शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

महाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 17:29 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार : नारायण राणे दीपक केसरकर फक्त बढाया मारतात

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली.

सिंधुदुर्गच्या विकासासाठी जागतिक स्तरावरील प्रकल्प आपण आणले. मात्र गेल्या चार वर्षात एकही प्रकल्प पालकमंत्र्यांना पूर्ण करता आला नाही हे दुर्दैव आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असून, वीस वर्षांनी जिल्हा मागे गेला आहे, अशी जोरदार टिका त्यांनी कुडाळ येथे  केली.राणे म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभेच्या या जिल्ह्यातील सर्व जागा स्वाभिमान पक्षाच्यावतीने लढवून या चारही जागा जिंकणार आहे. तसेच राज्यात पक्षाच्यावतीने निवडणूक लढविल्या जाणाऱ्या जागा निवडणूका जवळ आल्यावर जाहीर करणार आहे.यावेळी राणे यांनी सांगितले की, या जिल्हाचा विकास व्हावा या दृष्टीने या जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणले. मात्र चार वर्षे पूर्ण करणाऱ्या सरकारला व येथील दुर्दैवी पालकमंत्र्यांना एकही प्रकल्प पूर्ण करता आला नसल्याने या चार वर्षात या जिल्ह्याचा विकास पुर्णपणे ठप्प झालेला असून विकासाच्या बाबतीत हा जिल्हा पूर्णपणे मागे गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी नवीन प्रकल्प जिल्ह्यात येणे गरजेचे आहे. पण जुने प्रकल्प पूर्ण नसून आताच्या पालकमंत्र्यांना एक नवीन प्रकल्प आणता आला नाही, असा टोलाही त्यांनी केसरकरांना लगावला.महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले असून या महामार्गाची दुरूस्ती करण्याबाबत ठेकेदारांशी बोललो असून येत्या दोन दिवसात दुरूस्ती न झाल्यास मंत्र्यांशी याबाबत भेटेन, अन्यथा पक्षाच्यावतीने महामार्ग बंद आंदोलन करू असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.यावेळी स्वाभिमानचे जिल्हाधक्ष दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विकास कुडाळकर, जिल्हा बँक संचालक सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाधक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, नगराध्यक्ष विनायक राणे, संदीप कुडतरकर, विशाल परब उपस्थित होते.जिल्ह्यात अनैतिक धंदे व भ्रष्टाचाराची वाढया चार वर्षात जिल्ह्याचा विकास पुर्णपणे ठप्प असून रेशनवर धान्य नाही. जनतेची कामे होत नसून या उलट अनैतिक धंदे व भ्रष्टाचाराचे प्रमाण या जिल्ह्यात वाढत आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची दादागिरी वाढत असून त्यांच्यावर पालकमंत्री व सत्ताधारी आमदार यांचा वचक नसून अधिकारी त्यांची दखल घेत नसल्याचा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.दोन दिवसात केसरकरांना नोटीस पाठविणारजिल्ह्यातील रूग्णांना माफक व दर्जेदार सेवा देता यावी या उद्देशाने पडवे येथे लाईफटाईम हे हॉस्पीटल सुरू केले असून केसरकर हे जलसीने, आकसाने व दृष्टबुध्दीने हॉस्पीटलची बदनामी करीत असून त्यांची ही बदनामी मी सहन करणार नाही. बदनामीप्रकरणी येत्या दोन दिवसात त्यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग