शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:50 IST

विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

ठळक मुद्देवादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले शेतकऱ्यांवर कोरोनानंतर पावसाचे संकट; नुकसानीची मागणी

बांदा : विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने विलवडे गावातील कलिंगड, पालेभाज्या, काकडी, दोडकी, वांगी, भेंडी या उत्पादनांना बाजारपेठ नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यांचा माल जागेवर कुजून गेला. त्यातच आता वादळी पावसाने दणका दिल्याने केळी बागायती, आंबा, काजू व इतर पिकांचे नुकसान झाले.सध्या उन्हाळ्याचा शेवटचा महिना असल्याने लोकांनी मिरच्या, भुईमूग, कडधान्ये, कोकम, इतर साहित्य उन्हात वाळत ठेवले होते. त्यांचे वादळी पावसात भिजून नुकसान झाले. त्याचप्रमाणे यावर्षी काजू पिकाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.गेले दोन दिवस सायंकाळच्या वेळी विजांचा गडागडाट होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले.विलवडे (टेंबवाडी) येथील केळी बागायतीतील १०० हून अधिक केळी घडांचे, पोफळी व इतर पिकांचे मिळून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी यशवंत नारायण सावंत व विठ्ठल नारायण सावंत यानी सांगितले.

मनोज दळवी, प्रमोद दळवी, श्रीराम सावंत, सूर्यकांत दळवी आदी १० हून अधिक शेतकऱ्यांच्या केळी बागायतींचे नुकसान झाले आहे. सरकारने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

विलवडे गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील तरूण तुंटपुज्या पगाराच्या नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीकडे वळला आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायातून गावाचा विकास साधण्यात यशस्वी झाले आहेत.

अपार कष्ट करण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर केळी, भाजीपाला व फळबागांबरोबरच कुक्कुटपालन, पशुपालन व्यवसाय करून एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला आले आहे. पण वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल का ? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग