शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

मला गावबंदी करायची कोणाची हिम्मत, कावळेसाद ग्रामस्थांच्या इशाऱ्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

By अनंत खं.जाधव | Updated: July 29, 2024 17:15 IST

मला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचा डाव

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काही जमीन खरेदी करणारे आले आहेत. त्याचा कदाचित कावळेसाद पॉइंट वरच्या जमिनीवर डोळा असेल म्हणूनच ते माझ्याबद्दल गैरसमज पसरवित आहेत. पण मी मंदिरात येऊन सांगतो की माझा याप्रकरणाशी काडीशीही संबध नाही त्यामुळे मला यात ओढू नका. मी काल आज आणि उद्या ग्रामस्थासोबतच आहे. त्यामुळे मला गावबंदी करायची कोणाची हिम्मत असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे शालेय शिक्षण तथा भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी मला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. गेळे येथील ग्रामस्थांनी रविवारी बैठक घेऊन कावळेसाद पॉइंटवरील जमिनी वरून केसरकर यांना गावबंदीचा इशारा दिला होता. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर देत अप्रत्यक्ष तालूका मंडळ अध्यक्ष संदीप गावडे वर टीकास्त्र सोडले आहे.केसरकर म्हणाले, कावळेसात पॉईंटवरील जमिनीवरून ग्रामस्थांमध्ये जो काही गैरसमज आहे तो निश्चित दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण मुद्दामहून त्यांच्या कोणतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे हे योग्य नाही. कावळेसाद पॉईंट वरील सर्व जमीन शासन पर्यटन प्रकल्पासाठी घेईलच असे नाही. जर त्यातील उर्वरित जमीन शिल्लक राहिली तर ती जमीन निश्चितच ग्रामस्थांना दिली जाईल.आंबोली, चौकुळ, गेळेचा जमिन प्रश्न ३० वर्ष प्रलंबित होता.या जमीनीवर आज पर्यत महाराष्ट्र शासनाची वहिवाट आहे. अशा जमीनीचे कधीही वाटप होत नाही पण जमीनी शेतकऱ्यांना. मिळाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. तसं असेल तर देवळात येऊन नारळाला हात लावण्यास मी तयार आहे.असे आवाहन केसरकर यांनी दिले आहे.फक्त आंबोली व गेळे ग्रामस्थांचं एकच म्हणणं होतं की खाजगी जमीन वाटप करतना वन संबंधित जमीन ही वाटली जावी त्यामुळेच एवढे दिवस या जमीन वाटपाचा प्रश्न राहिला होता पण आता काहीजण नव्याने जमीन वाटप करतो म्हणून पुढे आले आहेत.त्यांना मला एकच सांगायचे आहे की आमचे या गावांशी वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत आज तुम्ही त्यांना माझ्याबद्दल गैरसमज पसरवून वेगळे करू शकता पण हे फार काळ टिकणार नाही.लोकांना समजून चुकेल की.. केव्हा ना केव्हातरी लोकांना समजून चुकेल की कोण खरे आणि कोण खोटे मी मंदिरात येऊन नारळावर हात ठेवून सांगेन की यामध्ये मी ग्रामस्थांसाठी काय काय केले ते आता काहिसा या कावळेसाद पॉइंटवरील जमिनीवर डोळा असेल म्हणूनच हे सर्व चालले आहे असा संशय ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर