शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

'कोकणच्या विकासासाठी तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 10:46 IST

शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात असताना काही काळासाठी आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली. यावेळी, लोकमतशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली

अनंत जाधव 

सावंतवाडी : कोकणचा विकास करण्यासाठी तज्ञांची समिती अभ्यास करत असून, या समितीने कोकणात विकासाच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत घेऊन काही केंद्र उभी होऊ शकतात असा सल्ला दिला आहे. त्याचा अतिम अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे ठेवला जाईल आणि त्यातून कोकणच्या विकासाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिली. 

शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात असताना काही काळासाठी आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली. यावेळी, लोकमतशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी माजी मंत्री प्रविण भोसले, व्हिक्टर डॉन्टस, पुंडलिक दळवी,चित्रा देसाई, हिदायततुल्ला खान उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, आपण फलोत्पादन योजना कोकणात दिली, पण नंतर त्याचे काहीच झाले नाही. आता कोकणाच्या बाबतीत केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची शाखा पुणे येथील विद्यापीठात आहे. त्यामध्ये काही तज्ज्ञ काम करतात, त्या तज्ज्ञांच्या माध्यमातून कोकण विकासाचा अभ्यास केला जाईल, ही समिती येथील पारंपरिक व्यवसाया व्यतिरिक्त अन्य काही विकासाच्या प्रयोग करता येतील का याचा अभ्यास करून आपला अंतिम अहवाल राज्य सरकारकडे देतील. त्या अहवालानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन कोकण विकासाला दिशा दिली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपचे नेते सुरक्षा व्यवस्थेवरून सरकारवर टिका करत आहेत. पण भाजपच्या नेत्यांच्याच फक्त सुरक्षा काढल्या नाहीत तर सरकारमधील काही मंत्र्याच्याही सुरक्षाही काढल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या टिकेला अर्थ नाही. सुरक्षा कोणाला द्यायची आणि काढायची हे आम्ही ठरवत नाही, तर पोलिसांची एक समिती ठरवत असते. त्यांच्या अहवालानुसार सुरक्षा वाढ व कमी केल्या गेल्या आहेत. पण, केंद्र सरकारने भाजपच्या नेत्यांना सुरक्षा पुरवल्या असतील तर त्यांचे सरकार आहे, असे सांगत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. 

राणेंना धोका की राणेंपासून धोकाभाजपच्या काही नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील असे म्हटले होते. पण, यावर पवार यांनी राणेपासून धोका का असे म्हणत मिश्कील टिपण्णी केली. तसेच पोलीस ठरवतील त्यांना सुरक्षा द्यायची की नाही, अशीही पुष्टी त्यांनी जोडली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे