शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

वादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:50 IST

विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

ठळक मुद्देवादळी पावसाने लाखोंचे नुकसान, विलवडेला पावसाने झोडपले शेतकऱ्यांवर कोरोनानंतर पावसाचे संकट; नुकसानीची मागणी

बांदा : विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने विलवडे गावातील कलिंगड, पालेभाज्या, काकडी, दोडकी, वांगी, भेंडी या उत्पादनांना बाजारपेठ नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यांचा माल जागेवर कुजून गेला. त्यातच आता वादळी पावसाने दणका दिल्याने केळी बागायती, आंबा, काजू व इतर पिकांचे नुकसान झाले.सध्या उन्हाळ्याचा शेवटचा महिना असल्याने लोकांनी मिरच्या, भुईमूग, कडधान्ये, कोकम, इतर साहित्य उन्हात वाळत ठेवले होते. त्यांचे वादळी पावसात भिजून नुकसान झाले. त्याचप्रमाणे यावर्षी काजू पिकाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.गेले दोन दिवस सायंकाळच्या वेळी विजांचा गडागडाट होऊन सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले.विलवडे (टेंबवाडी) येथील केळी बागायतीतील १०० हून अधिक केळी घडांचे, पोफळी व इतर पिकांचे मिळून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी यशवंत नारायण सावंत व विठ्ठल नारायण सावंत यानी सांगितले.

मनोज दळवी, प्रमोद दळवी, श्रीराम सावंत, सूर्यकांत दळवी आदी १० हून अधिक शेतकऱ्यांच्या केळी बागायतींचे नुकसान झाले आहे. सरकारने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आहे.

विलवडे गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावातील तरूण तुंटपुज्या पगाराच्या नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीकडे वळला आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायातून गावाचा विकास साधण्यात यशस्वी झाले आहेत.

अपार कष्ट करण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर केळी, भाजीपाला व फळबागांबरोबरच कुक्कुटपालन, पशुपालन व्यवसाय करून एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावारूपाला आले आहे. पण वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल का ? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग