शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

महोदय पर्वणीचे निमित्त, वेंगुर्ल्यात येणार विविध ग्रामदैवतांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 16:04 IST

अलोट गर्दी उसळणार, चैतन्यमय वातावरण

वेंगुर्ला : पौष अमावास्येला होणाऱ्या महोदय पर्वणीचे औचित्य साधून गावोगावचे ग्रामदैवत आणि तरंगदेवता आपल्या लवाजम्यासह येणार असल्याने वेंगुर्ला-सागरेश्वर तीर्थक्षेत्रावर अलोट गर्दी उसळणार आहे. आपल्या देवतांसह भाविक या तीर्थस्नान करणार आहेत. बाहेरून गावातील येणारी ग्रामदैवत ही शहरातील तसेच गावातील काही मंदिरे आणि काहींच्या निवासस्थानांमध्ये राहणार आहेत. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

पौष अमावास्या व श्रवण नक्षत्र एकत्र आल्यास महोदय पर्वणीचा योग येतो. यावर्षी असा योग आल्याने ९ फेब्रुवारी रोजी गावोगावच्या ग्रामदैवतांसह भाविक तीर्थस्नान करणार आहेत. महोदय पर्व सकाळी ८ वाजून २ मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत असल्याने या कालावधीत तीर्थस्नान करता येणार आहे. यापूर्वी ८ फेब्रुवारी २०१६ त्यानंतर ४ फेब्रुवारी २०१९ साली महोदय पर्वणीचा योग आला होता. वेंगुर्ला तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र सागरेश्वर व आरवली समुद्रकिनारी पंचक्रोशीतील देवस्थाने तरंगदेवता व पालख्यांसह तीर्थस्नानासाठी येत असतात.

तीर्थस्नानाला येण्यापूर्वी त्या-त्या गावांतील मानकरी, गावकर मंडळी, देवस्थान विश्वस्त आपल्या ग्रामदेवतेचा कौलप्रसाद घेतात. जर हा कौलप्रसाद झाला, तरच भक्तमंडळी आपल्या ग्रामदेवतेसह तीर्थस्नानास येतात. यावर्षी मिळालेल्या कौलप्रसादानुसार वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देवी सातेरी, श्री देव पूर्वस व तरंगदेवता तीर्थस्नानासाठी जाणार आहेत.

तसेच आंबडपाल, मांडकुली, वाडोस, बांबुळी, पुळास आदी ठिकाणची ग्रामदैवत आपल्या भक्तांसमवेत तीर्थस्नानासाठी येणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी वेंगुर्ला शहर व सागरेश्वर परिसरात विविध ठिकाणच्या ग्रामदैवतांचे दर्शन घडणार असल्याने भाविकही मोठ्या प्रमाणावर दाखल होणार आहेत. काही ठिकाणी मुंबई, पुणेस्थित चाकरमानीही या तीर्थस्नानासाठी येणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग