शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात मसापचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

By admin | Updated: September 24, 2014 00:08 IST

निमित्त वर्धापन दिनाचे : नवोदिता लेखकांसाठी ठरणार पर्वणी

असगोली : मराठी भाषा व साहित्य यांची सर्वांगीण प्रगती आणि विकासासाठी कार्यरत असणाऱ्या तसेच मराठी कवी व साहित्यिकांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गुहागर शाखेच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २९ व ३० नोव्हेंबर रोजी भंडारी भवन, गुहागर येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनातून गुहागरातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीला अधिकाधिक चालना देण्याचा संयोजकांचा मानस आहे. त्याच धर्तीवर या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर गुहागर बाजारपेठेत होणार आहे.जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व कवी प्रा. अशोक बागवे (मुंबई), कवी इंद्रजीत भालेराव (परभणी), भास्कर बढे (बीड), श्रीराम दुर्गे (चिपळूण), दादा मडकईकर (सिंधुदुर्ग) कवी राष्ट्रपाल सावंत (चिपळूण), कैलास गांधी (दापोली) अनेक प्रख्यात साहित्यिकांचा सहभाग लाभणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात पर्यावरण व ग्रंथदिंडी, शोभायात्रा, उद्घाटन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलांचे लोककलावंतांकडून सादरीकरण व त्यांचा सन्मान, परिसंवाद, कथाकथन, ग्रंथप्रदर्शन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक - युवतींसाठी शिक्षक व साहित्य प्रेमींसाठी विशेष कार्यक्रमांचा भर असणार आहे.संमेलन गुहागरचा मानबिंदू ठरावा, यासाठी संयोजन समिती प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर, प्रा. मनाली बावधनकर, कार्यवाह ईश्वरचंद्र हलगरे, सहकार्यवाह ज्ञानेश्वर झगडे, खजिनदार प्रा. महावीर थरकार, कार्यकारी सदस्य संजय गमरे, सल्लागार अ‍ॅड. संकेत साळवी यांनी केले आहे. (वार्ताहर)महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संमेलनामुळे गुहागर येथील साहित्य चळवळीला उजाळा मिळणार.संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे गठन.नामवंत कवींचा सहभाग.तयारीला लागले गुहागरकर.विद्यार्थी, युवावर्गासाठी विशेष कार्यक्रम.