शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेचे राजकारण करणाऱ्यांना जनता घरी बसविणार, मनोज जरांगेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 15:01 IST

पुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कायद्यात दुरुस्ती करा, जरांगे पाटील यांची मागणी 

- संदीप बोडवे

मालवण: छत्रपतींचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचे युती आणि आघाडीतील सर्वच पक्षांनी राजकारण सुरू केले आहे. हा प्रकार महाराष्ट्रासाठी दुदैवी आहे. अशा घटनेचे राजकारण करणाऱ्या दोन्ही बाजूच्या पक्षांना महाराष्ट्राची जनता घरी बसविणार आहे. यातून कुणाचीही सुटका नाही, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

शनिवारी रात्री मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी मंगल कार्यालय येथे दाखल झाले होते. रविवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्यांनी राजकोट येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, सतीश सावंत, सुशांत नाईक, अर्चना घारे परब, संघटनेचे पदाधिकारी व शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते. 

यावेळी जरांगे पाटील म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्या जवळच्या पवित्र भूमीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा अशा तऱ्हेने कोसळणे ही घटना मनाला वेदना देणारी आहे. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी व्हायलाच हवी. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. कुणीही दोषी असो तो तुरुंगातून सुटता नये. त्याचप्रमाणे भविष्यात महापुरुषांचे पुतळे उभारताना विशेष काळजी घेण्यात यावी. राजकोट येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायद्यात दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. 

जनता हिशेब करणार...छत्रपतींचा पुतळा दुर्घटनेची सध्या युती आणि आघाडीतील सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण सुरू केले आहे. दोघांनीही अशी नाटके सुरूच ठेवली तर जनता त्यांना घरी बसविणार आहे. थोड्याच दिवसात दूध का दूध, पाणी का पाणी होणार असून जनताच यांचा हिशोब करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

मराठा समाज मच्छीमारांच्या बाजूने...वाढवण बंदराच्या कामात जर मच्छिमार समाज विस्थापित होणार असेल तर महाराष्ट्रातील मराठा समाज या मच्छीमारांच्या बाजूने उभा राहणार आहे. वाढवण येथील जनआंदोलन हे मच्छीमारांच्या रोजी रोटीच्या प्रश्नासाठी आहे. या प्रकल्पाबाबत मी माहिती घेत असून सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

मी छत्रपतींचा मावळा...मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे या घटनेची पाहणी करणे महाराजांचे दर्शन घेणे हे माझे कर्तव्य असल्याची भावना जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

राजरत्न आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांच्यासमवेत केली पाहणीरविवारी मालवणात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेपाटील हे राजकोट येथे पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्यासमवेत बुद्धिस्ट सोसायटीचे ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनीही या ठिकाणी भेट दिली. भीमसैनिकांनीही हजेरी लावली. यावेळी जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम, सिद्धार्थ जाधव उपस्थित होते. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलsindhudurgसिंधुदुर्ग