शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मंत्री केसरकर अन् त्यांच्या बगलबच्च्यांनी अर्बन बँक अडचणीत आणली, जयेंद्र परुळेकरांचा आरोप

By अनंत खं.जाधव | Updated: July 1, 2024 16:50 IST

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी सावंतवाडी शहराचे वैभव असलेल्या अर्बन बँकेला अडचणीत आणले, असा आरोप करीत ...

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी सावंतवाडी शहराचे वैभव असलेल्या अर्बन बँकेला अडचणीत आणले, असा आरोप करीत बँक बुडीत जाण्यासाठी कोणाला कशी कर्ज दिली याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्त डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सोमवारी केली. दरम्यान मल्टीस्पेशालिटीचे गाजर दाखविणार्‍या केसरकरांनी आहे ते हॉस्पिटल सुधारावे, त्या ठिकाणी लोकांना डॉक्टर आणि औषधे उपलब्ध करुन द्यावीत, सीटिस्कॅन यंत्रणा सुरू करावी, आचारसंहितेचे कारण नको, आता लोकांचे आचार घालण्याची वेळ आली, असे ही त्यांनी सुनावले.परुळेकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अर्बन बँकेच्या विलीनीकरणावरुन मंत्री केसरकर व त्यांच्या सहकार्‍यांना “टार्गेट” केले. ते म्हणाले, या ठिकाणी १९४५ पासून सावंतवाडीचे वैभव असलेल्या अर्बन बँकेचे विलीनीकरण करावे लागले ही शरमेची बाब आहे. या ठिकाणी केसरकर मंत्री होते. त्यांनी स्वतः बँकेत अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मग बँकेला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न का केले नाही? असा उलट सवाल केला. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या लोकांनी चुकीच्या पध्दतीने कर्ज वाटप केले, वसूली केली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी निर्माण करण्यात आलेली ही बँक बुडीत निघाली. याचे मोठे दुख आहे. याबाबत सर्वांनीच आत्मचिंतन करणे काळाची गरज आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Sawantwadiसावंतवाडीbankबँक