शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 10:50 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्यार वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे आंबा हंगाम यावर्षी लांबणीवर पडणार, सिंधुदुर्गातील स्थितीबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण, क्यार वादळाचा फटका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्यार वादळ व अवकाळी पावसाचा परिणाम पहिल्या टप्प्यात येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. त्यामुळे यावर्षी आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची भीती बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.यावर्षी ह्यक्यारह्ण वादळाचा व अवकाळी पावसाचा फटका भातशेती व मच्छिमारी व्यवसायासह आंबा बागायतदारांना बसला. आॅक्टोबर ते नोव्हेंबर या पहिल्या टप्प्यात येणाºया मोहोरावर अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. या पहिल्या टप्प्यातील या मोहोरामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आंबा तयार होतो व बागायतदारांनाही चांगला दर मिळतो.मात्र, पावसाने बागायतदारांच्या आशेवर पाणी फेरले आहे. त्यामुळे बागायतदार चिंतातूर आहेत. या वातावरणामुळे आंबा कलमांना पालवी येण्याची शक्यता जास्त असून बागायतदारांना आंब्याला मोहोर येण्यासाठी डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या टप्प्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. मात्र, तेसुद्धा थंडीवर अवलंबून आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी म्हणावी तशी थंडी पडत नसल्याने बागायतदार चिंताग्रस्त आहेत.भातशेती नुकसानी, मच्छिमारांची नुकसानी याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. त्याच प्रकारे आंबा नुकसानीची पाहणी करून बागायतदारांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आता आंबा बागायतदारांमधून होत आहे.ज्या आशेवर आंबा बागायतदार होते तोच अवकाळी पावसाने पहिल्या टप्प्यातील मोहोर न आल्याने बागायतदारांची पुरती निराशा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोहोर हा डिसेंबर-जानेवारी महिन्यात येतो. त्याचा आंबा एप्रिल-मे महिन्यात तयार होतो.हंगामाच्या शेवटी आंब्याचा दर गडगडत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसतो. तरीही दुसऱ्या टप्प्यातील मोहोराच्या प्रतीक्षेत बागायतदार आहे. मात्र, पडणाऱ्या थंडीवर सर्व अवलंबून आहे, असे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्यासाठी आता वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.आम्हांला वाली कोण ?आंबा बागायतदारांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. त्यामुळे त्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या नुकसानीतून सावरायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. आम्हांला कोणीच वाली नाही का? असा प्रश्न आंबा बागायतदारांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग