शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

वादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:50 IST

विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

ठळक मुद्देवादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले शेतकऱ्यांवर कोरोनानंतर पावसाचे संकट; नुकसानीची मागणी

बांदा : विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने विलवडे गावातील कलिंगड, पालेभाज्या, काकडी, दोडकी, वांगी, भेंडी या उत्पादनांना बाजारपेठ नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यांचा माल जागेवर कुजून गेला. त्यातच आता वादळी पावसाने दणका दिल्याने केळी बागायती, आंबा, काजू व इतर पिकांचे नुकसान झाले.सध्या उन्हाळ्याचा शेवटचा महिना असल्याने लोकांनी मिरच्या, भुईमूग, कडधान्ये, कोकम, इतर साहित्य उन्हात वाळत ठेवले होते. त्यांचे वादळी पावसात भिजून नुकसान झाले. त्याचप्रमाणे यावर्षी काजू पिकाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.गेले दोन दिवस सायंकाळच्या वेळी विजांचा गडागडाट होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले.विलवडे (टेंबवाडी) येथील केळी बागायतीतील १०० हून अधिक केळी घडांचे, पोफळी व इतर पिकांचे मिळून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी यशवंत नारायण सावंत व विठ्ठल नारायण सावंत यानी सांगितले.

मनोज दळवी, प्रमोद दळवी, श्रीराम सावंत, सूर्यकांत दळवी आदी १० हून अधिक शेतकऱ्यांच्या केळी बागायतींचे नुकसान झाले आहे. सरकारने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

विलवडे गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील तरूण तुंटपुज्या पगाराच्या नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीकडे वळला आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायातून गावाचा विकास साधण्यात यशस्वी झाले आहेत.

अपार कष्ट करण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर केळी, भाजीपाला व फळबागांबरोबरच कुक्कुटपालन, पशुपालन व्यवसाय करून एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला आले आहे. पण वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल का ? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग