शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

मंत्री केसरकर अन् त्यांच्या बगलबच्च्यांनी अर्बन बँक अडचणीत आणली, जयेंद्र परुळेकरांचा आरोप

By अनंत खं.जाधव | Updated: July 1, 2024 16:50 IST

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी सावंतवाडी शहराचे वैभव असलेल्या अर्बन बँकेला अडचणीत आणले, असा आरोप करीत ...

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी सावंतवाडी शहराचे वैभव असलेल्या अर्बन बँकेला अडचणीत आणले, असा आरोप करीत बँक बुडीत जाण्यासाठी कोणाला कशी कर्ज दिली याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्त डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सोमवारी केली. दरम्यान मल्टीस्पेशालिटीचे गाजर दाखविणार्‍या केसरकरांनी आहे ते हॉस्पिटल सुधारावे, त्या ठिकाणी लोकांना डॉक्टर आणि औषधे उपलब्ध करुन द्यावीत, सीटिस्कॅन यंत्रणा सुरू करावी, आचारसंहितेचे कारण नको, आता लोकांचे आचार घालण्याची वेळ आली, असे ही त्यांनी सुनावले.परुळेकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अर्बन बँकेच्या विलीनीकरणावरुन मंत्री केसरकर व त्यांच्या सहकार्‍यांना “टार्गेट” केले. ते म्हणाले, या ठिकाणी १९४५ पासून सावंतवाडीचे वैभव असलेल्या अर्बन बँकेचे विलीनीकरण करावे लागले ही शरमेची बाब आहे. या ठिकाणी केसरकर मंत्री होते. त्यांनी स्वतः बँकेत अध्यक्ष म्हणून काम केले आहे. मग बँकेला उर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न का केले नाही? असा उलट सवाल केला. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या लोकांनी चुकीच्या पध्दतीने कर्ज वाटप केले, वसूली केली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी निर्माण करण्यात आलेली ही बँक बुडीत निघाली. याचे मोठे दुख आहे. याबाबत सर्वांनीच आत्मचिंतन करणे काळाची गरज आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Sawantwadiसावंतवाडीbankबँक