शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मला गावबंदी करायची कोणाची हिम्मत, कावळेसाद ग्रामस्थांच्या इशाऱ्यावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

By अनंत खं.जाधव | Updated: July 29, 2024 17:15 IST

मला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचा डाव

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या काही जमीन खरेदी करणारे आले आहेत. त्याचा कदाचित कावळेसाद पॉइंट वरच्या जमिनीवर डोळा असेल म्हणूनच ते माझ्याबद्दल गैरसमज पसरवित आहेत. पण मी मंदिरात येऊन सांगतो की माझा याप्रकरणाशी काडीशीही संबध नाही त्यामुळे मला यात ओढू नका. मी काल आज आणि उद्या ग्रामस्थासोबतच आहे. त्यामुळे मला गावबंदी करायची कोणाची हिम्मत असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे शालेय शिक्षण तथा भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी मला राजकीय दृष्ट्या बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. गेळे येथील ग्रामस्थांनी रविवारी बैठक घेऊन कावळेसाद पॉइंटवरील जमिनी वरून केसरकर यांना गावबंदीचा इशारा दिला होता. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर देत अप्रत्यक्ष तालूका मंडळ अध्यक्ष संदीप गावडे वर टीकास्त्र सोडले आहे.केसरकर म्हणाले, कावळेसात पॉईंटवरील जमिनीवरून ग्रामस्थांमध्ये जो काही गैरसमज आहे तो निश्चित दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण मुद्दामहून त्यांच्या कोणतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहे हे योग्य नाही. कावळेसाद पॉईंट वरील सर्व जमीन शासन पर्यटन प्रकल्पासाठी घेईलच असे नाही. जर त्यातील उर्वरित जमीन शिल्लक राहिली तर ती जमीन निश्चितच ग्रामस्थांना दिली जाईल.आंबोली, चौकुळ, गेळेचा जमिन प्रश्न ३० वर्ष प्रलंबित होता.या जमीनीवर आज पर्यत महाराष्ट्र शासनाची वहिवाट आहे. अशा जमीनीचे कधीही वाटप होत नाही पण जमीनी शेतकऱ्यांना. मिळाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न केले कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. तसं असेल तर देवळात येऊन नारळाला हात लावण्यास मी तयार आहे.असे आवाहन केसरकर यांनी दिले आहे.फक्त आंबोली व गेळे ग्रामस्थांचं एकच म्हणणं होतं की खाजगी जमीन वाटप करतना वन संबंधित जमीन ही वाटली जावी त्यामुळेच एवढे दिवस या जमीन वाटपाचा प्रश्न राहिला होता पण आता काहीजण नव्याने जमीन वाटप करतो म्हणून पुढे आले आहेत.त्यांना मला एकच सांगायचे आहे की आमचे या गावांशी वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत आज तुम्ही त्यांना माझ्याबद्दल गैरसमज पसरवून वेगळे करू शकता पण हे फार काळ टिकणार नाही.लोकांना समजून चुकेल की.. केव्हा ना केव्हातरी लोकांना समजून चुकेल की कोण खरे आणि कोण खोटे मी मंदिरात येऊन नारळावर हात ठेवून सांगेन की यामध्ये मी ग्रामस्थांसाठी काय काय केले ते आता काहिसा या कावळेसाद पॉइंटवरील जमिनीवर डोळा असेल म्हणूनच हे सर्व चालले आहे असा संशय ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर