही.अनेक वेळा यावर आंदोलने झाली, मात्र कोणीही दखल घेतली नाही. सोमवारी (दि.27) मंत्री केसरकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही दोडामार्ग मधील काही शेतकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याचा मुद्दा लावून धरला. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी याच बैठकीत अधीक्षक अभियंता विजय थोरात यांना विजघर विद्युत निर्मिती प्रकल्पाचे पाणी तत्काळ बंद करा पाच कोटीची वीज आणि पन्नास कोटीचे पाणी कसे शक्य फायदा कोणाला या सगळ्याची चौकशी लावण्याचे सांगत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी त्याचा रोख कंपनीवर कमी आणि राजकीय विरोधकांवर जास्त होता. त्यातच ही कंपनी विरोधी पक्षनेते अजित पवार याच्या जवळच्या व्यक्तीची असल्याने केसरकर यांना आयती संधी आल्याचे बोलले जात आहे.आमचे शेतकऱ्यांचे सरकार : केसरकर या विद्युत प्रकल्पाला उन्हाळ्यात पाणी देणे शक्य नाही. पावसाळ्यात हवे तेवढे पाणी द्या महाराष्ट्रात स्थापन झालेले सरकार हे शेतकऱ्यांचे आहे असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTilari damतिलारि धरणelectricityवीजDeepak Kesarkarदीपक केसरकर