शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

'कोकणच्या विकासासाठी तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 10:46 IST

शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात असताना काही काळासाठी आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली. यावेळी, लोकमतशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली

अनंत जाधव 

सावंतवाडी : कोकणचा विकास करण्यासाठी तज्ञांची समिती अभ्यास करत असून, या समितीने कोकणात विकासाच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत घेऊन काही केंद्र उभी होऊ शकतात असा सल्ला दिला आहे. त्याचा अतिम अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे ठेवला जाईल आणि त्यातून कोकणच्या विकासाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिली. 

शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात असताना काही काळासाठी आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली. यावेळी, लोकमतशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी माजी मंत्री प्रविण भोसले, व्हिक्टर डॉन्टस, पुंडलिक दळवी,चित्रा देसाई, हिदायततुल्ला खान उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, आपण फलोत्पादन योजना कोकणात दिली, पण नंतर त्याचे काहीच झाले नाही. आता कोकणाच्या बाबतीत केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची शाखा पुणे येथील विद्यापीठात आहे. त्यामध्ये काही तज्ज्ञ काम करतात, त्या तज्ज्ञांच्या माध्यमातून कोकण विकासाचा अभ्यास केला जाईल, ही समिती येथील पारंपरिक व्यवसाया व्यतिरिक्त अन्य काही विकासाच्या प्रयोग करता येतील का याचा अभ्यास करून आपला अंतिम अहवाल राज्य सरकारकडे देतील. त्या अहवालानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन कोकण विकासाला दिशा दिली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपचे नेते सुरक्षा व्यवस्थेवरून सरकारवर टिका करत आहेत. पण भाजपच्या नेत्यांच्याच फक्त सुरक्षा काढल्या नाहीत तर सरकारमधील काही मंत्र्याच्याही सुरक्षाही काढल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या टिकेला अर्थ नाही. सुरक्षा कोणाला द्यायची आणि काढायची हे आम्ही ठरवत नाही, तर पोलिसांची एक समिती ठरवत असते. त्यांच्या अहवालानुसार सुरक्षा वाढ व कमी केल्या गेल्या आहेत. पण, केंद्र सरकारने भाजपच्या नेत्यांना सुरक्षा पुरवल्या असतील तर त्यांचे सरकार आहे, असे सांगत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. 

राणेंना धोका की राणेंपासून धोकाभाजपच्या काही नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील असे म्हटले होते. पण, यावर पवार यांनी राणेपासून धोका का असे म्हणत मिश्कील टिपण्णी केली. तसेच पोलीस ठरवतील त्यांना सुरक्षा द्यायची की नाही, अशीही पुष्टी त्यांनी जोडली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे