शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

गुहागरात मसापचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

By admin | Updated: September 24, 2014 00:08 IST

निमित्त वर्धापन दिनाचे : नवोदिता लेखकांसाठी ठरणार पर्वणी

असगोली : मराठी भाषा व साहित्य यांची सर्वांगीण प्रगती आणि विकासासाठी कार्यरत असणाऱ्या तसेच मराठी कवी व साहित्यिकांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गुहागर शाखेच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २९ व ३० नोव्हेंबर रोजी भंडारी भवन, गुहागर येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनातून गुहागरातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीला अधिकाधिक चालना देण्याचा संयोजकांचा मानस आहे. त्याच धर्तीवर या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर गुहागर बाजारपेठेत होणार आहे.जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व कवी प्रा. अशोक बागवे (मुंबई), कवी इंद्रजीत भालेराव (परभणी), भास्कर बढे (बीड), श्रीराम दुर्गे (चिपळूण), दादा मडकईकर (सिंधुदुर्ग) कवी राष्ट्रपाल सावंत (चिपळूण), कैलास गांधी (दापोली) अनेक प्रख्यात साहित्यिकांचा सहभाग लाभणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात पर्यावरण व ग्रंथदिंडी, शोभायात्रा, उद्घाटन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलांचे लोककलावंतांकडून सादरीकरण व त्यांचा सन्मान, परिसंवाद, कथाकथन, ग्रंथप्रदर्शन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक - युवतींसाठी शिक्षक व साहित्य प्रेमींसाठी विशेष कार्यक्रमांचा भर असणार आहे.संमेलन गुहागरचा मानबिंदू ठरावा, यासाठी संयोजन समिती प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर, प्रा. मनाली बावधनकर, कार्यवाह ईश्वरचंद्र हलगरे, सहकार्यवाह ज्ञानेश्वर झगडे, खजिनदार प्रा. महावीर थरकार, कार्यकारी सदस्य संजय गमरे, सल्लागार अ‍ॅड. संकेत साळवी यांनी केले आहे. (वार्ताहर)महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संमेलनामुळे गुहागर येथील साहित्य चळवळीला उजाळा मिळणार.संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे गठन.नामवंत कवींचा सहभाग.तयारीला लागले गुहागरकर.विद्यार्थी, युवावर्गासाठी विशेष कार्यक्रम.