शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कचऱ्याच्या ठेक्यावरून आघाडी फुटली

By admin | Updated: September 20, 2015 23:53 IST

ठराव ११ विरुद्ध ४ ने मंजूर : आघाडीच्या नगरसेवकांची साथ; एकाकी पडलेल्या नगरसेवक म्हाडगूत यांचा सभात्याग

मालवण : मालवण शहरातील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना शहरातील प्रभाग १ व २ मधील कचरा उचलणाऱ्या ठेकेदार संस्थेच्या मुदतवाढ विषयावरून पालिकेच्या सभेत वादळी चर्चा झाली. ठेकेदारास सुधारण्याची संधी देऊन मुदतवाढ द्यावी या माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्या सूचनेला नगरसेवक महेंद्र म्हाडगूत यांनी आक्षेप नोंदविला. त्यानंतर आचरेकर यांच्या सूचनेनुसार नगरसेविका महानंदा खानोलकर यांनी या विषयावर मांडलेल्या ठरावाला म्हाडगूत यांनी उपसूचना मांडली. पालिकेत पहिल्यांदाच लेखी स्वरूपात मांडलेल्या ठरावावरील उपसूचना ११ विरुद्ध ४ मतांनी फेटाळण्यात आली. मात्र, या ठरावानंतर म्हाडगूत सभात्याग करत सभागृहाबाहेर पडले. एकूणच सभेच्या सुरुवातीला शहर विकास आराखडा विरोधात एकमताने विरोध दर्शवला गेला. मात्र, सभेच्या अखेरच्या टप्प्यात घनकचऱ्याचा मुद्दा तापला आणि म्हाडगूत यांची साथ शहर विकास आघाडीच्या चार नगरसेवकांनी सोडली अन् आघाडीही तुटली असे चित्र दिसून आले.मालवण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ३० मार्चनंतर तब्बल सहा महिन्यांनी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार केणी, महेश जावकर, महेंद्र म्हाडगूत, महानंदा खानोलकर, स्नेहा आचरेकर, संतोषी कांदळकर, दर्शना कासवकर, शीला गिरकर, रेजिना डिसोजा, पूजा करलकर, सेजल परब, नितीन वाळके, जॉन नरोना आदी उपस्थित होते. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील प्रभाग १ व २ येथील कचरा करणे व त्याची विल्हेवाट लावणे यासाठी ठेका पद्धतीने एका संस्थेस काम दिले आहे. त्याची मुदत जानेवारी २०१३ ला संपली. त्यानंतर अन्य ठेकेदार निविदा प्रक्रिया मागूनही उपलब्ध न झाल्याने त्याच संस्थेस मुदतवाढ देण्यात आली. मात्र या संस्थेने शहरात नागरिकांनी तोडलेली झाडी व अन्य कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्याने व अन्य बाबींचा विचार करता दीर्घ मुदतीसाठी व काही रक्कम वाढवून ठेका मिळाल्यास अधिक चांगले काम करणे सोयीस्कर होईल असे पत्र दिले होते. त्यावर आचरेकर यांनी सभागृहाच्या अखत्यारित मुदतवाढ व १० टक्के रक्कम वाढवून देण्याची सूचना मांडली, तर मुख्याधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे काम चांगले नाही. वेळेत कचरा गोल करण्याशी अडचणी निर्माण होत आहेत असे सांगितले. यावर म्हाडगूत यांनी प्रभागातील कचरा वेळेत उचलला जात नसल्याने नागरिक नगरसेवकांना दोषी ठरवितात. आम्हाला ठेकेदाराबद्दल आक्षेप नाही. काम चांगले झाले पाहिजे. त्यामुळे तीन वर्षाची मुदतवाढ देण्यापेक्षा काही मुदतवाढ देवून नवीन ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया काढावी, याला आचरेकर यांनी आक्षेप घेतला. यावर दर्शना कासवकर यांनी ठेकेदाराचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, असे मत मांडले. त्यानंतर घेण्यात आलेल्या मुदतवाढीच्या ठराव सूचनेवरील मतदानात काँग्रेसच्या आचरेकर, सौ. आचरेकर, केणी, पाटकर, खानोलकर, कांदळकर, वराडकर या सात नगरसेवकांसह आघाडीतील उपनगराध्यक्ष वराडकर, जावकर, गिरकर, कासवकर या चार नगरसेवकांसह ११ जणांनी ठरावाच्या बाजूने, तर म्हाडगूत यांनी मांडलेल्या उपसूचनेच्या बाजूने म्हाडगूत यांच्यासह करलकर, डिसोजा, परब यांनी मतदान केले. त्यामुळे मुदतवाढीचा ठराव ११ विरुद्ध ४ मतांनी मंजूर झाला. आघाडीतील चार सदस्यांनी काँग्रेसच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने शहर विकास आघाडी फुटल्याचे दिसून आले, तर उपसूचना मंजूर न झाल्याने नगरसेवक म्हाडगूत यांनी सभात्याग करत सभागृहाबाहेर जाणे पसंत केले. (प्रतिनिधी)यावेळी सभेत इतिवृत्त वाचना दरम्यान आराखडा प्रसिद्ध झाला आहे, त्यात पालिकेतील ३० जुलैच्या ठराव क्रमांक १३९ नुसार बदल केल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, मुळात या सभेस कोणतेही बदल विचारात घेतले जाणार नाही असे प्रशासनाने सांगितले. त्यानंतरही नगरसेवकांनी हरकती स्वरुपात ठराव केला. त्या ठरावातील कोणताही मुद्दा विचारात न घेता आराखड्यात ११ बदल करण्यात आले व ते या ठरावानुसार झाल्याचे दर्शविण्यात आले. सभेच्या माथी हे पाप मारण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागे झारीतील शुक्राचार्याचा हात आहे असे नितीन वाळके यांनी सांगितले. यावर म्हाडगूत यांनी ठराव इतिवृत्तात वाचून तो अंतिम होण्यापूर्वी तो विचारात घेतलाच कसा असे सांगितले. तर मंदार केणी, महेश जावकर, पूजा करलकर, शीला गिरकर यांनीही आक्षेप नोंदविले. सुदेश आचरेकर यांनी या साऱ्या मागे प्रशासन म्हणजेच भाजपा सरकारचा डाव आहे. असे सांगत हा आराखडा अरबी समुद्रात बुडविला जाईल, असे सांगितले.