शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
2
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
3
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
4
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
5
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
6
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
7
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

'कोकणच्या विकासासाठी तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येताच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 10:46 IST

शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात असताना काही काळासाठी आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली. यावेळी, लोकमतशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली

अनंत जाधव 

सावंतवाडी : कोकणचा विकास करण्यासाठी तज्ञांची समिती अभ्यास करत असून, या समितीने कोकणात विकासाच्या दृष्टीने विज्ञान व तंत्रज्ञानाची मदत घेऊन काही केंद्र उभी होऊ शकतात असा सल्ला दिला आहे. त्याचा अतिम अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे ठेवला जाईल आणि त्यातून कोकणच्या विकासाची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिली. 

शरद पवार हे गोव्यावरून कोल्हापूरला जात असताना काही काळासाठी आंबोलीतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली. यावेळी, लोकमतशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी माजी मंत्री प्रविण भोसले, व्हिक्टर डॉन्टस, पुंडलिक दळवी,चित्रा देसाई, हिदायततुल्ला खान उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, आपण फलोत्पादन योजना कोकणात दिली, पण नंतर त्याचे काहीच झाले नाही. आता कोकणाच्या बाबतीत केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची शाखा पुणे येथील विद्यापीठात आहे. त्यामध्ये काही तज्ज्ञ काम करतात, त्या तज्ज्ञांच्या माध्यमातून कोकण विकासाचा अभ्यास केला जाईल, ही समिती येथील पारंपरिक व्यवसाया व्यतिरिक्त अन्य काही विकासाच्या प्रयोग करता येतील का याचा अभ्यास करून आपला अंतिम अहवाल राज्य सरकारकडे देतील. त्या अहवालानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होऊन कोकण विकासाला दिशा दिली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपचे नेते सुरक्षा व्यवस्थेवरून सरकारवर टिका करत आहेत. पण भाजपच्या नेत्यांच्याच फक्त सुरक्षा काढल्या नाहीत तर सरकारमधील काही मंत्र्याच्याही सुरक्षाही काढल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या टिकेला अर्थ नाही. सुरक्षा कोणाला द्यायची आणि काढायची हे आम्ही ठरवत नाही, तर पोलिसांची एक समिती ठरवत असते. त्यांच्या अहवालानुसार सुरक्षा वाढ व कमी केल्या गेल्या आहेत. पण, केंद्र सरकारने भाजपच्या नेत्यांना सुरक्षा पुरवल्या असतील तर त्यांचे सरकार आहे, असे सांगत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले. 

राणेंना धोका की राणेंपासून धोकाभाजपच्या काही नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सरकार जबाबदार राहील असे म्हटले होते. पण, यावर पवार यांनी राणेपासून धोका का असे म्हणत मिश्कील टिपण्णी केली. तसेच पोलीस ठरवतील त्यांना सुरक्षा द्यायची की नाही, अशीही पुष्टी त्यांनी जोडली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारsindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे