शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता, वातावरणातील बदलामुळे बागायतदार चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:17 IST

वैभववाडी तालुक्याच्या काही भागात  पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर अचानक दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे आंबा, काजू बागायतींना कीडरोग तसेच फळझडीचा धोका उद्भवून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देतालुक्याच्या काही भागात आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यतावातावरणातील बदलामुळे बागायतदार चिंतातूर

वैभववाडी: तालुक्याच्या काही भागात  पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर अचानक दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे आंबा, काजू बागायतींना कीडरोग तसेच फळझडीचा धोका उद्भवून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या वादळीवा-यामुळे तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या काजू बागा उध्वस्त झाल्या. त्यानंतर अचानक थंडीची लाट वाढल्यामुळे वातावरण बदलले होते. त्यानंतर आता थंडी गायब होऊन उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात खांबाळे, आचिर्णे परिसरात पावसाचा शिडकावा झाला. तर काही ठिकाणी किरकोळ वाराही झाला.वातावरणातील उष्म्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. पावसाचा शिडकावा, ढगाळ वातावरण आणि उकाड्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली असून पावसाच्या शिडकाव्याचा काजू आणि बहरणा-या आंबा पावसाच्या शिडकाव याचा मोहोराला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत.वादळी वा-यामुळे बागायतींचे व पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत असतानाच पावसाचा शिडकावा आणि ढगाळ वातावरण हा वातावरणात झपाट्याने सुरु असलेला बदल कीडरोगांच्या प्रादुभार्वास आमंत्रण देणारा असल्याने तो बागायतदार चिंतातूर झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे अवकाळी पाऊस झालाच तर काजू बागायतींचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mangoआंबाenvironmentवातावरणsindhudurgसिंधुदुर्ग