शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

महाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 17:29 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र स्वाभिमान राज्यातील निवडणूका लढवणार : नारायण राणे दीपक केसरकर फक्त बढाया मारतात

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे केली.

सिंधुदुर्गच्या विकासासाठी जागतिक स्तरावरील प्रकल्प आपण आणले. मात्र गेल्या चार वर्षात एकही प्रकल्प पालकमंत्र्यांना पूर्ण करता आला नाही हे दुर्दैव आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असून, वीस वर्षांनी जिल्हा मागे गेला आहे, अशी जोरदार टिका त्यांनी कुडाळ येथे  केली.राणे म्हणाले, आगामी लोकसभा व विधानसभेच्या या जिल्ह्यातील सर्व जागा स्वाभिमान पक्षाच्यावतीने लढवून या चारही जागा जिंकणार आहे. तसेच राज्यात पक्षाच्यावतीने निवडणूक लढविल्या जाणाऱ्या जागा निवडणूका जवळ आल्यावर जाहीर करणार आहे.यावेळी राणे यांनी सांगितले की, या जिल्हाचा विकास व्हावा या दृष्टीने या जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणले. मात्र चार वर्षे पूर्ण करणाऱ्या सरकारला व येथील दुर्दैवी पालकमंत्र्यांना एकही प्रकल्प पूर्ण करता आला नसल्याने या चार वर्षात या जिल्ह्याचा विकास पुर्णपणे ठप्प झालेला असून विकासाच्या बाबतीत हा जिल्हा पूर्णपणे मागे गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्याच्या विकासासाठी दरवर्षी नवीन प्रकल्प जिल्ह्यात येणे गरजेचे आहे. पण जुने प्रकल्प पूर्ण नसून आताच्या पालकमंत्र्यांना एक नवीन प्रकल्प आणता आला नाही, असा टोलाही त्यांनी केसरकरांना लगावला.महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले असून या महामार्गाची दुरूस्ती करण्याबाबत ठेकेदारांशी बोललो असून येत्या दोन दिवसात दुरूस्ती न झाल्यास मंत्र्यांशी याबाबत भेटेन, अन्यथा पक्षाच्यावतीने महामार्ग बंद आंदोलन करू असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.यावेळी स्वाभिमानचे जिल्हाधक्ष दत्ता सामंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विकास कुडाळकर, जिल्हा बँक संचालक सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाधक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुकाध्यक्ष दीपक नारकर, नगराध्यक्ष विनायक राणे, संदीप कुडतरकर, विशाल परब उपस्थित होते.जिल्ह्यात अनैतिक धंदे व भ्रष्टाचाराची वाढया चार वर्षात जिल्ह्याचा विकास पुर्णपणे ठप्प असून रेशनवर धान्य नाही. जनतेची कामे होत नसून या उलट अनैतिक धंदे व भ्रष्टाचाराचे प्रमाण या जिल्ह्यात वाढत आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची दादागिरी वाढत असून त्यांच्यावर पालकमंत्री व सत्ताधारी आमदार यांचा वचक नसून अधिकारी त्यांची दखल घेत नसल्याचा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.दोन दिवसात केसरकरांना नोटीस पाठविणारजिल्ह्यातील रूग्णांना माफक व दर्जेदार सेवा देता यावी या उद्देशाने पडवे येथे लाईफटाईम हे हॉस्पीटल सुरू केले असून केसरकर हे जलसीने, आकसाने व दृष्टबुध्दीने हॉस्पीटलची बदनामी करीत असून त्यांची ही बदनामी मी सहन करणार नाही. बदनामीप्रकरणी येत्या दोन दिवसात त्यांना वकीलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे राणे यांनी जाहीर केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्ग